कुंडलिका नदीवरील पूल बांधण्याच्या मागणीसाठी राष्ट्रीय समाज पक्षाचे आंदोलन Saam Tv
महाराष्ट्र

कुंडलिका नदीवरील पूल बांधण्याच्या मागणीसाठी राष्ट्रीय समाज पक्षाचे आंदोलन

या आंदोलनात राष्ट्रीय समाज पक्षाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.

लक्ष्मण सोळुंखे, साम टीव्ही जालना

जालना- रोहणवाडी Rohanvadi रस्त्यावरील कुंडलिका नदीवर Kundalika river लवकरात लवकर पूल बांधण्यात यावा या मागणीसाठी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने आज जालन्याजवळील Jalna रोहणवाडी पुलावर नदीच्या पाण्यात आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात राष्ट्रीय समाज पक्षाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी कुंडलिका नदीवर नवीन पूल बांधण्याची मागणी आंदोलन करण्यात आली.

हे देखील पहा -

आंदोलना दरम्यान पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता. कुंडलिका नदीला पूर आल्यानंतर जालना - रोहणवाडी रस्त्यावरील या पुलावरून सातत्याने वाहतूक बंद करावी लागते.सध्याही कुंडलिका नदीवरील या पुलावरुन पाणी वाहत असल्याने नाहक त्रास सोसावा लागत आहे. त्यामुळे ग्रामस्थांचा खोळंबा होतो. पण या समस्येकडे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करत असल्याने पुलांचं काम रखडल आहे.

दरम्यान, या आंदोलनावेळी एक दुचाकी चालक पुलावरील वाहत्या पाण्यातून दुचाकी घेऊन जाताना दुचाकीसह वाहून जात होता. पोलीस, आंदोलक आणि नागरिकांनी धावत जाऊन या दुचाकीचालकाला पकडले त्यामुळे वाहून जाता-जाता तो वाचला. दरम्यान पुलाचे काम न केल्यास कुंडलिका नदीत जलसमाधी घेण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India vs South Africa T20 WC: दक्षिण आफ्रिकेच्या संघासमोर टीम इंडियाच्या फलंदाजांनी नांगी टाकली; 111 धावांवर अख्खा संघ All Out

Monday Horoscope : थकवा, चिडचिड आणि शब्दांवर नियंत्रण ठेवा; ५ राशींच्या लोकांनी वाणीवर संयम ठेवा,अन्यथा...

बाजारातून घरी परतताना काळाचा घाला, ५ मजुरांचा जागीच मृत्यू; अपघाताचं कारण आलं समोर

Ladki Bahin Yojana: लाडकी बहिणींना आता १५०० नाहीतर २१०० रुपये मिळणार; अर्थसंकल्पीय अधिवेशनात होणार घोषणा?

55 वर्षांचा विरह, रक्ताची नाती पुन्हा एकत्र, 55 वर्षांनंतर भेटीची कहाणी, दोन्ही भावांच्या डोळ्यात पाणी

SCROLL FOR NEXT