Devendra Fadnavis Saam Tv
महाराष्ट्र

राज्यसभा निवडणूक: भाजपचे आमदार फुटणार?, काँग्रेस नेत्याच्या वक्तव्यामुळं चर्चेला उधाण

राज्यात सध्या राज्यसभा निवडणुकीवरून वातावरण चांगलंच तापलं आहे

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : राज्यात सध्या राज्यसभा निवडणुकीवरून (Rajya Sabha Election) वातावरण चांगलंच तापलं आहे. राज्यसभा निवडणूक बिनविरोध होण्याची चर्चा होती. मात्र ऐनवेळी सत्ताधारी (Mahavikas Aghadi) आणि विरोधकांमधील (BJP) बोलणी फिसकटल्याने आता निवडणूक मतांद्वारे होणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे. त्यामुळे राज्यसभेची सहावी जागा जिंकण्यासाठी दोन्ही बाजूंनी ताकद पणाला लावली जात आहे. इतकंच नाही तर, दोन्ही बाजूंकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप आणि दावे-प्रतिदावे केले जात आहेत. अशातच भाजपने आपले आमदार सांभाळले पाहिजे असं विधान कॉंग्रेस नेते सतेज पाटील (Satej Patil) यांनी केलं आहे. (Rajya Sabha Election 2022 Latest News)

'भाजपने राज्यसभेची निवडणूक लादली, ही निवडणूक बिनविरोध करणं हे अभिप्रेत होतं. महाविकास आघाडीकडे क्लियर नंबर आहेत . मतांद्वारे विजय स्पष्ट होईल . या सरकारला कुठलाही धोका नाही किंबहुना भाजपचीच मतं बाजूला जातील. त्यामुळे भाजपाने आपले आमदार सांभाळले पाहिजेत' असा इशारा सतेज पाटील यांनी भाजपला दिला आहे. त्यांच्या या इशाऱ्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

दुसरीकडे काँग्रेसमधल्या (Congress) नाराजीबद्दलही सतेज पाटलांनी भाष्य केलं आहे. कॉंग्रेसमध्ये कोणतीही नाराजी नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. काँग्रेसमध्ये नाराजी नाही. इम्रान प्रतापगढी हे राष्ट्रीय पातळीवर काम करणारे नेते आहेत, त्यामुळे त्यांना उमेदवारी दिल्याचं सतेज पाटलांनी स्पष्ट केलं आहे. तर भाजपाच्या विखारी प्रचाराला काँग्रेस प्रबळपणे उत्तर देण्याचे प्रयत्न करत असल्याचाही दावा सतेज पाटलांनी केला आहे.

दरम्यान, या निवडणुकीत घोडेबाजार होण्याचा आरोप विविध नेत्यांकडून होत आहे. राज्यसभेच्या उमेदवारीसाठी भाजपकडे पुरेसं संख्याबळ नाही. त्यामुळे हा उमेदवार निवडून आणण्यासाठी भाजप अपक्षांवर दबाव आणतंय. ईडी, सीबीआय (CBI) सारख्या तपासयंत्रणांद्वारे अपक्ष आमदारांना भीती दाखवली जातेय, असा आरोप संजय राऊत यांनी केला. मात्र भाजपने कितीही घोडेबाजारी केली, कितीही पैसा ओतला तरीही सहावी जागा मविआ जिंकणार आहे. त्यामुळे भाजपने यात पैसा वाया घालवू नये, असा इशारा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिला होता.

संजय राऊत यांच्या इशाऱ्यानंतर आता कॉंग्रेस नेते सतेज पाटील यांनी सुद्धा भाजपने आपले आमदार सांभाळावेत असा इशारा दिल्यानंतर राज्यसभा निवडणुकीत नेमकं काय होणार? याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Petrol Diesel :...तर तुम्हाला पेट्रोल-डिझेल मिळणार नाही, सरकारने घेतला मोठा निर्णय

Maharashtra Politics : ठाकरेंच्या दसरा मेळाव्याला परवानगी, शिवाजी पार्कवर उद्धव यांच्यासह राजही दिसणार?

Breast Cancer : ब्रेस्ट कॅन्सर न होण्यासाठी कोणते पदार्थ टाळावे?

Maharashtra Live News Update : मुख्यमंत्री फडणवीस आणि मंत्री छगन भुजबळ यांचा एकत्र विमानाने प्रवास

Taloda Heavy Rain : मुसळधार पावसामुळे आतोनात नुकसान; मिरचीसाठी अडीच लाख खर्च, उत्पन्न २५ हजाराचे

SCROLL FOR NEXT