राज्यात बोगस मतदारांचा मुद्दा ऐरणीवर आलेला असताना दुसरीकडे राज ठाकरेंनी थेट निवडणुक आयोगाला पुन्हा एकदा इशारा दिलाय. मुंबईतल्या नेस्को मैदानात मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरेंनी निवडणुक आयोगाला चांगलचं घेरलं.
दरम्यान राज ठाकरेंनी निवडणुक आयोगासोबत सत्ताधाऱ्यांनांही चांगलचं झापलंय...आयोगाला विचारलेल्या प्रश्नांवर सत्ताधारी का चिडतायत? असा सवालचं ठाकरेंनी उपस्थित केलाय... दुसरीकडे राज ठाकरेंनी शिंदे सेनेचे आमदार विलास भुमरेंच्या विधानाचा मेळाव्यातून समाचार घेतल्यानंतर भुमरेंनी आपल्या विधानावरून सारवासारव केलीय...
शिवाजी पार्कमधील दिपोत्सवात शनिवारी ठाकरे बंधू सहकुटुंब एकत्र आले होते. त्यानंतर लगोलग दुस-या दिवशी मनसेचा मेळावा घेऊन राज ठाकरे ऍक्शन मोडवर आल्याचं दिसतंय. गेल्या महिन्याभरापासून बोगस मतदारांच्या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक झालेत. त्यामुळे मतदारयाद्यांमधील घोळ आयोग कधी आणि कसा दूर करणार? खरोखरच निवडणूक प्रक्रिया पारदर्शक होणार का? हा खरा प्रश्न आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.