Solapur Saam TV
महाराष्ट्र

Solapur: BSC परीक्षेत विद्यार्थ्यांना ५० पैकी ९९ गुण; पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठातील अजब प्रकार

Punyashlok Ahilyadevi Holkar University: येथील शिक्षकांनी पन्नासपैकी ९९ गुण देऊन विद्यार्थ्यांना आश्चर्यकारक धक्का दिला आहे. बीएस्सी सेमिस्टर तीनचा असा अजब निकाल शिक्षकांनी जाहीर केला आहे.

Ruchika Jadhav

विश्वभूषण लिमये

Solapur News:

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठातील परीक्षा निकालांचा गजब कारभार समोर आला आहे. येथील शिक्षकांनी पन्नासपैकी ९९ गुण देऊन विद्यार्थ्यांना आश्चर्यकारक धक्का दिला आहे. बीएस्सी सेमिस्टर तीनचा असा अजब निकाल शिक्षकांनी जाहीर केला आहे.

सोलापूरच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठात बीएस्सी सेमिस्टर तीनचा निकाल पाहून विद्यार्थ्यांसह पालक चकित झाले आहेत. काही विद्यार्थ्यांना ५० गुणांच्या परीक्षेत एका विषयाला ९९ गुण देण्यात आलेत. विद्यापीठाकडून १३ डिसेंबर २०२३ पासून २२ डिसेंबरपर्यंत बीएस्सी सेमिस्टर ३ च्या १० विषयांच्या परीक्षा पार पडल्या.

यामध्ये विद्यापीठाने ४० गुणांचा लेखी पेपर तर १० गुणांची असाइनमेंट अशी एकूण ५० गुणांची परीक्षा घेतली होती. ५ फेब्रुवारीला विद्यापीठाच्या संकेतस्थळावर निकाल जाहीर करण्यात आला. क्लेरीकल चुकीमुळे असा प्रकार घडल्याची कबुली विद्यापीठ प्रशासनाने दिली आहे.

वर्षभर अभ्यास करून विद्यार्थी परीक्षा देतात. या परीक्षांवर त्यांचं पुढील भविष्य अवलंबून असतं. अशात परीक्षांमध्ये गोंधळ होण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. अशा घटनांमुळे अनेक विद्यार्थ्यांची मेहनत आणि वर्ष देखील वाया जाते. अशात सोलापूरच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठात झालेल्या या घटनेनंतर विद्यार्थ्यांना सेमिस्टर तीनची परीक्षा द्यावी लागणार का? असा प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

TET Exam Result: महत्त्वाची बातमी! आज टीईटी परीक्षेचा निकाल| VIDEO

इंग्लडचं मैदान गाजवलं, पण आशिया कपमधून गिलला मिळणार डच्चू? अजित आगरकरांच्या मनात नेमकं काय?

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र-तेलंगनाचा संपर्क तुटला; सीमेवरील पोडसा पूल पाण्याखाली

Maharashtra Water Dam : महाराष्ट्रात मुसळधार पाऊस, राज्यातील प्रमुख धरणं तुडुंब भरली; पाणीटंचाईचा प्रश्न सुटला

Coolie VS War 2: रविवारी 'कुली'चा बोलबाला, 'वॉर २'ला पछाडले; चौथ्या दिवशी केलं इतक्या कोटींचं कलेक्शन

SCROLL FOR NEXT