Solapur Saam TV
महाराष्ट्र

Solapur: BSC परीक्षेत विद्यार्थ्यांना ५० पैकी ९९ गुण; पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठातील अजब प्रकार

Punyashlok Ahilyadevi Holkar University: येथील शिक्षकांनी पन्नासपैकी ९९ गुण देऊन विद्यार्थ्यांना आश्चर्यकारक धक्का दिला आहे. बीएस्सी सेमिस्टर तीनचा असा अजब निकाल शिक्षकांनी जाहीर केला आहे.

Ruchika Jadhav

विश्वभूषण लिमये

Solapur News:

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठातील परीक्षा निकालांचा गजब कारभार समोर आला आहे. येथील शिक्षकांनी पन्नासपैकी ९९ गुण देऊन विद्यार्थ्यांना आश्चर्यकारक धक्का दिला आहे. बीएस्सी सेमिस्टर तीनचा असा अजब निकाल शिक्षकांनी जाहीर केला आहे.

सोलापूरच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठात बीएस्सी सेमिस्टर तीनचा निकाल पाहून विद्यार्थ्यांसह पालक चकित झाले आहेत. काही विद्यार्थ्यांना ५० गुणांच्या परीक्षेत एका विषयाला ९९ गुण देण्यात आलेत. विद्यापीठाकडून १३ डिसेंबर २०२३ पासून २२ डिसेंबरपर्यंत बीएस्सी सेमिस्टर ३ च्या १० विषयांच्या परीक्षा पार पडल्या.

यामध्ये विद्यापीठाने ४० गुणांचा लेखी पेपर तर १० गुणांची असाइनमेंट अशी एकूण ५० गुणांची परीक्षा घेतली होती. ५ फेब्रुवारीला विद्यापीठाच्या संकेतस्थळावर निकाल जाहीर करण्यात आला. क्लेरीकल चुकीमुळे असा प्रकार घडल्याची कबुली विद्यापीठ प्रशासनाने दिली आहे.

वर्षभर अभ्यास करून विद्यार्थी परीक्षा देतात. या परीक्षांवर त्यांचं पुढील भविष्य अवलंबून असतं. अशात परीक्षांमध्ये गोंधळ होण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. अशा घटनांमुळे अनेक विद्यार्थ्यांची मेहनत आणि वर्ष देखील वाया जाते. अशात सोलापूरच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठात झालेल्या या घटनेनंतर विद्यार्थ्यांना सेमिस्टर तीनची परीक्षा द्यावी लागणार का? असा प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gaurav and Akanksha: 'आम्ही वर्षभरापासून वेगळे राहतोय'; बिग बॉस विजेता गौरव खन्ना आणि आकांक्षा यांचा ९ वर्षांचा संसार मोडला

Maharashtra News Live Update: अमरावती पल्स पोलिओ मोहीम, 67 हजार बालकांचे केले जाणार लसीकरण

High Blood Pressure : वयाच्या 30-40 मध्येच वाढतोय BP? जाणून घ्या यामागची मोठी कारणं

वटपौर्णिमेनिमित्त साडीवर खुलून दिसतील 'या' 5 लेटेस्ट नथ डिझाइन्स

Maharashtra : महाराष्ट्रातील २०० भाविक काठमांडूमध्ये अडकले; सरकारकडे मदतीची आर्त हाक

SCROLL FOR NEXT