PM Kisan Samman Nidhi Yojana  Saam Tv
महाराष्ट्र

PM Kisan Yojana : शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! पीएम किसान योजनेचा निधी वाढण्याची शक्यता; 2000 रुपये जास्त मिळणार?

Farmers News : केंद्र सरकार पंतप्रधान शेतकरी सन्मान निधीची रक्कम 6 हजार रूपयांवरून 8 हजार रूपयांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे.

प्रविण वाकचौरे

PM Kisan Yojana :

केंद्र सरकारकडून देशभरातील शेतकऱ्यांन गुड न्यूज मिळण्याची शक्यता आहे. आगामी 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार मोठं पाऊल उचलण्याची शक्यता आहे.  पीएम किसान योजनेच्या निधीच्या (PM Kisan Yojana) रकमेत सरकार वाढ करण्याची शक्यता आहे.

केंद्र सरकार पंतप्रधान शेतकरी सन्मान निधीची रक्कम 6 हजार रूपयांवरून 8 हजार रूपयांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. या वर्षाच्या शेवटी 5 मोठ्या राज्यांच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्याआधी याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. (Latest News)

CNBC-TV18 च्या अहवालानुसार, केंद्र सरकारने गेल्या वर्षी शेतकऱ्यांसाठी या योजनेअंतर्गत 10,000 कोटी रुपयांची बचत केली आहे. योजनेतून अपात्र लाभार्थ्यांना काढून टाकल्यामुळे ही बचत झाली आहे.

सुमारे 1.72 कोटी अपात्र लाभार्थ्यांना काढून टाकण्यात आल्याची माहिती अहवालात आहे. त्यामुळे ही बचत करणे शक्य झाले आहे. ही मोठी बचत पाहता सरकार पीएम-किसानचा निधी वाढवू शकते, अशी आशा सूत्रांनी व्यक्त केली आहे.

पीएम-किसान योजना 1 डिसेंबर 2018 पासून सुरू झाली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपये दिले जातात. शेतकऱ्यांना तीन हप्त्यांमध्ये हे पैसे दिला जातात. प्रत्येक हप्त्यात 2000 रुपये मिळतात. शेतकऱ्यांना आतापर्यंत एकूण 14 हप्ते देण्यात आले आहेत. 15 वा हप्ता देखील शेतकऱ्यांना लवकरच दिला जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : - नागपूर विभागात पाच भागात असणार वीजपुरवठा बंद

Poha Ladoo Recipe : वाटीभर पोह्यांपासून झटपट बनवा लाडू, संध्याकाळची भूक जाईल पळून

'Bigg Boss 19'च्या स्पर्धकावर हिना खान भडकली, फरहाना भट्ट नेमकं काय म्हणाली?

Sangli Accident : कारने बाईकला चिरडलं, आजी-आजोबा अन् नातवाचा जागीच मृत्यू, सांगलीत भयानक अपघात

Pollution Free Pune : पुणेकरांनो मोकळा श्वास घ्या, शहरातील हवेची गुणवत्ता सुधारली, देशात दहावा क्रमांक

SCROLL FOR NEXT