Mumbai News  Saam TV
महाराष्ट्र

Mumbai News : मुंबईत १ मार्चपासून १० टक्के पाणीकपात लागू होण्याची दाट शक्यता

Mumbai Water Cut News : मुंबईची तहान भागवणाऱ्या सातही धरणांत केवळ ४५.४३ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे पाणीकपातीचा प्रस्ताव प्रशासकीय मंजुरीसाठी पाठवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

सूरज सावंत

Mumbai News :

राज्यात अनेक ठिकाणी पाणीटंचाईची मोठी समस्या भासू लागली आहे. दुष्काळी भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न नागरिकांसमोर आहे. मुंबईतील नागरिकांनाही येत्या काळात पाणी जपून वापरावं लागणार आहे. कारण १ मार्चपासून मुंबईभर १० टक्के पाणीकपात लागू होण्याची दाट शक्यता आहे.

मुंबईची तहान भागवणाऱ्या सातही धरणांत केवळ ४५.४३ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. उर्ध्व वैतरणातील राखीव पाणीसाठा मिळावा, अशी मागणी मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून राज्य सरकारकडे पत्राद्वारे केली गेली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मात्र १० दिवस उलटूनही सरकारने प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे पाणीकपातीचा प्रस्ताव प्रशासकीय मंजुरीसाठी पाठवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.  (Latest Marathi News)

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ऊर्ध्व वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी या सातही धरणांत मिळून ६ लाख ५७ हजार ५४६ दशलक्ष लिटर म्हणजेच ४५.४३ टक्के पाणीसाठा सध्या शिल्लक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : शरद पवार आज एक दिवसाच्या नागपूर दौऱ्यावर

Amba Poli: उन्हाळ्यात बनवा आंबट-गोड आंबा पोळी, सोपी रेसिपी लगेच करा ट्राय

Women Reservation : मोठी बातमी! महिला आरक्षणासाठी लोकसभेच्या जागांत वाढ होणार? काय आहे मोदी सरकारच्या विधेयकात? वाचा

Iran Isrel War: ट्रम्प नरमले, इराण-इस्त्रायल युद्ध कधी संपणार? राष्ट्राध्यक्षांनी थेट तारीख सांगितली

LPG Cylinder: सिलेंडरमध्ये 14 ऐवजी 8 किलोच गॅस? युद्धामुळे गॅसटंचाई, सरकारचे कंपन्यांना आदेश?

SCROLL FOR NEXT