दरोडा घालण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी दरोडेखोरांना पकडले राजेश काटकर
महाराष्ट्र

दरोडा घालण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी दरोडेखोरांना पकडले

पोलीस निरीक्षक सुभाष राठोड यांनी यापूर्वी देखील अट्टल गुन्हेगारांना जेरबंद केले होते हे विशेष आहे.

राजेश काटकर

परभणी: मानवत पोलीस ठाण्याचे पोलीस (Manvat Police Station) निरीक्षक सुभाष राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मानवत पाथरी तालुक्यातील दरोडेखोरांची पाच जणांची एक टोळी आज जेरबंद केली. रात्री गस्त घालीत असताना पाच जण वाहनाद्वारे जात असताना पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना संशय आला आणि त्यामध्ये त्यांच्यावर झडप घालून त्यांना पकडण्यात आले त्यांच्याकडून काही हत्यारे देखील जप्त करण्यात आली आहेत.

पोलीस निरीक्षक सुभाष राठोड यांनी यापूर्वी देखील अट्टल गुन्हेगारांना जेरबंद केले होते हे विशेष आहे. अनिल पवार परबीन सिंग कृष्णागिरी अर्जुन पवार रमेश दाभाडे अशी या आरोपींची नावे असल्याचे सांगण्यात येत आहेत.

पाळोदी रोड ते टी पॉईंट मध्ये रात्री दीड वाजताच्या सुमारास एका मोटरसायकलवर पाच दरोडेखोर जात असताना सपोनि भरत जाधव पूना वड राख क्षीरसागर शेख वसीम वायाळ चव्हाण घुगे यांनी पोलीस निरीक्षक सुभाष राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पाच दरोडेखोर हत्यारानिशी पकडले त्यांना वेळीच पकडले नसते तर दरोडा जबरी चोरी घरफोडी चोरी त्यांनी केली असती सदर आरोपींनी यापूर्वीसुद्धा मानवत पाथरी शहरात चोरी केली होती रेकार्डवर ते सराईत गुन्हेगार आहेत.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Municipal Elections Voting Live updates: वेळेत मतदान केंद्रावर येऊनही मतदान करण्यास नकार, कोल्हापुरात तरुणींचा संताप

अहिल्यानगरमध्ये काँग्रेसला मोठा धक्का, राधाकृष्ण विखे पाटील गड राखणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर

Saam Tv Exit Poll: मालेगावमध्ये एमआयएम सर्वात मोठा पक्ष, कुणाची सत्ता येणार?

Night Habits: रात्रीच्या या 5 वाईट सवयींचा आरोग्यावर होतो परिणाम

SaamTV Exit Poll: सांगलीचं मैदान भाजपनं मारलं; एकहाती सत्ता राहणार?

SCROLL FOR NEXT