अबब! पोलिसांनी केला चोरीच्या गाड्यांचा लिलाव; विक्री करून दिले बक्कळ पैसे संदीप नागरे
महाराष्ट्र

अबब! पोलिसांनी केला चोरीच्या गाड्यांचा लिलाव; विक्री करून दिले बक्कळ पैसे

कोरोना महामारी संकटाने आर्थिक अडचणीत आलेल्या शासनाला हिंगोली जिल्हा पोलिस दलाने बक्कळ पैसे कमावून दिले आहेत.

संदीप नागरे

संदीप नागरे

हिंगोली : कोरोना Coprona महामारीने सगळं जग संकटात आहे. या स्थितीत आर्थिक अडचण तर प्रत्येकाचीच आहे, लॉक डाऊन मध्ये सर्वच व्यवहार बंद असल्याने ढासळलेल्या आर्थिक स्थितीत सर्वसामान्य नागरिकांपासून ते प्रशासनान पर्यंत प्रत्येकाला पैशाची गरज भासत आहे. अश्या कठीण परिस्थितीत हिंगोली जिल्हा पोलिस दलाने प्रशासन व सरकारला अनोख्या संकल्पनेतून बक्कळ कमाई करून दिली आहे.

हे देखील पहा-

होय आम्ही खरे सांगतोय, कारण हिंगोली Hingoli पोलिसांनी गेल्या अनेक वर्षांपासून चोरीच्या गुन्हा सह विविध घटनांमध्ये जप्त केलेल्या वाहनांच्या लिलावातून Auction ही रक्कम मिळविले आहे. यासाठी पोलिसांनी 41 व्यापाऱ्यांना जाहीर लिलावात सहभागी करून घेतले होते .

यात तब्बल 197 मोटासायकल विक्री केल्या आहेत. पोलीस दलाने आयोजित केलेल्या या जाहीर लिलावात, साडे लाख रुपयांपासून ते चौदा लाखा पर्यंत बोली पुढे गेली.

ज्यात अहमदपूर येथील एका भंगार व्यावसायिकाला या गाड्या देण्यात आल्या. आता लवकरच 14 लाखांचे सरकारी चलन भरून, या सर्व गाड्या खरेदी करणाऱ्याच्या ताब्यात पोलीस देणार आहेत. पोलिसांनी कठीण प्रसंगात अनोखी शक्कल लढवून कोरोनाच्या संकटात आर्थिक चणचण भासणाऱ्या सरकारला भरीव रक्कम दिल्याने काही प्रमाणात का होईना नक्कीच दिलासा मिळाला आहे.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! विजयाच्या मेळाव्यानंतर राजकीय घडामोडींना वेग; ठाकरे गटाकडून भाजपच्या मोठ्या नेत्याला ऑफर

IND vs ENG 2nd Test Score: शुबमनकडून इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई; दुसऱ्या डावातही ठोकलं शतक

India Bangladesh Tour: टीम इंडियाचा बांगलादेश दौरा का झाला रद्द? काय आहे कारण,जाणून घ्या

Shaktipeeth Expressway :'शक्तीपीठ' ठरणार पांढराहत्ती? शेतकऱ्यांचं नुकसान, शेकडो गावांना फटका बसणार; राजू शेट्टींनी सांगितले विकासाचे अडथळे

Satara News: थरारक! साताऱ्यातील खंबाटकी घाटात ट्रकचा जळून कोळसा; वाहतूक ठप्प, VIDEO

SCROLL FOR NEXT