पंतप्रधान गरीब कल्याण योजना सुरू ठेवावी; लाभार्थी आणि रेशन दुकानदार संघटनेची मागणी संजय डाफ
महाराष्ट्र

पंतप्रधान गरीब कल्याण योजना सुरू ठेवावी; लाभार्थी आणि रेशन दुकानदार संघटनेची मागणी

संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर

नागपूर - पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना बंद करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. या योजनेच्या माध्यमातून गरिबांना मोफत धान्य दिलं जात होतं. कोरोना काळात ही योजना सुरू झाली होती. कोरोना काळात बंद झालेले अनेक व्यवसाय अद्याप सुरु झाले नाही, रोजगार नसल्याने गरिबांना दोन वेळची चूल पेटवण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे.त्यामुळे पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना पुढील वर्षभर सुरु ठेवावी, अशी मागणी लाभार्थी आणि नागपूर रेशन दुकानदार संघटनेने केली आहे. या योजनेतून नागपूरात २५ लाख परिवारांना मोफत अन्नधान्य वाटप करण्यात येत होत.

हे देखील पहा -

१ डिसेंबर पासून ही योजना बंद झाल्यास यापैकी अनेक नागरिकांना संघर्ष करावा लागणार आहे. त्यामुळे ही योजना पुढचे वर्षभर सुरु ठेवावी, अशी मागणी रेशन दुकानदार संघटनेने केली आहे.कोरोनामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या गरीबांच्या समस्या कमी करण्यासाठी केंद्र सरकारने मार्च २०२० पासून प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेज योजना सुरु केली.

याअंतर्गत गरिबांना दर महिन्याला पाच किलो गहू किंवा तांदूळ मोफत देण्यात येत आहे. या योजने अंतर्गत देशभरात जवळपास ८० कोटी लाभार्थ्यांना मोफत अन्नधान्य देण्यात येत आहे.नागपूरमध्ये देखील २५ लाख परिवार या योजनेचा लाभ घेत आहेत. आता १ डिसेंबर पासून ही योजना बंद झाल्यास यापैकी अनेक नागरिकांना संघर्ष करावा लागणार आहे. त्यामुळे ही योजना वर्षभर सुरु ठेवावी, अशी मागणी नागपूरातील लाभार्थी करत आहेत.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diwali: दिवाळीचा घराचा प्रत्येक कोपरा सजवा अशा पद्धतीने;होईल आर्थिक भरभराट

Maharashtra News Live Updates: उपमुख्यमंत्री फडणवीस अॅक्शन मोडवर, सलमान खान धमकीनंतर गृह विभागाला निर्देश

Armaan Malik Accident: 'मरता मरता वाचलो...' बिग बॉस फेम अभिनेत्याच्या कारचा झाला अपघात; Video केला शेअर

मासिक पाळीविषयीचे समज आणि गैरसमज, तज्ज्ञ डॉक्टरांनी काय सांगितलं, वाचा सविस्तर!

Diwali Festival: दिवाळीला दारात तेलाचा की तुपाचा दिवा लावावा?

SCROLL FOR NEXT