PM Modi Kalaram Temple Visit Saam Digital
महाराष्ट्र

PM Modi Kalaram Temple Visit: पंतप्रधान काळाराम मंदिरात दर्शनासाठी आले, आनंद आहे! पण..., संजय राऊत मोदींच्या दौऱ्यावर काय म्हणाले?

PM Modi Kalaram Temple Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिकला काळाराम मंदिरात दर्शनासाठी आले, आनंद आहे! पण दर्शन झाल्यानंतर थोडा वेळ काढून जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनाही त्यांनी भेटायला पाहिजे होतं, असं संजय राऊत म्हणाले आहेत.

Sandeep Gawade

PM Modi Kalaram Temple Visit

पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिकला काळाराम मंदिरात दर्शनासाठी आले, आनंद आहे! पण दर्शन झाल्यानंतर थोडा वेळ काढून जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनाही त्यांनी भेटायला पाहिजे होतं . नाशिक जिल्हा हा देशातील सर्वात मोठं कांदा उत्पादक जिल्हा आहे, पण कांदा निर्यात बंदीमुळे इथला शेतकरी पार कोलमडून पडलाय. पंतप्रधान या शेतकऱ्यांना का भेटले नाहीत? असा सवाल खासदार संजय राऊत यांनी केला असून राजकारण करायला वेळ आहे, पण देशाला पोसणाऱ्या शेतकऱ्याच्या डोळ्यातले अश्रू दिसत नाहीत. भाजपला केवळ धर्माच्या नावावर राजकारणाची भाकरी भाजण्याचं काम येतं, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले, अशी घणाघाती टीका त्यांनी मोदींना लगावला आहे.

देशात कांद्याचं सर्वात जास्त कांद्याचं उत्पादन नाशिक जिल्ह्यात होतं. मात्र केंद्र सरकारने मार्चपर्यंत कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. त्यामुळे दर घसरले असून शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. त्यावरून राऊत यांनी आज मोदींवर निशाणा साधला. एक्सवर त्यांनी यासंदर्भात पोस्ट करून नाराजी व्यक्त केली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नाशिकमध्ये आजपासून राष्ट्रीय युवा महोत्सव होत असून या महोत्सवाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं. कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह महाराष्ट्रातील भाजपचे नेते उपस्थित होते.

कांद्यांचे दर नियंत्रित ठेवण्यासाठी केंद्र सरकारने सुरुवातीला निर्यातीवर ४० टक्के शुल्क लागू केलं. त्यानंतर निर्यातबंदी केली. त्यामुळे शेतकऱ्यांची चोहोबाजूंनी कोंडी झाली आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनी लिलावात सहभागी न होणे, प्रत्यक्षात व्यापारी खळ्यांवरून खरेदी करून माल पाठविणे, १३ दिवस लिलाव बंद राहणे असे प्रकार घडले होते. त्यामुळे कांदा चाळीतच सडला. हजारो शेतकऱ्यांना याचा फटका बसला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tuesday Horoscope : या राशींच्या व्यक्तींना नागदेवता पावणार, वाचा उद्याचे राशीभविष्य

Maharashtra Live News Update: नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा मोठा निर्णय

Kolhapur Superstition : अंधश्रद्धेचा कहर! बाहुली, नारळ, लिंबू अन् एक चिठ्ठी; कोल्हापुरात घटस्फोटासाठी अघोरी प्रकार

Ashok Sharaf: सलमान खानने अशोक सराफ यांचा गळाच कापला; ३३ वर्षानंतर मामांनी सांगितला शुटिंगचा थरारक किस्सा

Micro Walking: मायक्रो वाकिंग म्हणजे काय? यामुळे कोणते फायदे होतात

SCROLL FOR NEXT