पीएम किसान योजनेसंदर्भात महत्त्वाची माहिती
यवतमाळमधील ११९३ शेतकरी योजनेतून बाद
हजारो शेतकऱ्यांना मिळणार नाही योजनेचा लाभ
केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी पीएम किसान योजना राबवण्यात आली आहे. या योजनेत शेतकऱ्यांना दर वर्षी ६००० रुपये दिले जातात. या योजनेत आतापर्यंत २१ हप्ते देण्यात आले आहेत. दरम्यान, आता या योजनेतून हजारो शेतकऱ्यांना वगळण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात नाराजी निर्माण झाली आहे.
यवतमाळमधील शेतकऱ्यांना वगळले (Yavatmal 1193 farmers Will Not Recieve PM Kisan Yojana)
यवतमाळ जिल्ह्यात एका कुटुंबात एका पेक्षा जास्त लाभार्थी असणाऱ्या अशा एक हजार 193 लाभार्थ्यांना पीएम किसान योजनेचा लाभातून बाद करण्यात आले आहे. यवतमाळमध्ये पीएम किसान योजनेत दोन लाख 91 हजार 377 पात्र लाभार्थी आहेत. या लाभार्थ्यांच्या खात्यात मदतीची रक्कम जमा केली जाते. या योजनेतील लाभार्थ्यांच्या खात्यात 21 व्या हप्ता जमा करण्यात आला.घरात एकापेक्षा जास्त शेतकऱ्यांची नावे आढळून आल्याने अशा शेतकऱ्यांना वगळण्यात आले आहे.
निकषात न बसल्याने शेतकऱ्यांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत. या योजनेत एका कुटुंबातील फक्त १ व्यक्ती लाभ घेऊ शकतो. मात्र, एकापेक्षा जास्त व्यक्तींनी लाभ घेतल्याने कारवाई केली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांची पडताळणी केली जाते. त्यातून अपात्र लाभार्थ्यांना बाद केले जाते.
पीएम किसान योजनेत शेतकऱ्यांच्या खात्यात २१ हप्ते जमा केले आहेत. मागच्या महिन्यात हे पैसे जमा केले होते. आता पुढचा हप्ता तीन महिन्यात जमा केले जाणार आहेत. या योजनेतील लाभार्थ्यांना हप्ता येण्यापूर्वी केवायसी करणे गरजेचे आहे. जर तुम्ही केवायसी केले नाही तर योजनेचा लाभ मिळणार नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.