ज्यांना गरज आहे त्यांच्या पाठीशी उभे राहण्याची आपली संस्कृती- सुभाष देसाई
ज्यांना गरज आहे त्यांच्या पाठीशी उभे राहण्याची आपली संस्कृती- सुभाष देसाई Saam Tv
महाराष्ट्र

ज्यांना गरज आहे त्यांच्या पाठीशी उभे राहण्याची आपली संस्कृती- सुभाष देसाई

वैदेही काणेकर, सामटीव्ही, मुंबई

दक्षिण मुंबईमधूनSouth Mumbai आज दहा ट्रक पूरग्रस्त भागात मदत म्हणून पाठविले आहेत. त्याच्यामध्ये अत्यावश्यक गोष्टी औषधे, कपडे याप्रकारच्या सर्व वस्तू आहेत. मुंबईकर हे नेहमीच सर्वांच्या मदतीला धावून येतात आजही दहा ट्रक जे आहेत ते दक्षिण मुंबई तर्फे पाठविण्यात आले आहेत. त्याच्यामध्ये अत्यावश्यक गोष्टी औषधMedicine कपडे याप्रकारच्या सर्व वस्तू आहेत. तसेच ज्यांना खरोखर गरज आहे त्यांच्या पाठीशी उभे राहण्याची आपली संस्कृती असून, ज्या लोकांना खरच गरज आहे त्यांच्या पर्यंत आपण केलेली मदत पोहचावी म्हणून या सर्व वस्तू गरजू लोकांच्या घरोघरी जाऊन वाटप केल्या जाणार असल्याची माहिती शिवसेनानेते सुभाष देसाई यांनी दिली.Our culture of standing behind those who need it - Subhash Desai

अतिवृष्टीमुळे झालेल्या पावसाचेHeavy Rain पाणी आजही अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी भरलेलं आहे तसेच यामुळे खूप मोठ्या प्रामाणावर जनतेचे नुकसानझालं आहे. अनेकांचे संसार उद्धवस्त झाले अनेकांच्या घरातील सदस्यमरण पावले आहेत संकट खूप मोठं होतं मात्र संपूर्ण महाराष्ट्र संकटग्रस्तांच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला असल्याचही देसाई म्हणाले.

तसेच तळीयेTaliye Village गावं असो किंवा अन्य ठिकाणी जिथे पुराचा धोका कायम असतो तसेच ज्यांची कुटुंब आता उध्दवस्त झाली आहेत त्या प्रत्येकाचा पुनर्वसन केलं जाणार आहे याबाबतीत मुख्यमंत्री नेहमी बैठका देखील घेत आहेत असल्याचही सुभाष देसाईSubhash desai यांनी सांगितलं तसेच यासाठी चांगली योजना सध्या तयार होत आहे. अनेक उद्योग समूह सध्या पुढे आलेले आहेत आणि त्यांनी देखील घर बांधण्याची तयारी दर्शवली आहे. सर्वच घटकांना मोठ्या प्रमाणात त्रास झाला आहे पण प्रत्येकाच्या पुनर्वसनRehabilitation केलं जाणार असही ते म्हणाले. तसेत माळीणMalin चा अनुभव लक्षात घेऊन त्यापेक्षा चांगलं पुनर्वसन कसं केलं जाईल याची योजना सध्या तयार होतं असल्याचही ते म्हणाले.

पंचनामे सुरु

स्थानिक महसूल विभागातर्फेLocal Revenue Departmen पंचनाम्याचे काम सुरू झाले आहेत. त्यामुळे आम्ही कोणीही जास्त दौरे करायचं नाही असं ठरवलं आहे मुख्यमंत्री स्वतः जात आहेत पण आम्ही नेत्यांनी दौरे कमी करण्याचे ठरवले आहे. उद्योग-धंद्याप्रमाणे व्यापाराऱ्यांचेही मोठे नुकसान केले आहे. दुकानांमध्ये आणि गोदामामध्ये खूप पाणी भरलं होतं. इन्शुरन्स कंपनीने त्यांचे दावे लवकर निकाली काढावेत 50 टक्के रक्कम तरी दिली जावी या संदर्भात सूचना विमा कंपन्यांना करण्यात आलेले आहेत. केंद्र सरकारशी देखील संपर्क साधलेला आहे. आणि सर्व व्यापाऱ्यांच्या पाठीमागे हे सरकार खंबीरपणे उभं असल्याचही ते म्हणाले.

हवी ती मदत करण्याचे पंतप्रधानांचे आश्वासन

केंद्र सरकारCentral Goverment मदतीचा बाबतीत सकारात्मक आहे. त्यांची मदत मिळेल आणि राज्यसरकार पण आहे. केंद्र सरकार पूर्ण ताकदीनिशी उभं राहणार असं पंतप्रधानांनी सांगितला आहे.तसेच कोकणातKokan नवे उद्योग निर्माण व्हावे आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातर्फेMIDC जास्तीत जास्त गुंतवणूक कोकणात जावी यासाठी प्रयत्न सुरू केले असून त्याला चांगला प्रतिसाद देण्यात येत आहे. बल्ब ट्रक पार्क नव्याने एमआयडीसी उभारण्यासंदर्भातल्या कामे सध्या वेगाने सुरू आहेत यातून रोजगार मोठ्या संख्येने तयार होतील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Edited By- Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics 2024 : भुजबळ नाराज, महायुतीला टेंशन?; महाजनांची भुजबळ फार्मवर दीड तास चर्चा

Health Tips: वजन कमी करण्यासाठी भोपळ्याचे करा अशापद्धतीने सेवन, दिसेल लवकर रिझल्ट

Lok Sabha Election: 'मोदी-राज' सभेनंतर उद्धव ठाकरे सुपरफास्ट, मुंबईत एकाच दिवशी 4 सभांचा धडाका

Maharashtra Politics 2024 : 'अजित पवारांवरील आरोप सिद्ध झाले नाहीत'; फडणवीसांची अजितदादांना जाहीर क्लीन चिट

Lord Shiva: महादेवाच्या पिंडावर थेंब-थेंब पाणी टाकणारे कलश का ठेवलं जातं?

SCROLL FOR NEXT