Culprit Arrested Saam Tv
महाराष्ट्र

Latur : तिरूपतीला निघालेले दरोडेखोर जेरबंद; एमआयडीसी पाेलिसांची कारवाई

या प्रकरणातील तीन आरोपींना यापूर्वीच अटक केलेली आहे अशी माहिती आज पोलिस उपनिरीक्षक संदीप कराड यांनी दिली.

दीपक क्षीरसागर

लातूर : लातूर (latur) तालुक्यातील भूईसमुद्रा येथील एक वेअरहाऊसवर दरोडा टाकून १ लाख ७० हजार रुपये किंमतीचे सोयाबीनचे १४० कट्टे व १२ हजार रुपयांची रोकड दरोडेखोरांनी लंपास केल्याची घटना १७ जून रोजी घडली होती. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी नुकतेच नऊ जणांना ताब्यात घेतले आहे. (Latur Crime News)

या गुन्ह्यातील संशयित आरोपी एक खासगी बस भाड्याने करून तिरूपतीला देवस्थानला जात असल्याची गुप्त माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळाली. त्यानंतर पाेलिसांनी लातूरच्या पाच नंबर, शहीद वीर भगतसिंग चौकात सापळा रचला.

रात्री नऊच्या सुमारास बस चौकात येताच पोलिस उपनिरीक्षक संदिप कराड व त्यांच्या पथकाने बसवर ताबा मिळवत संशयितांसह बस थेट ठाण्यात नेली. यामध्ये आठ अट्टल गुन्हेगारांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. आठपैकी चार संशयित हे ढोकी पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील असल्याने त्यांना ढोकी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

इतर चार संशयित आरोपी अनिल बप्पा काळे, आकाश उर्फ तोब्या मधू पवार, राहुल तानाजी पवार सर्व रा. पळसप ता. जि.धाराशिव हे भूईसमुद्रा येथील वेअर हाऊस दरोडा प्रकरणातील असून एमआयडीसी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणातील तीन आरोपींना यापूर्वीच अटक केलेली आहे अशी माहिती आज पोलिस उपनिरीक्षक संदीप कराड यांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan : बौद्धभूमी फाउंडेशन प्रकरणात मोठी अपडेट; श्रीकांत शिंदेंनी KDMC आणि MMRDA ला दिले सखोल चौकशीचे आदेश

कर्जमाफीच्या अटी, शेतकऱ्यांसाठी कटकटी; केवळ 17 लाख शेतकऱ्यांनाच संपूर्ण कर्जमाफी?

'मोदींचे सरकार जाणार, आणीबाणी येणार'; राहुल गांधींचा खळबळजनक दावा

Fact Check: शाहरूख खान कॉकरोच जनता पार्टीत जाणार? लवकरच पार्टी जॉईन करण्याची घोषणा?

फुले दिले की फुलेच मिळतात, कुणी टीका केली, तरी शांत राहायचं; जॅकी श्रॉफ असे का म्हणाले?

SCROLL FOR NEXT