Dhananjay Munde In NCP Melava saamtv
महाराष्ट्र

dhananjay Munde: वैर माझ्याशी होतं तर माझ्या मातीची बदनामी का? 200 दिवसांनंतर विरोधकांना धनंजय मुंडेंचे उत्तर

dhananjay Munde In NCP Melava: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत बीडमध्ये निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात धनंजय मुंडेंनी विरोधकांच्या टीकेला उत्तर दिलंय.

Bharat Jadhav

बऱ्याच दिवसांनी मी बोलतोय. न बोलण्याची डबल सेंच्युरी माझी झाली आहे. 200 दिवस न बोलता काढले आहेत. या दिवसात जे काही घडलं त्यात मला एक गोष्ट जिव्हारी लागली. ती म्हणजे आपल्या बीड जिल्ह्याची बदनामी. माझ्याशी वैर होतं तर माझ्या मातीची बदनामी का? असं सवाल करत धनंजय मुंडेंनी विरोधकांना उत्तर दिलं. ते बीडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या निर्धार मेळव्यात बोलत होते.

या मेळाव्यातून धनंजय मुंडे यांनी विरोधकांवर निशाणा साधला. मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून धनंजय मुंडेंवर आरोप केले जात होते. या आरोपांवरून त्यांना आपल्या पदाचा राजीनामा ही द्यावा लागला होता. वाल्मीक कराडचे त्यांच्याशी असलेले संबंधामुळे विरोधकांनी धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली होती. या सर्व प्रकरणाला तब्बल २०० दिवस झालेत. या २०० दिवसानंतर त्यांनी आपल्या विरोधकांना उत्तर दिलं.

आज २०० दिवसांनी बोलतोय, येथे बोलावं की मैदानात, हा प्रश्न माझ्या मनात होता. म्हणून आज आपल्या सर्वांचे क्षमा मागून येथे आपण ज्या कामासाठी आलेलो आहोत ते माहित आहे. आजपर्यंत ते करत आलोय हेदेखील आपल्याला माहितीये. बीडचा आगळावेगळा इतिहास आपल्या संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्राला दाखवावा याच अपेक्षेने ते आज आलेत. आपण सर्वजण मिळून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बीड जिल्ह्याबाबत असणारी अपेक्षा नक्की पूर्ण करू, असं वचन आपण तटकरे साहेबांना देऊ, असं धनंजय मुंडे यावेळी म्हणाले.

यावेळी बोलताना धनंजय मुंडे यांनी त्यांच्यावर टीका करणाऱ्यांना शेरो-शायरीतून उत्तर दिलं. ज्यांनी बाहेरून येऊन या जिल्ह्यात मधल्या काळात एक घटना, एक व्यक्ती, एक जिल्हा, एक माती, एक मतदारसंघ अशा पद्धतीने बदनामी केली. त्यांच्याविषयी आपण चार ओळी म्हणणार आहोत. 'तुम्हारी सोच के सांचे में ढल नहीं सकता, जुबान काट लो लहजा बदल नही सकता, अरे मुझे भी मोम का पुतला समझ रहे हो क्या? तुम्हारे लोह से ये लोहा पिघल नहीं सकता', अशी शायरी करत धनंजय मुंडे यांनी विरोधकांना आपण पराजित झालो नाही. खचलो नाही असं ठणकावून सांगितलं.

माझ्या मातीची बदनामी का?

न बोलण्याची डबल सेंच्युरी माझी झालीय. जवळपास 200 दिवस न बोलता काढलेत. या दोनशे दिवसांमध्ये ज्या गोष्टी झाल्या, त्यापैकी एक गोष्ट मला जिव्हारी लागली. ती म्हणजे आपल्या बीड जिल्ह्याची बदनामी. ज्यांनी कोणी केली, मग तो बीडच्या मातीतला असेल, किंवा बीडच्या बाहेरचा असेल, त्यांना एवढंच सांगायचं वैर जर माझ्याशी होतं तर माझ्या या मातीची बदनामी का? असा सवाल त्यांनी केलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eknath Shinde : मराठा आरक्षण आंदोलनाच्या पडद्यामागं कोण होतं? एकनाथ शिंदे म्हणाले...VIDEO

Pune Ganeshutsav : पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणुकीबाबत पोलिसांचा मोठा निर्णय

बलात्कार पीडितेला आरोपीच्या घरी पाठवलं, नराधमानं पुन्हा केले अत्याचार, बालकल्याण समितीच्या अध्यक्षांसह १० जणांवर गुन्हा

HIV: एचआयव्हीच्या रुग्णांनी चुकूनही करु नये 'या' गोष्टी, अन्यथा...

Maratha Reservation: मुंबईत आंदोलनांवर बंदी घालावी; मिलिंद देवरांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

SCROLL FOR NEXT