नवी मुंबई : नवी मुंबईकरांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. शहरात उद्या म्हणजे मंगळवारी पाणी पुरवठा बंद राहणार आहे. तर बुधवारी कमी दाबाने आणि अपुऱ्या प्रमाणात पाणी पुरवठा होणार आहे. त्यामुळे पाणी जपून वापरण्याचे आवाहन महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागानं केलं आहे.
पाणी पुरवठा बंद असल्याचं कारण काय?
नवी मुंबईत उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी कपात केली जाते. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या स्त्रोतांमध्ये पाणी कमी झाल्याने दरवर्षी हा निर्णय घेतला जातो. मात्र, आता पालिकेचा पाणी पुरवठा योग्य असताना हा देखील उद्या शहरातील काही भागात पाणी पुरवठा बंद करण्याचा निर्णय करण्यात आला आहे.
नवी मुंबई शहरातील बेलपाडा मेट्रो स्टेशनजवळ मोरबे मुख्य जलवाहिनीला झालेल्या पाणी गळतीच्या दुरुस्ती काम महापालिकेनं हाती घेतलं आहे. त्यामुळे शहरातील म्हणजेच, नेरुळ, वाशी, तुर्भे, सानपाडा, कोपरखैरणे, घणसोली आणि ऐरोली विभागात देखील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. उद्या सकाळी १० ते रात्री ८ वाजेपर्यंत अशाप्रकारे १० तास पाणी पुरवठा बंद राहणार आहे.
नवी मुंबई शहरातील बेलपाडा मेट्रो स्टेशनजवळ मोरबे मुख्य जलवाहिनीला झालेल्या पाणी गळतीच्या दुरुस्ती काम महापालिकेनं हाती घेतलं आहे. त्यामुळे शहरातील म्हणजेच, नेरुळ, वाशी, तुर्भे, सानपाडा, कोपरखैरणे, घणसोली आणि ऐरोली विभागात देखील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. उद्या सकाळी १० ते रात्री ८ वाजेपर्यंत अशाप्रकारे १० तास पाणी पुरवठा बंद राहणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.