suvarnkar samaj demands bacchu kadu resignation 
महाराष्ट्र

बच्चू कडू राजीनामा द्या; सुवर्णकार समाजाची मागणी

साम टिव्ही ब्युरो

नाशिक : सुवर्णकार समाजाच्यावतीने आज (मंगळवार) राज्यमंत्री बच्चू कडू bacchu kadu यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. आंदाेलनकर्त्यांनी बच्चू कडू राजीनामा द्या अशी घोषणाबाजी करीत सराफ बाजारातील सोन्या मारुती चौक परिसर दणाणून साेडला. (nashik-suvarnkar-samaj-demands-bacchu-kadu-resignation-sml80)

बच्चू कडू यांनी काही दिवसांपूर्वी येथील आडगावकर कुटुंबियांची घेतली होती. रसिका अडगावकर आणि आसिफ खान यांच्या लग्नाला पाठिंबा दर्शवला होता. त्यावेळी हिंदू सुर्वणकार समाजाबाबत मंत्री कडू यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने हे आंदाेलन करीत असल्याचे आंदाेलकांनी स्पष्ट केले.

नाशिक येथील रसिका अडगावकर आणि आसिफ खान यांच्या लग्नाला काही हिंदू संघटनांनी विरोध केला. त्यानंतर दाेन्ही कुटुंबीयांनी हा लग्न सोहळा रद्द केला हाेता. दरम्यान या लग्नास राज्यमंत्री बच्चू कडू यांनी पाठिंबा दिला हाेता. त्यावेळी मंत्री कडू यांनी हिंदू सुवर्णकार समाजाबद्दल काही वक्तव्य केली. ही वक्तव्य आक्षेपार्ह असल्याचे सुवर्णकार समाजाचे म्हणणे आहे.

बच्चू कडू यांच्यामुळे सामाजिक स्वास्थय बिघडले आहे. त्यांचा वक्तव्याचा निषेध करण्यासाठी आज (मंगळवार) सुवर्णकार समाजाच्यावतीने सराफ बाजारातील सोन्या मारुती चौक परिसरात आंदाेलन करण्यात आले. यावेळी मंत्री कडू यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली suvarnkar samaj demands bacchu kadu resignation.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL 2026 : आयपीएलच्या १० संघांचे कॅप्टन ठरले, तुमच्या फेव्हरिट टीमचा कर्णधार कोण? जाणून घ्या

भाजप खासदारासाठी अडीच महिने बंद असलेले भीमाशंकर मंदिर दर्शनासाठी केले खुले

Chaitra Navratri Recipes: चैत्र नवरात्रीला गॅस न वापरता करा उपवासाचे हे सोपे पदार्थ

Mumbai : मुंबईत भरस्त्यात टॅक्सी चालकाकडून तरुणाची हत्या, नेमकं काय घडलं?

Maharashtra Live News Update: सिलिंडर तुटवड्यामुळे जळगावतील वरण बट्टी हॉटेल व्यवसायिक चुलीकडे वळले

SCROLL FOR NEXT