अजय सोनवणे
नाशिक : कांद्याच्या दरात मागील काही दिवसांपासून सातत्याने घसरण होत आहे. यामुळे शेतकरी हतबल झाला असून कांद्याच्या दरात होत असलेल्या घसरणीमुळे नाशिकच्या सटाण्यात कांदा उत्पादक आक्रमक झाले आहेत. संतप्त कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी गळ्यात कांद्याच्या माळा घालून रास्ता रोको आंदोलन केले आहे. यामुळे महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे खोळंबली होती.
कांद्याच्या दरात घसरण होत असल्याने शेतकऱ्यांचे यात नुकसान होत आहे. भाव वाढीच्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी कांदा साठवून ठेवला आहे. मात्र दर वाढत नसल्याने अखेर शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. दरम्यान नाशिक जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच सगळ्या शेतकरी संघटना कांद्याच्या प्रश्नी एकत्र येत बागलाणमध्ये रस्त्यावर उतरल्या आणि रास्ता रोको केला आहे.
कांदा लोड केल्यास ट्रक जाळण्याचा प्रयत्न
डॉक्टर राहुल सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. रयत क्रांती शेतकरी संघटना, प्रहार शेतकरी संघटना, बागलाण शेतकरी संघटना, कांदा उत्पादक शेतकरी संघटना या चार संघटना एकत्र येत कांद्याला कमी दर, नाफेड nccf कडून शेतकऱ्यांची फसवणूक अशा विविध मागण्यासाठी रास्ता रोको केला. तर ट्रक टार्न्सपोर्ट युनियनला यांना विनंती केली की तुम्ही नाफेड आणि nccf चा कांदा लोड करून नका अन्यथा ट्रक जाळण्याचा इशारा देखील यावेळी देण्यात आला.
शेतकऱ्यांची घोषणाबाजी
कांदा उत्पादक शेतकरी संघटनेतर्फे सटाणा येथील शिवतीर्थावर विंचूर - प्रकाशा महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी गळ्यात कांद्याच्या माळा घालून संतप्त शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत सुमारे दीड तास रास्ता रोको आंदोलन केला. यावेळी दुतर्फा वाहतूक ठप्प झाली होती. तर नाफेडची कांदा खरेदी थांबवावी, कांद्यासाठी भावातर योजना लागू करावी; अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.