Bribe Trap Saam tv
महाराष्ट्र

Bribe Trap: नाकाबंदी करत अडवलेले वाहन सोडवण्यासाठी एक लाखाची मागणी; पोलीस हवालदारासह साथीदाराला अटक

Rajesh Sonwane

तबरेज शेख 

नाशिक : रस्त्यावर नाकाबंदी करत वाहन अडविले होते. हे वाहन सोडविण्यासाठी पोलीस हवालदाराने एक लाख रुपयांची (Bribe) मागणी केली. मागणी केलेल्या रक्कमेत ३५ हजार रुपये वाहन धारकांकडून (Nashik) स्वीकारताना पोलीस हवालदाराशी एका व्यक्तीला लाच लुचपत विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. (Breaking Marathi News)

नाशिक तालुका पोलीस ठाणे अंतर्गत असलेल्या विल्होळी पोलीस (Police) चौकी येथे हवालदार रवींद्र मल्ले आणि त्याचा साथीदार (खाजगी व्यक्ती) मोहन तोडी या दोन जणांना एसीबीने अटक केले. नाकाबंदी करत करत अडवलेले वाहन सोडवण्यासाठी तक्रारदाराकडे संशयित लाचखोर हवालदार रवींद्र मल्ले याने मोहन तोडी याच्या मध्यस्थीने एक लाख रुपये लाचेची मागणी केली होती. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यानंतर पथकाने सापळा रचला होता. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

रंगेहाथ पकडले 

एक लाखाची मागणी केल्यानंतर तडजोडीअंती ७० हजार रुपये देण्याचे ठरले. या रक्कमेपैकी ३५ हजार रुपयांची लाच स्वीकारत असताना पथकाने धाड टाकत दोन जणांना रंगेहाथ अटक करण्यात आले आहे. नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली आहे. या दोन्ही संशयितांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

Employees Provident Fund: PF खातेधारकांसाठी मोठी बातमी; पीएफमधून काढता येणार १ लाख रुपये

Solapur News: धर्मराज काडादी यांनी विधानसभा लढवण्याची केली घोषणा, सोलापूरमधून उमेदवारीसाठी शिंदेंना घातलं साकडं?

Ratnagiri Killing Case : स्वप्न पडलं, डेड बॉडीचं गूढ उलगडलं? रत्नागिरीतील हत्याकांडाचा सस्पेन्स उलगडणार? पाहा व्हिडिओ

Tirupati Laddoos: 'तिरुपती बालाजीच्या लाडूंमध्ये चरबीचा वापर'; सीएम चंद्राबाबू नायडूंचा रेड्डी यांच्या सरकारवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT