Nashik Accident Saam Digital
महाराष्ट्र

Nashik Accident : कसारा घाटात भीषण अपघात; वाहन थेट खोल दरीत कोसळलं, ५ जणांचा मृत्यू | VIDEO

Sandeep Gawade

शहापूर तालुक्यातील नवीन कसारा घाटात आज भीषण अपघात झाला आहे. नाशिकहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनरवरचा चालकाचा ताबा सुटून कंटेनर थेट कसारा घाटातील खोल दरी कोसळला होता. कंटेनरमधून प्रवास करणारे पाच प्रवासी अडकून कडले होते. मात्र यातील पाचही जणांचा मृत्यू झाला असून तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आलं आहे. अजून दोघांचे मृतदेह बाहेर काढण्याचं काम सुरू आहे. यात एका लहान मुलाचाही समावेश आहे.

श्लोक जायभाय (वय 9, रा. नालासोपारा), अक्षय गुगे (वय 30, रा . नवी मुंबई ), अनिकेत वाघ (वय 21 रा .सिन्नर) या तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. यात मुंबईतील दोघांचा समावेश आहे.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, नवीन कसारा घाटातील बलगर पाॅईटजवळ हा भीषण अपघात झाला होता. कंटेनर ५ प्रवाशांना घेऊन नाशिकहून मुंबईच्या दिशेने जात होता. दरम्यान कंटनेर शहापूर तालुक्यातील कसारा घाटात आला होता. या ठिकाणी घाट रस्त्याला मोठा उतार आहे. त्यामुळे अंदाज न आल्यामुळे चालकाचा कंटेनरवरचा ताबा सुटला आणि कंटेनर थेट खोल दरीत कोसळला. यात कंटेनरमधील ५ ही जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात मुंबईतील दोघांचा समावेश असून एका ९ वर्षांच्या मुलाचाही मृत्यू झाला आहे.

दरम्यान अपघात झाल्याची माहिती मिळताच पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन टीम घटनास्थळी दाखल होऊन मदतकार्य सुरू केले आहे. यात आतापर्यंत तीन जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आलं आहे.तर दोघांचे मृतदेह बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. बाहेर काढण्यात आलेले मृतदेह पोस्ट मार्टमसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

Maharashtra Politics: महायुतीचं बेताल त्रिकूट; देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याला नेत्यांकडून हरताळ

Save Mangroves : कांदळवन सुरक्षेसाठी १२० कोटी; १९५ ठिकाणं, ६६९ CCTV कॅमेरे, सरकारचा प्लान की पांढरा हत्ती?

SCROLL FOR NEXT