Navi Mumbai News Saam Digital
महाराष्ट्र

Navi Mumbai News : जहाज बुडालं..कागदपत्र हरवली; इराणमध्ये अडकलेल्या नाशिकच्या तरुणांची थरारक कहाणी

Marine Jobs : इराणमध्ये जहाजावर नोकरीसाठी गेलेले नाशिकमधील दोन तरुण कुवेतच्या किनाऱ्यावर बुडालेल्या जहाजातून सुदैवाने बचावले होते. मात्र त्यांच्याकडील पासपोर्ट आणि इतर कागदपत्रे हरवल्यामुळे तेथील तरुंगात ते अडकून पडले होते.

Sandeep Gawade

Navi Mumbai News

इराणमध्ये जहाजावर नोकरीसाठी गेलेले नाशिकमधील दोन तरुण कुवेतच्या किनाऱ्यावर बुडालेल्या जहाजातून सुदैवाने बचावले होते. मात्र त्यांच्याकडील पासपोर्ट आणि इतर कागदपत्रे हरवल्यामुळे तेथील तरुंगात ते अडकून पडले होते. नवी मुंबईतील ऑल इंडिया सीफेरर्स युनीयनने केलेल्या पाठपुराव्यामुळे या दोन तरुणांची सुटका झाली आहे. नुकताच हे दोन्ही तरुण मुंबईत सुरखरुप परतले आहेत.

अविष्कार जगताप व निवृत्ती बागूल अशी सुटका झालेल्या तरुणांची नावे असून हे दोघेही नाशिक येथे राहणारे आहेत. या दोघांना डिसेंबर 2023 मध्ये एक एजंटने इराण देशात नोकरीसाठी पाठवले होते. इरामधील जहाजावर काम करत असताना 19 जानेवारी रोजी कुवेतच्या समुद्र किनाऱ्यावर जहाज बुडाले होते. त्यावेळी जहाजावरील सर्वजण बुडाले मात्र अविष्कार आणि निवृत्ती हे दोघे बोटीतून सुखरुप किनाऱ्यावर पोहोचले होते. त्यानंतर कुवेतमधील पोलिसांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र जहाज बुडाल्यामुळे अविष्कार व निवृत्ती या दोघांचे पासपोर्ट व इतर कागदपत्रे हरविल्याने त्यांच्याकडे कोणतीही कागदपत्रे नसल्यामुळे त्यांना तुरुंगात टाकण्यात आले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

ही बाब अविष्कार व निवृत्ती यांच्या कुटुंबियांना समजल्यानंतर त्यांनी या दोघांना सोडविण्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न सुरु केले होते. या दोघांच्या कुटुंबियांना ऑल इंडिया सिफेरर्स यूनियन बाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी युनीयनचे कार्याध्यक्ष अभिजित सांगळे व अध्यक्ष संजय पवार यांच्याशी संपर्क साधून अविष्कार व निवृत्ती या दोघांना सोडविण्यासाठी मदत करण्याची विनंती केली. त्यानंतर युनियनने कुवेतमधील भारतीय भारतीय दुतावास व परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधून त्यांच्याकडे पाठपुरवा केला. त्यामुळे भारतीय दुतावासाने या दोन्ही तरुणांना तुरुंगातून बाहेर काढून त्यांना भारतात पाठवून दिलें. शुक्रवारी 1 मार्च रोजी हे दोन्ही तरुण मुंबईत दाखल झाल्यानंतर त्यांनी प्रथम नवी मुंबईत येऊन सिफेरर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.

परदेशात नोकरीसाठी पाठवण्यात सक्रीय असलेले काही बोगस एजंट नोकरीची गरज असलेल्या तरुणांना इराण, मलेशिया, दुबई, सौदी अरेबिया सारख्या देशांमध्ये पाठवतात. या बोगस दलालांच्या माध्यमातून जहाजावर गेलेल्या तरुणांची कागदपत्रे काढून घेतली जातात. त्यामुळे अनेक तरुण तेथे अडकतात. अशा प्रकारे तरुणांना गुलामगीरीत ढकलणाऱ्या दलालांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी सिफेरर्स यूनियनने नवी मुंबई पोलीस आयुक्तांकडे केल्याची माहिती युनियनचे अध्यक्ष संजय पवार यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: ६१ हजार लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची भेट नाही,₹१५०० जमा झालेच नाही; कारण काय?

पोटाचे टायर्स दिसतात, शरीर सुटतच चाललंय? पाण्यात मिसळा '१' पदार्थ, बाबा रामदेव सांगतात झरझर घटेल वजन

Maharashtra Live News Update: सतीश भोसले उर्फ खोक्याला जामीन मंजूर

'द लायन किंग'ला Mahavatar Narsimha पछाडणार; रक्षाबंधनला मोडले अनेक रेकॉर्ड, कलेक्शनचा आकडा किती?

...अन् एकनाथ शिंदे सुसाट धावत सुटले; उपमुख्यमंत्र्यांचा मॅरेथॉनचा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT