Narayan Rane Saam Tv
महाराष्ट्र

Narayan Rane News:'मला माफ करा...' नारायण राणेंनी मागितली ठाकरेंची माफी, भावनिक पत्र व्हायरल

केंद्रिय मंत्री नारायण राणे यांनी सोशल मीडियावरुन बाळासाहेबांची माफी मागितली आहे, त्यांची ही पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आहे.

Gangappa Pujari

Mumbai: हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंतीनिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त देशभरातील नेत्यांनी सोशल मीडियावरुन मानवंदना दिली आहे. अनेक नेत्यांनी सोशल मीडियावरुन त्यांच्या भावना व्यक्त केली असतानाच केंद्रिय मंत्री नारायण राणे यांनी सोशल मीडियावरुन बाळासाहेबांची माफी मागितली आहे, त्यांची ही पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आहे. (Balasaheb Thackeray)

केंद्रिय मंत्री नारायण राणे यांनी ट्विटरवर पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तुम्ही आजारी असताना मला तुम्हाला भेटायचं होतं. तुम्हाला शेवटचं पाहायचं होतं. पण साहेब, मी तुम्हाला शेवटचा नमस्कारही करू शकलो नाही. मला क्षमा करा, अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

नारायण राणे यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर दोन पानी पत्र पोस्ट केले आहे. या पत्रात त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला आहे. तसेच मनातील भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. शेवटच्या काळात बाळासाहेब आजारी असताना त्यांना भेटण्यासाठी… त्यांना शेवटचं पाहण्यासाठी मनाची कशी घालमेल झाली होती. आपण कसे अस्वस्थ झालो होतो, याचं वर्णन राणे यांनी या पत्रातून केलं आहे.

नारायण राणेंच भावनिक पत्र..

आदरणीय बाळासाहेबांच्या निधनाचं वृत्त मी टेलिव्हिजनवर पाहिलं. माझ्या हृदयात भावनांचा कल्लोळ उसळला होता आणि त्यांच्यासोबत घालवलेल्या कितीतरी क्षणांच्या आठवणीनं माझे डोळे ओलावले होते. माझ्या आत उचंबळून येणाऱ्या भावनांना मी कागदावर शब्दांतून मांडण्याचा प्रयत्न केला.

सेना सत्तेवर आहे की नाही या गोष्टीचा त्यांच्यावर कधी परिणामच झाला नाही. ते नेहमीच आपली बोलण्यावागण्याची राजेशाही शैली तशीच राखून असत. त्यांच्यासारखे खरोखर तेच एकमेव होते. आपल्या काम करण्याच्या खास पद्धतीमुळे त्यांना राष्ट्रीय पातळीवर प्रतिष्ठा मिळालेली होती.

या पत्रात शेवटी नारायण राणे आपल्या शेवटच्या दिवसात त्यांची मृत्यूशी झुंज सुरू होती. मला वाटलं ते याही वेळेस मृत्यूला चकवून बरे होतील. पण ते आपल्यातून निघून गेले. मी घेतलेल्या निर्णयानं त्यांना खूप यातना झाल्या असणार आणि त्याबद्दल मला आजन्म दुःख राहणार आहे. पण त्या परिस्थितीत माझा नाईलाज होता. काही लोकांच्या मुळं मला तो निर्णय घेणं भाग पडलं. असो. आता त्याबद्दल बोलून काही फायदा नाही, असेही ते म्हणतात.

"त्यांना शेवटचं पहाण्याची संधी मला मिळू शकली नाही आणि ते आपल्यातून निघून गेले. साहेब! मी आपल्याला शेवटचा नमस्कारही करू शकलो नाही. मला क्षमा करा,"असे म्हणत पत्राच्या शेवटी बाळासाहेबांची माफी मागितली आहे. (Narayan Rane)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Viral News : मुंबईतील रेल्वे स्थानकाबाहेर अर्ध्यारात्री जोडप्याचे अश्लील चाळे; व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कारवाईची मागणी

Maharashtra News Live Update: श्रीरामपूर येथील भोंदू अशोक आढावला 14 मे पर्यंत पोलीस कोठडी

Census 2026 : स्व-गणना पूर्ण करणारं कोकणातलं हे गाव पहिलं ठरलं

ड्रायव्हिंग लायसन्स एक्सपायर झालंय? वेळीच करा रिन्यूअल,नाहीतर येईल डोक्याला हात लावण्याची वेळ; जाणून घ्या प्रोसेस

पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार, महागाईचा भडका उडणार? PM मोदींच्या विधानामागे काय आहेत आर्थिक कारणे?

SCROLL FOR NEXT