Mahavitaran Bill Saam tv
महाराष्ट्र

Mahavitaran Bill : भर उन्हाळ्यात महावितरणचा ग्राहकांना शॉक; रिडींग न घेताच सरासरी बिल

Nandurbar News : अधिकृत वीज कनेक्शन घेतलेल्या ग्राहकांना नियमानुसार मीटर रिडींग घेऊन बिल आकारणी करणे आवश्यक आहे

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 

नंदुरबार : महावितरणचा अजब कारभार शहाद्यामध्ये पाहण्यास मिळत आहे. घरोघरी जाऊन मीटरचे रिडींग न घेता ग्राहकांना सरासरी बिलाची आकारणी केली जात आहे. हा प्रकार मागील चार- पाच महिन्यांपासून केला जात आहे. यामुळे अव्वाच्या सव्वा बिल येत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत.  

अधिकृत वीज कनेक्शन घेतलेल्या ग्राहकांना नियमानुसार मीटर रिडींग घेऊन बिल आकारणी करणे आवश्यक आहे. मात्र नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यातील शहादा शहरात वीज वितरण कंपनीकडून शहरातील नियमित वीज ग्राहकांना सरासरी वीज बिले पाठवून अव्वाच्या सव्वा वीज बिल वसूल केले जात आहे. मीटर सुरू असूनही ग्राहकांना सरासरी बिल पाठविल्याने ग्राहकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. 

वीज वितरण (Mahavitaran) कंपनीकडून जानेवारी महिन्यापासून अत्याधुनिक वीज मीटर बसविण्यासोबत नवीन तंत्रज्ञानाने प्रत्यक्ष रिडिंग न घेता डिजिटल वीज बिल ग्राहकांना दिले जात आहे. गेल्या तीन- चार महिन्यांपासून नियमित वीज ग्राहकांना प्रत्यक्ष रिडिंग न घेता वीज वितरण कंपनीकडून सरासरी वीज बिलांचे वाटप केले जात आहे. या बिलांवर वीज रिडिंग उपलब्ध नाही; असे नमूद करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

SET Exam Update : विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! SET परीक्षा पुढे ढकलली, नेमकं कारण काय? कधी होणार परीक्षा? वाचा A to Z अपडेट्स

Sindhudurg Tourism : मालदीव विसरा! महाराष्ट्रातच आहे 'हा' निसर्गरम्य समुद्रकिनारा, पावसाळ्यात दिसतं आरशासारखं निळेशार पाणी

Salman Khan : सलमान खानने विकले मुंबईतील आलिशान घर; किती कोटींमध्ये झाली डील, आकडा पाहून व्हाल चकित

Maharashtra News Live Update: आंदोलनात सहभागी झाल्याने शिक्षकांचा एक दिवसाची पगार कापणार

Weather Update: पावसाची विश्रांती, उन्हाचा चटका वाढला; राज्यात मान्सून कमकुवत का झाला? हवामान विभागानं कारण सांगितलं

SCROLL FOR NEXT