Nandurbar Water Crisis Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar News : पावसाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी आदिवासी महिलांची भटकंती; पाणी योजना अपूर्ण असल्याने प्यावे लागतेय दुषित पाणी

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 

नंदुरबार : केंद्र आणि राज्य सरकारने हर घर नल हर घर जल अर्थात जलजिवन मिशनचे काम सुरु केले. कामाला दीड वर्ष झाले तरी योजना पूर्ण होत नसल्याने नागरिकांना झऱ्याचे दुषित पाणी प्यावे लागत असल्याचे वास्तव नवापूर तालुक्यातील वांझळे गावात पाहण्यास मिळत आहे. योजना अपूर्ण असल्याने पावसाळ्याच्या दिवसात पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. 

नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर (Navapur) तालुक्यातील वांझळे गावात पाण्याची मोठी समस्या उद्भवलेली आहे. भर पावसाळ्यात गावातील आदिवासी महिलांना दीड ते दोन किलोमीटर अंतरावरून नदीच्या पात्रात झिरा करून अशुद्ध पाणी पिण्यासाठी वापरावे लागत आहे. अशुद्ध पाण्यामुळे गावातील अनेक नागरिकांना साथीच्या आजारांचा समाना करवा लागत आहे. हि अवस्था गेल्या (Water Crisis) दीड दोन वर्षापासून असून गावाची जलजिवन मिशनचे काम कधी पूर्ण होईल? असा सवाल गावातील महिला विचारत आहे.

नेते, अधिकाऱ्यांनी पाणी पिऊन दाखवा 
गावातील आदिवासी महिलांना सर्व कामे सोडून पिण्याचा (Nandurbar) पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. झिरो कोरून आणलेले जे पाणी पितो ते पाणी राजकीय नेत्यांनी आणि शासकीय अधिकाऱ्यांनी पिऊन दाखवावे. दिवस भरात झिरामध्ये जे पाणी गोळा होते, ते आम्ही आणतो आणि पितो. आमच्या गावातील जल जिवन मिशनचे काम करणारा ठेकेदार काम अपूर्ण सोडून गेला आहे. ते काम कधी पूर्ण होईल त्या ठेकेदारावर कारवाई कधी होणार? सर्व अधिकारी आणि नेते ठेकेदारांना पाठीशी तर घालत नाहीना असा प्रश्न या निमिताने उपस्थित केला जात आहे. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tirupati Laddoos: 'तिरुपती बालाजीच्या लाडूंमध्ये चरबीचा वापर'; सीएम चंद्राबाबू नायडूंचा रेड्डी यांच्या सरकारवर गंभीर आरोप

STREE 2 च्या कोरिओग्राफरला केली अटक, अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप

Ajit Pawar: वाचाळवीरांनी मर्यादा पाळाव्यात; अजित पवारांनी CM शिंदेंसमोरच आमदारांचे टोचले कान

Friday Horoscope: शुक्रवारी या 5 राशींचे नशीब फळफळणार, देवी लक्ष्मीची होणार कृपा; वाचा राशिभविष्य

Maharashtra News Live Updates: राज्य सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! बँकेच्या कर्मचाऱ्यांना आजीवन मिळणार १०००० रुपये पेन्शन

SCROLL FOR NEXT