Nandurbar News Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar News : नंदुरबार दंगल..दगडफेक करणाऱ्या ४० जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात; शहरात तणावपूर्ण शांतता

Nandurbar News : नंदुरबार शहरात दोन गटात दगडफेकीची घटना घडली होती. त्यामुळे माळीवाडा परिसरातील नागरिकांचे मोठे नुकसान झाले असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 
नंदुरबार
: नंदुरबार शहरात काल अफवेमुळे दगडफेक होऊन दंगल उफाळून आली होती. नंदुरबार शहरात झालेल्या दंगलीनंतर तणावपूर्ण शांतता आहे. दंगल करणाऱ्या आरोपींवर नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दगडफेक करणाऱ्या चाळीस जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

नंदुरबार (Nandurbar News) शहरात दोन गटात दगडफेकीची घटना घडली होती. त्यामुळे माळीवाडा परिसरातील नागरिकांचे मोठे नुकसान झाले असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. ईद- ए- मिलादच्या जल्लोष मिरवणूक दरम्यान हा सर्व प्रकार घडला होता. त्यामुळे परिसरात तणाव पाहायला मिळत आहे. पोलिसांकडून या सर्व परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात आले असून, यासाठी जिल्हा पोलीस (Police) दलासोबतच राज्य राखीव दलातील दाखल झाले आहेत. माळीवाडा, इलाई चौक परिसरामध्ये आज देखील तणावपूर्ण शांतता पसरली आहे.  

शहरात घडलेल्या दंगलीच्या प्रकारानंतर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला असून दगडफेक करण्यात आरोपींना पकडण्याची प्रक्रिया सुरू आहे. यात आतापर्यंत ४० जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर दंगल करणाऱ्या आरोपींवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे संकेत पोलिस दलाकडून देण्यात आलेले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

August New Rules : 1 ऑगस्टपासून 5 मोठे नियम लागू; LPG सिलेंडर स्वस्त, तत्काळ तिकीट बुकिंगपासून KYC पर्यंत मोठे बदल

तुम्ही 10 घेतले, आम्ही 100 घेतले; पक्षप्रवेशावरून शिंदेसेना-भाजप आमने-सामने, महायुतीत अंतर्गत कलह उफाळला

Paper Leak Protest : पेपर फुटीविरोधात पुन्हा विद्यार्थ्यांचा संताप; पंजाबच्या शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

Spider Bite: कोळ्याने दंश केला तर काय होऊ शकतं?

Maharashtra News Live: आजच्या युवकांनी विचार करण्याची गरज आहे- अजित डोवाल

SCROLL FOR NEXT