Rain 
महाराष्ट्र

अवकाळी व थंडीमुळे 20 हून अधिक मेंढ्या दगावल्या

अवकाळी व थंडीमुळे 20 हून अधिक मेंढ्या दगावल्या

दिनू गावित

नंदुरबार : जिल्ह्यात गुरुवारी झालेला अवकाळी पाऊस, निर्माण झालेले प्रचंड धुके आणि अचानक वाढलेला गारठा यामुळे शेतपिकांची नासाडी झाली आहे. त्याचबरोबर वाढलेल्या गारठ्याने जिल्ह्यात विसहुन अधिक मेंढ्यांचा मृत्यू झाला.

नंदुरबार Nandurbar) तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी दिलेल्या माहितीनुसार तालुक्यातील तलवाडा येथे 4, खर्दे खुर्द येथे 4 आणि मांजरे येथे 15 मेंढ्या मरण पावल्याची घटना घडली आहे. पावसात भिजून व गारठा सहन न झाल्यामुळे मेंढ्या मरण पावल्याने मेंढपाळांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

घरांचीही झाली पडझड..

अवकाळी पावसामुळे नंदुरबार तालुक्यातील अमळथे गावात तीन घरांची पडझड झाली आहे. जिल्ह्यात आज पाऊस नसला तरी मोठ्या प्रमाणावर धुके आणि हवेतील गारठ्यामुळे कडाक्याची थंडी असल्याचे वातावरण आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सासरच्या छळाला कंटाळली! महिला पोलीस कॉन्स्टेबलनं आयुष्य संपवलं; VIDEOतून केला खुलासा

Maharashtra Rain Live News: तब्बल आठ तासानंतर अंधेरी सबवे वाहतुकीसाठी खुला

Crop Insurance : मुदतवाढ देऊनही शेतकऱ्यांची पिक विम्याकडे पाठ; वर्धा जिल्ह्यातील केवळ ५९ हजार शेतकऱ्यांनी उतरविला विमा

Mumbai News: मुंबईत पोलीस वसाहतीत स्लॅब कोसळला, भीतीपोटी पोलीस अधिकाऱ्यानं सरकारी घर सोडलं

Maharashtra Rain Alert: राज्यात पुढचे ३ दिवस तुफान पावसाचे, रेड- ऑरेंज अलर्ट; कोणत्या जिल्ह्यात कसा पडणार पाऊस?

SCROLL FOR NEXT