Rain 
महाराष्ट्र

अवकाळी व थंडीमुळे 20 हून अधिक मेंढ्या दगावल्या

अवकाळी व थंडीमुळे 20 हून अधिक मेंढ्या दगावल्या

दिनू गावित

नंदुरबार : जिल्ह्यात गुरुवारी झालेला अवकाळी पाऊस, निर्माण झालेले प्रचंड धुके आणि अचानक वाढलेला गारठा यामुळे शेतपिकांची नासाडी झाली आहे. त्याचबरोबर वाढलेल्या गारठ्याने जिल्ह्यात विसहुन अधिक मेंढ्यांचा मृत्यू झाला.

नंदुरबार Nandurbar) तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी दिलेल्या माहितीनुसार तालुक्यातील तलवाडा येथे 4, खर्दे खुर्द येथे 4 आणि मांजरे येथे 15 मेंढ्या मरण पावल्याची घटना घडली आहे. पावसात भिजून व गारठा सहन न झाल्यामुळे मेंढ्या मरण पावल्याने मेंढपाळांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

घरांचीही झाली पडझड..

अवकाळी पावसामुळे नंदुरबार तालुक्यातील अमळथे गावात तीन घरांची पडझड झाली आहे. जिल्ह्यात आज पाऊस नसला तरी मोठ्या प्रमाणावर धुके आणि हवेतील गारठ्यामुळे कडाक्याची थंडी असल्याचे वातावरण आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lakshmi Pujan 2025: लक्ष्मीपूजनाच्या रात्री मीठाचा हा उपाय जरूर करा, घरात नांदेल सुख- शांती

Maharashtra Live News Update : यवतमाळमध्ये परतीच्या पावसाने झोडपलं

Muhurut Trading 2025 : शुभ मुहूर्तावर सेन्सेक्स-निफ्टीची सौम्य तेजी; कोणते शेअर्स चमकले?

Mumbai Crime News : मीरारोडमध्ये मोठा राडा! मुलीच्या छेडछाडीवरून दोन गटात हाणामारी; २० रिक्षांची तोडफोड

Kapoor Family: फॅम जॅम...! बॉलिवूडच्या कपूर खानादानाचा रॉयल दिवाळी फेस्ट लूक

SCROLL FOR NEXT