Nandurbar News Saamtv
महाराष्ट्र

Nandurbar News: आरोग्य यंत्रणा सलाईनवर; नंदुरबार जिल्हा रुग्णालयात तीन महिन्यांत १७९ बालमृत्यू

Nandurbar Child Death Report: बालमृत्यूला राज्य सरकार जबाबदार असल्याचा आरोप ठाकरे गटाचे आमदार आमश्या पाडवी यांनी केला आहे.

Gangappa Pujari

सागर निकवाडे, प्रतिनिधी

Nandurbar News: नंदुरबार जिल्हा रुग्णालय मधील अपूर्ण साधनसामग्री आणि रिक्त पदांमुळे बालमृत्यूच्या प्रमाणात वाढ झाली आहे. या बालमृत्यूंचे धक्कादायक चित्र समोर आले असून मागील तीन महिन्यात 179 बालमृत्यू झाले असल्याचे धक्कादायक आकडेवारी पुढे आली आहे. बालमृत्यूला राज्य सरकार जबाबदार असल्याचा आरोप ठाकरे गटाचे आमदार आमश्या पाडवी यांनी केला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, नंदुरबार (Nandurbar) जिल्हा हा आदिवासी जिल्हा असून 70% लोकसंख्या हे आदिवासींची आहे. जिल्ह्यातील वैद्यकीय सुविधा सलाईनवर असल्याचे चित्र समोर आले आहे. राज्यभरात कुपोषित बालकांची संख्या 28 हजार असून त्यापैकी 23 हजार बालके ही नंदुरबार जिल्ह्यातील आहेत.

जिल्ह्यातील कुपोषण आणि बालमृत्यूच्या प्रश्न गंभीर असून मागील तीन महिन्यात 179 बालमृत्यू झाले असल्याचे धक्कादायक आकडे समोर आले आहेत. या बालमृत्यूला राज्य सरकार जबाबदार असल्याचा आरोप ठाकरे गटाचे आमदार आमश्या पाडवी यांनी केला आहे.

नंदुरबार जिल्ह्यात कुपोषण आणि बालमृत्यूची समस्या गंभीर असून जिल्हा रुग्णालयात असलेल्या सुविधा अपूर्ण आहेत. जिल्हा रुग्णालयात असलेल्या लहान मुलांच्या अतिदक्षता विभागात 20 जागांची कॅपॅसिटी असताना 84 बालक उपचार घेत असल्याचा गंभीर प्रकार आमदार पाडवी यांनी समोर आणला आहे. जिल्हा रुग्णालयातील रिक्त पद आणि अपूर्ण सुविधा यामुळे जिल्ह्यातील बालमृत्यूचा प्रमाण वाढला असल्याचेही पाडवी म्हणाले आहेत. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: दिवाळीच्या मुहूर्तावर देवगड हापूस वाशी मार्केटला रवाना

Asrani Death: प्रसिद्ध बॉलिवूड विनोदी अभिनेते असरानी यांचे निधन, वयाच्या ८४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Maharashtra Officers Promotion : राज्यात सनदी अधिकाऱ्यांना दिवाळी भेट; नरक चतुर्दशीच्या दिवशी कुणाची कुठे बढती झाली? जाणून घ्या

Maharashtra Government: महाराष्ट्राला मिळाले 47 नवे अपर जिल्हाधिकारी; 47 अधिकाऱ्यांना बढत्या

यांना मिरच्या का झोंबतात? नळबाजार, भिवंडीत जाऊन विचारा!; राज ठाकरेंनी बोगस मतदारांचा मुद्दा काढताच नितेश राणेंचं टीकास्त्र

SCROLL FOR NEXT