Nagpur Crime Saam tv
महाराष्ट्र

Nagpur Crime : घरफोडी करणाऱ्या टोळीतील पाच जण ताब्यात; ४ लाखाचा मुद्देमाल हस्तगत

Nagpur News : चोरी केलेले साहित्य विकून यातून मिळणाऱ्या रकमेतील पैस आपापसात वाटून घेत होते. हे प्रकार वाढल्याच्या तक्रारी पोलिसांना मिळाल्या होत्या.

Rajesh Sonwane

पराग ढोबळे 
नागपूर
: नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात घरफोड्या केल्या जात होत्या. घरफोडी करणारी टोळी सक्रिय झाली होती. (Nagpur) पोलिसांकडून यांचा शोध सुरु असताना पोलिसांनी पाच कुख्यात आरोपीना अटक केली. नागपूरच्या यशोधरानगर (Police) पोलिसांनी ही कारवाई केली आहे. (Live Marathi News)

नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात मागील काही दिवसांपासून चोरीच्या घटना वाढल्या होत्या. ग्रामीण भागात सक्रिय झालेल्या या टोळीकडून घरात कोणी नसल्याची संधी साधत घरफोडी करताना जे समान हातात लागेल ते चोरी करत होते. (Theft) चोरी केलेले साहित्य विकून यातून मिळणाऱ्या रकमेतील पैस आपापसात वाटून घेत होते. हे प्रकार वाढल्याच्या तक्रारी पोलिसांना मिळाल्या होत्या. त्यानुसार (Nagpur Police) पोलीस चोरी करणाऱ्या टोळीच्या मागावर होते. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या दरम्यान यशोधरानगर पोलिसांनी टोळीतील पाच जणांना ताब्यात घेतले आहे. राहुल माणिकपुरी असं मुख्य आरोपीचं नाव आहे. त्यांच्याकरून दुचाकी, टीव्ही संच, सिलेंडर, दागिने,  कपडे आदी साहित्यासह ४ लाखाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. तसेच या टोळीने रामटेक, कामठी, जरीपटका तसेच लगतच्या वर्धा जिल्ह्यातील सेलु या भागातही चोरी केल्याचं तपासात समोर आले आहे. .

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manikrao Kokate: मोठी बातमी! रमीचा डाव उलटला, माणिकराव कोकाटेंचं कृषिमंत्री पद गेलं

Indian Railways Updates: महाराष्ट्रातील महत्त्वाच्या एक्सप्रेसची आसान व्यवस्था बदलली; प्रवास होणार आरामदायी

Ganpati Special Train 2025 : गणपतीत कोकणात जाताव? मध्य रेल्वेने मोठी घोषणा, वाचा सविस्तर

Daya Nayak: सलाम दया नायक!" 'एन्काउंटर स्पेशलिस्ट' दया नायक यांचा वर्दीतील प्रवास थांबला

Mumbai News : मुंबईतील रस्त्यावरील खड्ड्यांनी घेतले ४ बळी; समस्या कधी संपणार? वाचा स्पेशल रिपोर्ट

SCROLL FOR NEXT