nagar news, social media, Aurangzeb Photo Status saam tv
महाराष्ट्र

Aurangzeb Photo Status : सकल हिंदू समाजाच्या आवाहनानंतर मिरजगाव कडकडीत बंद

पाेलिसांना ग्रामस्थांना शांततेचे आवाहन केले आहे.

Siddharth Latkar

- सुशील थोरात

Nagar News : मिरजगाव येथे काही लोकांनी औरंगजेबाचे स्टेटस (Aurangzeb Photo Status) समाज माध्यमांत (social media) ठेवल्याने आज (गुरुवार) मिरजगाव (mirajgaon) मधील सकल हिंदू समाजाच्या वतीने मिरजगाव बंदचे आवाहन करण्यात आले हाेते. त्यास गावक-यांनी प्रतिसाद दिला आहे. (Maharashtra News)

याप्रकरणी पोलिसांनी स्वतः फिर्यादी होत एका युवकावर गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले आहे. मात्र अजूनही तीन ते चार युवकांनी असेच प्रकार केल्याचा आरोप मिरजगाव शहरातील विविध हिंदू संघटनांनी केला आहे. त्या संशयिता आरोपींना अटक करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

गावक-यांना शांततेचे आवाहन

मिरजगाव हे अत्यंत शांतताप्रिय असून या गावात अशांतता पसरवण्याचे काम काही युवकांकडून होत असल्यामुळे या समाजकंटकांवर कठोर कारवाई व्हावी या मागणीसाठी आज मिरजगाव बंदची (mirajgaon bandh) हाक देण्यात आली. त्यास प्रतिसाद मिळाला आहे.

या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. नागरिकांनी शांतता राखत प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन मिरजगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिवटे यांनी ग्रामस्थांना केले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chhagan bhujbal : जीआरमध्ये मराठा जातीचा उल्लेख, निर्णय मागे घ्या; छगन भुजबळ आक्रमक

Palghar News: संपानं घेतला चिमुकलीचा जीव; उपचाराअभावी २ वर्षीय मुलीचा मृत्यू,शासकीय रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

Raj Thackeray : राज ठाकरे महाविकास आघाडीत येणार? महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वेग, मातोश्रीच्या बैठकीत काय घडलं? VIDEO

Israel Airstrike: गाझा-युद्धविरामची चर्चा सुरू असतानाच इस्रायलचा कतरमध्ये हवाई हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Government: शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज; रस्त्यावरून होणारी कटकटी अन् भांडणं मिटणार, शेतापर्यंत होणार रस्ता

SCROLL FOR NEXT