Mumbai News Saam Digital
महाराष्ट्र

Mumbai News : नालासोपाऱ्यात २ मुलांचा तर संगमनेरमध्ये ३ मुलींचा बुडून मृत्यू; ३ मुलं अद्यापही बेपत्ता

Sangamner Accident : नालासोपाऱ्यात एक ह्रदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. तलावात पोहायला गेलेल्या 2 अल्पवयीन मुलांचा बुडून मृत्यू झाला आहे तर 3 मुलांचा अद्याप शोध लागलेला नाही.

Sandeep Gawade

नालासोपाऱ्यात एक ह्रदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. तलावात पोहायला गेलेल्या 2 अल्पवयीन मुलांचा बुडून मृत्यू झाला आहे तर 3 मुलांचा अद्याप शोध लागलेला नाही. पूर्व हवाईपाडा, फादरवाडी या परिसरात आज दुपारी अडीच वाजता ही घटना घडली. अमित (वय 11) अभिषेक ( वय 12) असे मृतदेह मिळालेल्या मुलांची नाव आहेत.

घटनास्थळावर नालासोपारा पूर्व संतोषभूवन या परिसरातून 5 मुलांचा ग्रुप आज दुपारी तलावात पोहायला गेला होता. मात्र या मुलांना पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाली होती. यातील दोन मुलांचे मृतदेह सापडले आहेत. तर तीन मुलं बेपत्ता असून त्यांचा शोध घेण्यात येत आहे. बेपत्ता मुलं तलावात बुडाली आहेत की घाबरून तेथून पळून गेली आहेत, याचा पोलीस शोध घेत आहेत.सध्या वालीव पोलीस, वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळावर दाखल झाले असून त्या मुलांचा शोध घेतायेत.

अहमदनगरमध्ये आज अर्धवट असलेल्या शेततळ्यात पडून तीन मुलींचा मृत्यू झाला आहे. संगमनेर तालुक्यातील मेंढवण गावात ही दुर्घटना घडली. काम सुरू असलेल्या अर्धवट शेततळ्यात पावसाचं पाणी साचलं होत. या तळ्याच्या शेजारी मुली खेळत होत्या. यावेळी त्या पाण्यात उतरल्या असाव्यात आणि पाण्याचा अंदाज न आल्यामुळे मुली बुडाल्या असाव्यात असा अंदाज व्यक्त होत आहे. अनुष्का बडे (वय ११), सृष्टी ठापसे (१३) आणि वैष्णवी जाधव (वय १२) अशी मृत मुलींची नावं आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eggs Vs Paneer : प्रोटीनसाठी उत्तम काय?उकडलेले अंडे की पनीर? जाणून घ्या योग्य डाएटचा पर्याय

Mumbai Eastern Expressway: मुंबई पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी; आठ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा

Maharashtra Live News Update: मराठा नेते मनोज जरांगे आज पुण्यातल्या भोर तालुक्याच्या दौऱ्यावर

ICICI Rules : आता बँक अकाउंटमध्ये ₹ ५०००० किमान बॅलेन्स ठेवावा लागणार, ICICI चा नवा नियम कुणाला होणार लागू?

Mumbai Crime : 80 वर्षांच्या म्हाताऱ्याच्या डोक्यात प्रेमाचं खुळ शिरलं; ४ महिलांवर मन जडलं, नको त्या नादात गमावले 9,00,00,000 रुपये

SCROLL FOR NEXT