Mumbai News Saam Digital
महाराष्ट्र

Mumbai News : नालासोपाऱ्यात २ मुलांचा तर संगमनेरमध्ये ३ मुलींचा बुडून मृत्यू; ३ मुलं अद्यापही बेपत्ता

Sandeep Gawade

नालासोपाऱ्यात एक ह्रदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. तलावात पोहायला गेलेल्या 2 अल्पवयीन मुलांचा बुडून मृत्यू झाला आहे तर 3 मुलांचा अद्याप शोध लागलेला नाही. पूर्व हवाईपाडा, फादरवाडी या परिसरात आज दुपारी अडीच वाजता ही घटना घडली. अमित (वय 11) अभिषेक ( वय 12) असे मृतदेह मिळालेल्या मुलांची नाव आहेत.

घटनास्थळावर नालासोपारा पूर्व संतोषभूवन या परिसरातून 5 मुलांचा ग्रुप आज दुपारी तलावात पोहायला गेला होता. मात्र या मुलांना पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाली होती. यातील दोन मुलांचे मृतदेह सापडले आहेत. तर तीन मुलं बेपत्ता असून त्यांचा शोध घेण्यात येत आहे. बेपत्ता मुलं तलावात बुडाली आहेत की घाबरून तेथून पळून गेली आहेत, याचा पोलीस शोध घेत आहेत.सध्या वालीव पोलीस, वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळावर दाखल झाले असून त्या मुलांचा शोध घेतायेत.

अहमदनगरमध्ये आज अर्धवट असलेल्या शेततळ्यात पडून तीन मुलींचा मृत्यू झाला आहे. संगमनेर तालुक्यातील मेंढवण गावात ही दुर्घटना घडली. काम सुरू असलेल्या अर्धवट शेततळ्यात पावसाचं पाणी साचलं होत. या तळ्याच्या शेजारी मुली खेळत होत्या. यावेळी त्या पाण्यात उतरल्या असाव्यात आणि पाण्याचा अंदाज न आल्यामुळे मुली बुडाल्या असाव्यात असा अंदाज व्यक्त होत आहे. अनुष्का बडे (वय ११), सृष्टी ठापसे (१३) आणि वैष्णवी जाधव (वय १२) अशी मृत मुलींची नावं आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Weather: गणेश विसर्जनानंतर राज्यात पावसाची एन्ट्री! आज 'या' भागात बरसणार, हवामान खात्याचा अंदाज; वाचा सविस्तर...

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

Maharashtra Politics: महायुतीचं बेताल त्रिकूट; देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याला नेत्यांकडून हरताळ

SCROLL FOR NEXT