रत्नागिरीतील हातखंबा गावाजवळ मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात.
कोळसा वाहतूक करणाऱ्या ट्रकने आरटीओ वाहनासह ५ गाड्यांना धडक दिली.
अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू, तर चार जण जखमी झाले.
अमोल कलये, साम प्रतिनिधी
रत्नागिरी-मुंबई गोवा महामार्गावरील भीषण अपघात झालाय. कोळसा वाहतूक करणाऱ्या ट्रकने सहा वाहनांनी धडक दिलीय. हा भीषण अपघात हातखंबा गावात घडलाय. या अपघातात एका २० वर्षीय तरुणाचा मृत्यू झालाय. तर चार जण जखमी झालेत. ट्रकने चार चारचाकी, तीन दुचाकी आणि एका रिक्षाला धडक दिलीय. अपघातात जखमी झालेल्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवले आहे. विशेष म्हणजे ट्रकची ज्या वाहनांना धडक बसलीय त्या वाहनामध्ये आरटीओ विभागाची गाडी आहे. दरम्यान महामार्ग पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. सतत घडणाऱ्या अपघातामुळे हातखंबा ग्रामस्थ भितीच्या छायेत जगत आहेत.
दरम्यान अपघाताच्या घटनेनंतर उदय सामंत यांनी हातखंबामधील घटनास्थळी भेट दिली. वारंवार होणाऱ्या अपघातांवर मार्ग काढण्यासाठी उद्या अधिकारी, ग्रामस्थांची बैठक बोलावली आहे. पूर्वीच्या ठेकेदाराने जे वेळकाढू धोरण केलं होतं. पावसामुळे किंवा अन्य काही गोष्टींमुळे सध्या 2 किलोमीटर परिसरात या रस्त्याला खड्डे आहेत. त्यामुळे लोडची गाडी कदाचित आवरत नाही. आज दुर्दैवाने पुन्हा अपघात होऊन, २० वर्षाच्या तरुणाचा मृत्यू झाल्याची माहिती सामंत यांनी दिली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.