mla yashwant mane, dcm ajit pawar, ujani dam, pandharpur news saam tv
महाराष्ट्र

Pandharpur News : दादा, काही तरी करा... सोलापूर जिल्ह्यातील 40 साखर कारखाने अडचणीत येतील, अजित पवारांपुढे आमदार यशवंत मानेंची व्यथा

भारत नागणे

Pandharpur News : सोलापूर जिल्ह्यात मागील तीन महिन्यांपासून पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे शेतीच्या आणि पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. हातातोंडाशी आलेली ऊसासह केळी, डाळिंब, तूर,बाजरी,मका अशी विविध पिके जळू लागली आहेत. (Maharashtra News)

पिके वाचवण्यासाठी उजनी धरणातून (ujani dam) उजवा आणि डाव्या कालव्यातून तातडीने पाणी सोडावे अशी मागणी आमदार यशवंत माने (mla yashwant mane) यांनी केली आहे. आमदार माने यांनी याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा केली आहे.

साम टीव्हीशी बाेलताना आमदार यशवंत माने म्हणाले उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आम्ही नुकतीच भेट घेतली. त्यांच्याशी सोलापूर जिल्ह्यातील सध्याच्या पाणी टंचाई विषयी चर्चा केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उजनी धरणाचे पाणी सोडण्यासंदर्भात अधिका-यांना सूचना दिल्या आहेत.

दरम्यान लवकरच पाणी सोडले जावे अशी अपेक्षा व्यक्त केली. त्यामुळे पिके वाचतील अन्यथा सोलापूर जिल्ह्यातील 40 साखर कारखाने अडचणीत येण्याची भिती देखील आमदार माने यांनी यावेळी व्यक्त आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baby Names List : नवरात्रोत्सवात जन्मलेल्या मुलांसाठी सुंदर नावे; देवीशी जोडला आहे अर्थ

Marathi News Live Updates : भारताचे संविधान म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार: राहुल गांधी

Harbhajan Singh: 'हे चूकीचं आहे..', हार्दिक पंड्याला कॅप्टनीवरुन काढल्यामुळे हरभजन सिंग भडकला

Maval News: 'प्रत्येकजण मरायला आलाय..' सुनिल शेळके विरोधकांवर संतापले, अजित पवारांनी कान टोचले; मावळात हायहोल्टेज ड्रामा!

Amitabh Bachchan : दिवसाला २०० सिगारेट ओढायचे 'बिग बी'; मुंबईत येताच सुटलं व्यसन, कसं? स्वतःच केला खुलासा

SCROLL FOR NEXT