उद्धव ठाकरे शिवसेनेच्या जिल्हा परिषद गटनेते पदी विक्रांत जाधव यांची निवड
उद्धव ठाकरे सेनेचे आमदार भास्कर जाधव यांचे चिरंजीव विक्रांत जाधव
विक्रांत जाधव यांच्या गटनेतेपदी निवड झाल्याचे पत्र जिल्हाधिकारी यांना
रत्नागिरी जिल्हा परिषद मध्ये उद्धव ठाकरे सेनेचे जिल्हा परिषद गटातून चार उमेदवार झाले होते विजयी
गुहागर तालुक्यातील असगोली जिल्हा परिषद गटातून विक्रांत जाधव झाले होते विजयी
विक्रांत जाधव यांना जिल्हा परिषद मध्ये विरोधी पक्षनेते पद मिळण्याची शक्यता
महाराष्ट्र राज्याच्या सुरक्षेचा कणा मानल्या जाणाऱ्या राज्य राखीव पोलीस दलाचा 78 वा वर्धापन दिन आज जालन्यात अत्यंत उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात साजरा करण्यात आला. या निमित्ताने राज्य राखीव दलाच्या मैदानावर आयोजित केलेल्या विशेष संचलनाने आणि थरारक कवायतींनी उपस्थितांची मने जिंकली.दरम्यान जालना जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमध्ये मदत कार्यात राज्य राखीव दलाने महत्वाची भूमिका बजवल्याचं जालना जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटलय.
पालघर_मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर डहाणूच्या महालक्ष्मी उड्डाणपुलावर मध्यरात्री कारचा भीषण अपघात. गुजरातकडून मुंबईकडे येणाऱ्या कारने समोरच्या ट्रकला मागून जोरदार धडक दिल्याने कारचा चक्काचूर. उड्डाणपुलावरील खड्ड्यांमुळे ट्रक चालकाने अचानक ब्रेक घेतल्याने हा अपघात झाल्याची माहिती. सुदैवाने या अपघातात जीवितहानी टळली असून कारमधील प्रवासी किरकोळ जखमी. अपघातामुळे काही काळ मुंबईकडे जाणाऱ्या वाहिनीवर वाहतूक कोंडी. दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत क्रेनच्या सहाय्याने कार बाजूला करून वाहतूक केली सुरळीत.
लातूर जिल्ह्यातील वाढत चाललेल्या अवैध धंद्या विरोधात पोलिसांनी कारवाईची मोहीम हाती घेतली आहे, लातूरच्या मुरुड परिसरात अवैद्य धंदे, अवैध दारू विक्री यावर पोलिसांनी छापा टाकत कारवाई केली आहे., या कारवाईत पोलिसांनी एका आरोपीसह 2 लाख 51 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय,
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची आज पुण्यात पत्रकार परिषद
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने तयार केलेल्या पुण्यातील प्रकल्पांची देण्यासाठी गडकरी यांची पत्रकार परिषद
दुपारी १.३० वाजता नितीन गडकरी यांची पत्रकार परिषद
पुणेकरांच्या सोयीसाठी कुठले नवे प्रकल्प केंद्र सरकार करणार याकडे सर्वांची उत्सुकता
धाराशिव जिल्ह्यातील सांजा गावात सुरू असलेल्या रेल्वे कामामुळे स्थानिक नागरिकांच्या घरांना धोका निर्माण झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.या संदर्भात युवा सेनेचे तालुका प्रमुख राकेश हनुमंत सूर्यवंशी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत तातडीने कारवाईची मागणी केली आहे. रेल्वे मार्गाच्या कामा दरम्यान मोठ्या प्रमाणावर करण्यात येणाऱ्या ब्लास्टिंगमुळे परिसरातील घरांना तडे जात असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे.ब्लास्टिंगच्या तीव्र आवाजामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.गावातील निवासी भागालगत हे काम सुरू असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित होत आहे.तसेच घरांचे नुकसान होऊन आर्थिक फटका बसत असल्याचीही तक्रार ग्रामस्थांनी केली आहे.त्यामुळे रेल्वे कामादरम्यान सुरू असलेले ब्लास्टिंग तात्काळ बंद करावे आणि नागरिकांच्या नुकसानीची भरपाई करावी,अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा येत्या काळात तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
महापालिका आयुक्तांकडे ७०० ते ८०० जणांनी अर्ज करत लेखी पत्रव्यवहार केल्याची माहिती
महापालिका अधिनियमातील तरतुदीनुसार या नगरसेवक पदासाठी आयुक्त यांनी पक्षीय बलाबलानुसार पक्षातील गट नेत्यांशी चर्चा करून नावे स्वीकारायची असतात
त्यामुळे आलेल्या एवढ्या अर्जांचे करायचे काय असा प्रश्न प्रशासनासमोर उभा राहिला आहे
राजकीय पक्षांकडून अधिकृतपणे उमेदवारांचे अर्ज आल्यानंतर त्याची छाननी करण्यासाठी प्रशासनाने चार जणांची समिती नेमली आहे
त्यामुळे या समितीला आता कोणाचे अर्ज वैध आणि कोणाचे अवैध हे ठरवावे लागणार असल्याने याचा तिढा वाढण्याची शक्यता
पुणे महापालिकेत यंदा 10 स्वीकृत नगरसेवक असणारा असून पक्षीय बलाबलानुसार भाजपचे सात, राष्ट्रवादी काँग्रेस दोन तर काँग्रेसचा १ स्वीकृत नगरसेवक असेल
दुबईत अडकलेले 128 नागरिक पुण्यात सुखरूप परतले
पुणे जिल्हा प्रशासनाकडे २५० नागरिक अडकल्याची माहिती असून त्यापैकी १२८ नागरिक परतले
पुण्यासह देशभरातील अनेक ठिकाणाहून दुबई मध्ये गेलेल्या भारतीयांना मायदेशात परत आणण्यासाठी सरकार प्रयत्नशील
नागरिकांना मायदेशात आणण्यासाठी विशेष विमानांचे वेळापत्रक निश्चित करण्यात आल्याची माहिती
शहरातील अनधिकृत होर्डिंग धारकांवर पालिका आयुक्त कडून मोठी कारवाई
आठ लाख 57 हजाराचा दंड अनाधिकृत होर्डिंग धारकाकडून वसूल करण्यात आला आहे
फेब्रुवारीमध्ये अनाधिकृत 17 होर्डिंग 1295 बोर्ड बॅनर फ्लेक्स 313 झेंडे हटवण्यात आले
पोस्टरबाजी विरोधात विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत
21 जणांविरुद्ध कारवाईबाबत विविध पोलीस ठाण्यात पत्रव्यवहार करण्यात आला आहे
प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांची अमरावतीच्या मेळघाट मध्ये 250 किलोमीटरची पायदळ पदयात्रा सुरू आहे, आज त्यांच्या पायदळ पदयात्राचा सहावा दिवस आहे, आतापर्यंत बच्चू कडू यांनी तब्बल 180 किलोमीटरचा प्रवास केला आहे. काल सायंकाळी बच्चू कडू यांच्या पायदळ पदयात्रेमध्ये त्यांची पत्नी डॉक्टर नयना कडू, मुलगा देवा सुद्धा सहभागी झाला आहे,त्यांनी सुद्धा बरेच वेळ पायदळ चालून अंतर कापले... मेळघाटातील मुलभूत सुविधा आणि शेतकऱ्यांना 31 जून पूर्वी दिलेल्या सरकारनं कर्जमाफी करु असं दिलेलं आश्वासन ही आठवण करून देण्यासाठी बच्चू कडू यांनी पायदळ पदयात्रा काढली आहे, मेळघाट मधील आदिवासी बांधव सुद्धा बच्चू कडू यांच्यासोबत स्वयंस्फूर्तीने पायदळ चालून त्यांच्या पदयात्रा पाठिंबा देत आहे...9 तारखेला सलोना ते चिखलदरा असा बच्चू कडू यांचा विराट असा मोर्चा असणार आहे
शिवजयंतीनिमित्त पुणे शहरातील वाहतुकीत बदल
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शहरातील मध्यवर्ती भागात मिरवणुका निघणार असल्याने वाहतूक व्यवस्थेत तात्पुरते बदल
लक्ष्मी रस्ता- छत्रपती शिवाजी महाराज रस्ता परिसरात आणि आसपासच्या मार्गांवर सकाळी सात वाजल्यापासून गर्दी ओसरेपर्यंत काही मार्गांवरील वाहतूक वळविण्यात येणार
लक्ष्मी रस्ता, छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, बाजीराव रस्ता, कुमठेकर रस्ता, केळकर रस्ता तसेच लष्कर वाहतूक विभागाच्या हद्दीतील एम.जी. रस्ता आणि ईस्ट स्ट्रीट परिसरात वाहतुकीची कोंडी होण्याची शक्यता लक्षात घेऊन हा निर्णय
आज राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभेत अर्थसंकल्प मांडणार
अजितदादांच्या मृत्यूनंतर पहिलाच अर्थसंकल्प
अर्थसंकल्पातील घोषणांकडे सर्वांचेच लक्ष
चिपळूणमधील डेरवण येथे झालेल्या राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत रत्नागिरीच्या ऍक्वा टेक्निक्स स्विमिंग अकॅडमीच्या खेळाडूंची चमकदार कामगिरी केलीय या अकॅडमीला एकुण 13 पदकं मिळालीत. डेरवण युथ गेम्स यांच्या वतीने आयोजित केलेल्या स्पर्धेत राज्यभरातून 200 हून अधिक स्पर्धक सहभागी झाले होते.
मोची समाजाच्या कन्या प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड झाल्यानंतर सोलापुरात मोची समाजाकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण आणि अभिवादन करून जोरदार जल्लोष करण्यात आला.
कार्यकर्त्यांनी एकमेकांना मिठाई वाटून फटाक्यांची आतषबाजी करत आनंद साजरा केला. गरीब घरातून पुढे आलेल्या ज्योती वाघमारेंच्या निवडीमुळे समाजाला संसदेत प्रतिनिधित्व मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महायुती सरकारचे समाजाकडून आभार मानण्यात आले. तसेच ही निवड डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारसरणीचा विजय असल्याचेही कार्यकर्त्यांनी सांगितले.
कोपरखैरणेतील विद्या भवन सोसायटीत स्लॅब कोसळला; 14 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू, 12 विद्यार्थी व शिक्षिका रेस्क्यू
नवी मुंबईतील कोपरखैरणे सेक्टर 2, प्लॉट नंबर 12 येथील विद्या भवन सोसायटीमध्ये गुरुवारी सायंकाळी सुमारे 5.20 वाजण्याच्या सुमारास धक्कादायक घटना घडली. तळमजल्यावर घरगुती क्लास सुरू असताना पहिल्या मजल्यावरील स्लॅब अचानक कोसळला.
सांगलीच्या भिलवडी येथील मौटी रस्त्यालगत असलेल्या संग्राम केन ॲग्रो कारखान्याजवळ आज सायंकाळी अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. ही आग सुमारे आठ ते दहा एकर परिसरात पसरल्यामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. आगीमुळे मोठ्या प्रमाणात धूर आणि ज्वाळा उसळताना दिसत होत्या. यावेळी कारखान्यातील इतर कर्मचाऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी धाडसी प्रयत्न केले.
दरम्यान, चितळे डेअरीच्या अग्निशामन दलाने अवघ्या काही मिनिटांत घटनास्थळी दाखल होत आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले. त्यांच्या तातडीच्या मदतीमुळे मोठा अनर्थ टळला. या सर्वांच्या शर्थीच्या प्रयत्नांमुळे शेतकरी रवींद्र माने यांच्या शेतातील कापणीला आलेले गव्हाचे पीक वाचवण्यात यश आले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.