केंद्रीय मंत्रिमंडळात लवकरच फेरबदल होणार असल्याच्या विश्वसनीय माहितीनंतर मंत्रीपदी वर्णी लागण्यासाठी शिवसेना खासदारांनी मोर्चेबांधणी सुरू केल्याच्या हालचाली दिसून येत आहेत.मंगळवारला शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.दीड तासांच्या चर्चेत राज्यातील महत्वाच्या विषयांबरोबरच मंत्रीमंडळातील संभाव्य बदलाबाबतही चर्चा झाल्याचे समजते. तत्पूर्वी सोमवारी रात्री शिंदे यांनी शिवसेना पक्षाच्या राज्यातील सर्व (सातही) खासदारांची बैठक घेतली.यावेळी शिंदे म्हणाले,"मी महाराष्ट्रात आणि तुम्ही दिल्लीत असलात तरी माझ्याकडे तुमच्या कामकाजाची सर्व माहिती येते.तुमच्या सगळ्यांच्या कामांवर माझे बारकाईने लक्ष आहे.पक्षाची आणि सरकारची बाजू सभागृहात जोरदारपणे मांडा.पक्षाचे प्रतिनिधित्व दिसण्यासाठी सभागृहात उपस्थित राहून विविध आयुधांच्या आधारे प्रश्न मांडा.काम करणा-यांचा पक्षाकडून योग्य सन्मान केला जातो तेच येथेही सर्वांना लागू होईल."असं सांगितलं
सिंधुदुर्गातील इन्सुली-बांदा राज्यमार्गावर वनविभागाने खैर लाकडाच्या अवैध वाहतुकीवर मोठी कारवाई करत तस्करीचे रॅकेट उघडकीस आणले आहे. आठ दिवसांपूर्वीच एक टेम्पो पकडल्याची घटना ताजी असताना पुन्हा एकदा १० लाखांच्या खैर लाकडासह ट्रक पकडून वनविभागाने तस्करांना मोठा दणका दिला आहे. या प्रकरणी सावंतवाडी तळवडे येथील दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून, एकूण २५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
'सकाळ माध्यम समूहा'ने आयोजित केलेल्या श्रीगुरू पादुका दर्शन उत्सवासाठी मोठ्या संख्येने भाविक दाखल झाल्याने
वेगवेगळ्या सोयी-सुविधांनी 'भक्तीचा महाकुंभ' सज्ज होत आहे. पादुका दर्शन सोहळ्याबद्दल भाविकांमध्ये भक्तिमय वातावरण आहे उत्सवाला असून, संत आणि सद्गुरूंच्या २१ पादुकांसाठी आकर्षक मंदिरे साकारली आहेत
-मुंबई येथील एमडी ड्रग्ज तस्करासह अमरावती शहरातील तस्कराला लालखडी ते नवसारी मार्गावर एमडी ड्रग्जची डिलिव्हरी देताना अमरावती गुन्हे शाखेच्या पथकाने रंगेहात अटक व त्यांच्या ताब्यातून ११ लाख ७९फ हजार रुपयांची ७८ ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त केली आहे.गुन्हे शाखेच्या पथकाने ८ फेब्रुवारीला चार आरोपींना अटक व २ किलो ८० ग्रॅम एमडी जप्त केली होती. त्यानंतर बडनेरा विश्रामगृहालगत दोन आरोपींना अटक करून त्यांच्या ताब्यातून ७६ ग्रॅम एमडी जप्त केली होती.या दोन्ही गुन्ह्यात सखोल तपास केल्यानंतर मुंबई येथील काही युवक शहरातील एमडी तस्करांना स्वतः एमडी आणून देत असल्याचे उघड झाले.दरम्यान मुंबई येथील तस्कर आजिम अमद शेख शनिवारी शहरातील एकाला एमडी देण्याकरिता येत असल्याची टिप मिळाली.सायंकाळी आजिम हा लालखडी ते नवसारी
मार्गावर उभा असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचला. काही वेळाने एका ऑटोरिक्षामध्ये शेख समीर आला. दोघे एमडीची डिलिव्हरी करीत होते. त्याचवेळी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याजवळील ७८ ग्रॅम एम डी ड्रग्स जप्त करीत दोघांना आहे.
आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाचा थेट फटका हिंगोली जिल्ह्यातील हळद उत्पादक सर्वसामान्य शेतकऱ्यांना बसला आहे, देशात सर्वाधिक हळदीचे उत्पादन घेणारा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या हिंगोली जिल्ह्यात हजारो हेक्टर शेतीवर हळदीची लागवड केल्या जाती, वर्षभराचं पीक असलेल्या या हळद पिकाची पोटच्या लेकराप्रमाणे शेतकरी सोय घेतात, हळद उत्पादक शेतकऱ्यांचे कुटुंब आणि मुलाबाळांचे शिक्षण हळदीच्या उत्पादनावर अवलंबून असल्याने हळदीला दरवर्षी भाव किती मिळतो याची उत्सुकता शेतकऱ्यांना लागलेली असती मात्र यंदाच्या वर्षी युद्धजन्य स्थितीमुळे, शेतकऱ्यांच्या हळदीचे दर तब्बल दीड हजार रुपयांनी घसरले आहेत, हिंगोलीच्या संत नामदेव हळद मार्केटमध्ये प्रति क्विंटल 14 हजार रुपये ते 14,500 प्रतिक्विंटल दराने विक्री होणे अपेक्षित असताना शेतकऱ्यांच्या हळदीला सद्या 12 ते 13 हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळत आहे, संत नामदेव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आलेली हळद ठेवण्यासाठी जागा देखील अपुरी असल्याने यापुढे आंतरराष्ट्रीय स्तरावर हळद निर्यात झाली नाही तर शेतकऱ्यांना आणखी फटका बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे
वाशीम जिल्ह्यात चालत्या बसमधून प्रवाशांचे दागिने चोरणाऱ्या सराईत महिला टोळीला वाशिमच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद करण्यात यश मिळवले आहे. मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात अशा प्रकारच्या चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.ही महिला टोळी विशेषतः गर्दीच्या बसमध्ये महिलांना टार्गेट करत असे. प्रवासादरम्यान गोंधळ निर्माण करून त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र, सोन्याच्या साखळ्या व इतर दागिने लंपास केले जात होते.
बेंगलोर मुंबई महामार्गावर असणाऱ्या पुण्यातील दरी पुलावर मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये सात ते आठ वाहनांचं मोठं नुकसान झालं. साताऱ्याहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या गाड्यांचा या अपघातात समावेश होता. यातील एका वाहनाचे नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती आहे. हा अपघात इतका भीषण होता की काही वाहनं पुलावरील रेलिंगला धडकल्याने संपूर्ण रेलिंग च नुकसान झालं आहे. सुदैवाने या अपघातात कुठलीही जीवित हानी झाली नसली तरी सुद्धा पुण्यातील नवले पूल तसेच दरीपूल या भागात होणाऱ्या अपघाताच्या संदर्भातला प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात माजी खासदार विनायक राऊत यांनी सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांच्या एसआयटी चौकशीची मागणी केली आहे.दीपक केसरकर यांचीच आता एसआयटी चौकशी करण्याची आवश्यकता आहे. एकनाथ शिंदे यांना कॅप्टन खरात यांचा रस्ता दीपक केसरकरांनी दाखवला आणि गुवाहाटीचा रस्ता सुद्धा खरात आणि दिपक केसरकरांनीच दाखवला होता असा गंभीर आरोप विनायक राऊत यांनी केला आहे. कॅप्टन खरात यांच्या सेवेमध्ये जे जे मंत्री मग्न झाले होते, त्या सगळ्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी होण्याची आवश्यकता आहे. कॅप्टन खरात जेव्हा आपल तोंड उघडेल आणि काही नेत्यांची नावे बाहेर येतील त्यांच्याकडून कॅप्टन खरातला संपवण्याचा प्रयत्न होईल अशी भिती ही विनायक राऊत यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणताही दबाव न मानता संबंधित व्हिडिओ सार्वजनिक करावेत आणि दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणीही राऊत यांनी केली आहे.
मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर मागील तीन वर्षात 532 अपघात तर 223 जणांचा मृत्यू
नियमाचे पालन केल्याने अपघात कमी झाल्याची माहिती
2023 ते 25 कालावधीत 532 अपघात झाले त्या 223 जणांचा मृत्यू
2023 मध्ये 154 अपघात होऊन 65 जणांचा मृत्यू झाला. 2024 मध्ये 191 अपघात झाले त्यात 90 जणांचा मृत्यू
2025 मध्ये 187 अपघात होऊन 68 जणांचा मृत्यू झाला असल्याचा परिवहन विभागाकडून सांगण्यात आला आहे
जिल्हा परिषद शाळेतील घटनारी विद्यार्थ्यांची पटसंख्या चिंतेची बाब असली तरी जिल्हा परिषदेतील शिक्षकांनी गुणवत्ता मात्र टिकवून ठेवल्याचे धाराशिव मध्ये चित्र दिसत आहे.धाराशिव जिल्ह्यातील जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश प्रक्रियेत यंदाही जिल्हा परिषद शाळांनीच बाजी मारली आहे.तुळजापूर येथील जवाहर नवोदय विद्यालयातील सहावीसाठी उपलब्ध असलेल्या एकूण ८० पैकी ६६ जागा पटकावण्यात जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांना यश आले आहे.विशेष म्हणजे यावेळी तब्बल ७७ विद्यार्थी ग्रामीण भागातील असल्याने विद्यार्थ्यांकडून परीक्षेची उत्तमरीत्या तयारी करून घेणाऱ्या शिक्षकांचे सर्व स्तरातून कौतुक होतं आहे.
पुणे शहरातील 6000 सोसायटीमध्ये पीएनजी गॅस चे वितरण होत असल्याची माहिती
पीएनजी गॅसची लाईन असलेल्या ठिकाणी 80 टक्के घरामध्ये अद्याप एलपीजीचा वापर
पहिल्या टप्प्यात दोन लाख घरामध्ये पीएनजी चा वापर सुरू करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आला आहे त्यामध्ये चार लाख सिलेंडरची बचत होणार आहे
परिस्थितीमुळे गॅस सिलेंडर चे टंचाई निर्माण होऊ शकते त्यासाठी सहकार विभागाकडून पुढाकार घेण्यात आला आहे
महाड तालुक्यातील नाते गावात अर्धनग्न अवस्थेत अंगाला तेल लावलेला चोरटा सीसीटीव्हीत कैद झाला आहे. CCTV मध्ये दिसणाऱ्या या चोरट्याबाबत अद्याप कोणीही पोलिसात तक्रार दाखल केलेली नाही. मात्र चोरट्याच्या अशा प्रकारच्या वावरामुळे परिसरात भितीचे वातावरण असून अशा चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होते आहे.
- लोखंडी रॉड आणि सळाख्यांचे बंडल घेऊन जाणाऱ्या ट्रकचा नियंत्रण सुटून अपघात
- चालक आणि क्लीनर जखमी झाल्याची माहिती, नागरिकांनी आणि पोलिसांच्या साह्याने दोघांना बाहेर काढून रुग्णालयात केले दाखल
- महामार्गावरून करंजा शहराकडे जाणाऱ्या सर्विस रोड सुरुवातीलाच लोडे ट्रक घेऊन जाणाऱ्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने त्याने पलटी खाल्ली
- या अपघातामुळे काही वेळ वाहतूक विस्कळीत झाली होती तेच महामार्गावर लोखंडी सडाकांचे बंडल खाली पडल्याने वाहतुकीसाठी अडथळे निर्माण झाला होता
- स्थानिक नागरिकांनीही महामार्ग असलेले लोखंडी सडाकांचे बंडल बाजूला करत वाहतुकीस मार्ग दिला मोकळा करून.
पुणे जिल्ह्यातील वाघोली येथे आयोजित ६८ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा थरार शिगेला
गादी आणि माती या दोन्ही विभागांतील उपांत्य फेरीचे निकाल जाहीर
किताबी गदेसाठीचे अंतिम चार मल्ल झाले निश्चित
गादी विभागातून सोलापूरचा जय पाटील आणि नाशिकचा हर्षवर्धन सदगीर यांच्यात अंतिम सामना
माती विभागातून सोलापूरचा महेंद्र गायकवाड आणि हिंगोलीचा सिकंदर शेख यांची अंतिम फेरीत धडक
स्व. अजितदादा पवार क्रीडानगरी’त रंगलेल्या स्पर्धेत शनिवारी ऐतिहासिक लढती
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी रुपाली चाकणकर यांच्याबद्दल प्रतिक्रिया दिली. त्यांचे आणि भोंदूबाबा अशोक खरात यांच्यातील संबंधांवरून लोकांमध्ये वातावरण चांगले नाही. या भोंदू बाबाने अनेक महिलांना फसवले आणि त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी त्यांना राजीनामा द्यायला सांगितले, असे आठवले म्हणाले. या प्रकरणात अनेक मोठ्या नेत्यांची नावे समोर येत आहेत, असे विचारता, त्यांनी याबद्दल आपल्याला काही माहिती नाही, असे उत्तर दिले. चंद्रपुरात आज आईसाहेब बहुद्देशीय संस्थेच्या वतीने समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार आणि विद्यार्थ्यांना सायकलचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाला आठवले उपस्थित होते. याप्रसंगी त्यांनी चाकणकर प्रकरणी भाष्य केले.
मिळकतकराचा भरणा करणेकामी नागरी सुविधा केंद्र ३१ मार्च पर्यंत साप्ताहिक व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी देखील सुरु असणार
पुणे महानगरपालिका कार्यक्षेत्रातील नागरिकांना मिळकतकर भरणा करणे सुकर व्हावे यासाठी निर्णय
विविध क्षेत्रिय कार्यालय व संपर्क कार्यालयांतर्गत नागरी सुविधा केंद्र (CFC) चालू करण्यात आले आहेत
२०२५-२६ हे आर्थिक वर्ष ३१ मार्च रोजी संपुष्टात येत आहे. त्यामुळे वर्ष अखेरीस मिळकतकर भरण्यासाठी नागरिकांची गर्दी होते
या कालावधीत मिळकतकराचा भरणा करणे नागरिकांना सोयीस्कर होण्यासाठी पुणे महापालिकेचा निर्णय
नागरी सुविधा केंद्र २९ मार्च पर्यंत सकाळी ९.४५ ते संध्याकाळी ४ पर्यंत सुरु रहाणार
३० व ३१ मार्च २०२६ रोजी सकाळी ९.४५ ते रात्री ८.०० वाजेपर्यंत केंद्र सुरू राहणार
ज्यांनी मिळकतकराचा भरणा अद्यापपर्यंत केलेला नाही त्यांना महापालिकेचे आवाहन
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.