अक्कलकुवा शहरात चोरट्यांनी एकाच रात्री धुमाकूळ घालत पाच ठिकाणी घरफोडी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विशेष म्हणजे, अक्कलकुवा पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पोलीस वसाहतीतील एका पोलीस कर्मचाऱ्याचे घरही चोरट्यांनी लक्ष्य केल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.चोरट्यांनी कोटला फळी, पोलीस वसाहत आणि ग्रामीण रुग्णालय कर्मचारी वसाहत या भागांत डल्ला मारला. यात बहादूरसिंग पाडवी, अशोक बोरदे, देवीदास वसावे यांच्यासह एका पोलीस कर्मचाऱ्याच्या घरातून सुमारे 2 लाख रुपये रोख, 3 ते 4 तोळे सोने आणि 30 ते 40 तोळे चांदीचे दागिने असा लाखोंचा ऐवज लंपास केला आहे.
एकनाथ शिंदेंना भाजपचे नगरसेवक फोडायचे आहेत. दिल्लीमधून शिंदेंना चावी देणारे कोण? असे राऊत म्हणाले.
नगर–मनमाड महामार्गाच्या रखडलेल्या कामामुळे गेल्या अनेक दिवसांपासून राहुरी परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण आहे.. कामाच्या संथ गतीमुळे सातत्याने वाहनांच्या लांब रांगा लागण्याचे चित्र दिसत आहे.. माजी खासदार सुजय विखे यांनी थेट रस्त्यावर उतरत परिस्थितीचा आढावा घेतला आणि हातात कागद पेन घेत ठेकेदारांना वाहतूक नियोजन कसे करावे? यासंदर्भात सूचना केल्या..
शहादातालुक्यातील होळगुजरी गाव शिवारात एका दुर्मिळ महाकाय पक्षाचे दर्शन झाले. उडण्यास असमर्थ असलेल्या या पक्षाला पाहून स्थानिक तरुणांनी वन्यप्राणी संरक्षण आणि बहुउद्देशीय संस्था नंदुरबारचे अध्यक्ष संजय वानखेडे यांच्याशी संपर्क साधला. संजय वानखेडे यांनी फोटोंवरून हा पक्षी युरेशियन ग्रिफॉन, जातीचे गिधाड असल्याचे ओळखले आणि वनविभागाला पाचारण केले. शहादा वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत या गिधाडाला सुरक्षितरित्या रेस्क्यू केले. विशेष म्हणजे, या गिधाडाच्या मानेवर जिओ टॅग आणि पायात विशिष्ट प्रकारची पट्टी आढळून आली आहे. यामुळे हे गिधाड एखाद्या आंतरराष्ट्रीय किंवा राष्ट्रीय संशोधन प्रकल्पाचा भाग असल्याचे स्पष्ट होत आहे. गिधाडे ही निसर्गातील महत्त्वाची स्वच्छतादूत मानली जातात. आययूसीएन (m च्या लाल यादीनुसार ही प्रजाती धोक्यात आहे. हे गिधाड कोठून आले आणि कोणत्या संस्थेने याला टॅग केले आहे, याचा अधिक तपास शहादा वनविभागाचे अधिकारी करत आहेत. सध्या या गिधाडावर उपचार सुरू असून, वनविभागाच्या सतर्कतेमुळे एका दुर्मिळ जीवाचे प्राण वाचले आहेत.
आतापर्यंत आपण दुचाकी स्लिप झाल्याचं ऐकलं असेल मात्र नाशिकच्या पिंपळगाव मोर या गावांमध्ये चार चाकी आयशर ट्रक स्लिप झाल्याचे पाहायला मिळालं. रस्त्यावरील दुचाकी स्वराला वाचवताना हा ट्रक पूर्णपणे रस्त्यावरून बाजूला गेला आणि बाजूच्या वाळूमुळे स्लीप होत दुकानांमध्ये घुसला. झालेल्या या अपघातामध्ये दोन जण जखमी झाले आहेत. तर एका दुकानाचे नुकसान झाले आहे . संपूर्ण अपघात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय
विदर्भाच्या कृषी क्रांतीचं स्वप्न उराशी बाळगून 38 वर्षांपूर्वी म्हणजेच 22 एप्रिल 1988 मध्ये पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हस्ते भंडाऱ्याच्या पवनी इथं वैनगंगेवर गोसेखुर्द (इंदिरा सागर) प्रकल्पाची पायाभरणी करण्यात आली होती... तब्बल 38 वर्षानंतर गोसेखुर्द धरणाची क्षमता असलेल्या 245.500 मिटर म्हणजेच 1146.075 दशलक्ष घनमीटर साठा निर्मिती करण्यात गोसेखुर्द धरण प्रशासनाला यश आलं आहे. अधिकाऱ्यांच्या अथक प्रयत्नानंतर आता प्रकल्पानं जलसाठ्याच्या संचयाचा ऐतिहासिक पल्ला गाठला आहे. गोसीखुर्द धरणाने शंभर टक्के संचयाचे उद्दिष्ट पूर्ण केल्यामुळे पूर्व विदर्भातील शेती आणि विकासासाठी हे एक सुवर्णयुग मानले जात आहे.
एमआयएम पक्ष सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या 25 जागा लढविणार आहे. ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्यासह शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी एमआयएम पक्ष निवडणुकीला स्वबळावर सामोरे जाणार असल्याची माहिती एमआयएमचे शहर जिल्हाध्यक्ष शौकत पठाण यांनी दिली आहे.सोलापूर महानगरपालिकेत 8 नगरसेवक निवडून आल्यामुळे भाजपला एमआयएमच्या रूपाने भक्कम विरोधक असणार आहे.या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील सांगोला, अक्कलकोट,करमाळा, मंगळवेढा, पंढरपूर, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर यासह अन्य तालुक्यांमध्ये एमआयएम पक्ष आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका स्वबळावर लढविणार आहे. इतर पक्षातील कोणी नाराज असतील तर त्यांनी वीस तारखेपर्यंत आमच्याशी संपर्क साधावा आम्ही आमच्या एमआयएम पक्षाचा एबी फॉर्म त्यांना देऊ अशी माहिती जिल्हाध्यक्ष शौकत पठाण यांनी दिली आहे.
अहिल्यानगरच्या अकोले तालुक्यातील आजोबागड येथे अडकलेल्या 12 गिर्यारोहकांची सैन्य दल आणि स्थानिकांच्या मदतीने सुटका करण्यात आली.. मुंबई आणि नाशिक येथील 9 पुरुष आणि 3 महिला शनिवारी आजोबागड वर भ्रमंतीसाठी गेले होते.. खाली उतरतांना अंधार झाल्यामुळे रस्ता दिसत नसल्याने हे गिर्यारोहक आजोबा गडाच्या माथ्यावरच अडकले होते.. 15 तास अडकल्यानंतर या गिर्यारोहकांनी स्थानिकांशी आणि सैन्य दलाशी संपर्क केला.. यानंतर स्थानिक नागरिक, वन विभाग आणि सैन्य दलाच्या दहा 10 ते 12 जवानांनी त्यांना सुरक्षित खाली आणले आहे.
रेशन दुकानदारांच्या उद्धरगीरी आणि आरेरावीचा व्हिडीओ सद्या व्हारल होत आहे. रायगड जिल्ह्यातील महाडमधील हा व्हिडीओ ग्राहकाने रेकॉर्ड करून व्हायरल केला आहे. महाडच्या कुंभे शिवथर येथील हि घटना असून सदर ग्राहकाने रेशन दुकानदाराकडे पावती मागीतल्या वरून दुकानदार संतापला आणि त्याने ग्राहकाशी उद्धटगीरीची भाषा शिवीगाळ केला आहे. या प्रकरणी सत्यता पडताळून कारवाई केली जावी अशी मागणी केली जात आहे.
छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज परिसरात ट्रॅक्टरच्या मागील ट्रॉली खाली येऊन एका ५१ वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. रस्ता ओलांडत असताना ट्रॅक्टरला असलेल्या दुसऱ्या ट्रॉलीच्या चाकाखाली सापडल्याने हा भीषण अपघात झाला. शिवनाथ पवार असे मृत व्यक्तीचे नाव आहे.ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून,परिसरातील नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. अपघातानंतर स्थानिकांनी तात्काळ धाव घेतली, मात्र तोपर्यंत शिवनाथ पवार यांचा जागीच मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. घटनेची माहिती मिळताच वाळूज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे.
कोल्हापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज महाविकास आघाडीच्या नेत्यांची कोल्हापुरात महत्त्वाची बैठक होत आहे. काँग्रेस, उद्धवसेना यांच्यासह आघाडीतील घटक पक्षांचे पदाधिकारी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. निवडणूक एकत्रित लढायची की स्वबळावर, यावर आज निर्णय होण्याची शक्यता आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने आघाडीपासून अलिप्त राहण्याची भूमिका घेतली आहे. नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीमध्ये जागावाटपावरून बिघाडी झाली होती. याच पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद निवडणुकीत आघाडीची रणनीती काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, जिल्हा परिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून बुधवारी, दिनांक २१ ही अर्ज भरण्याची अंतिम तारीख आहे. प्रत्येक पक्षाने स्वतंत्र तयारी सुरू केली असली तरी एकत्र लढायचे की स्वतंत्र, याबाबत संभ्रम कायम आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांनी एकत्र येऊन जिल्हा परिषद निवडणूक लढवण्याच्या चर्चांना वेग आला असला तरी स्थानिक पातळीवर ठोस हालचाली दिसत नाहीत. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता सध्या तरी धूसर मानली जात आहे.
डेक्कन परिसरात भांडारकर रोडवर आहे त्याचे ऑफिस
पहाटे साडेतीन-चार च्या सुमारास घडली चोरीची घटना
मावळ तालुक्यात जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादीशी युती नाही; भाजपची ठाम भूमिका तर महायुतीची पहिली उमेदवार यादी जाहीर
मावळ तालुक्यात होणाऱ्या आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसशी कोणतीही युती केली जाणार नसल्याची ठाम भूमिका भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी मांडली. मावळ तालुक्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राष्ट्रवादीशी युतीबाबत कोणतीही चर्चा अथवा बोलणी झालेली नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
नाशिक महापालिका निवडणुकीतील दारुण पराभव महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जिव्हारी लागला आहे. पराभवाच्या कारणांचा शोध घेताना निवडणुकीतील पदाधिकाऱ्यांच्या कामगिरीचा लेखाजोखा घेतला जाणार आहे. त्या संदर्भातील अहवाल पक्षप्रमुख राज ठाकरे यांना सादर करताना पक्षांतर्गत लवकरच संघटनात्मक बदलाचे संकेत पक्षातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी दिले आहेत. दरम्यान राज ठाकरे देखील लवकरच सर्व उमेदवारांची भेट घेणार आहेत. महापालिका निवडणुकीमध्ये ठाकरे बंधू यांची पहिली जाहीर प्रचारसभा नाशिकमध्ये पार पडली. या सभेतून राज ठाकरे यांनी नाशिककरांना साद घातली. मात्र निकालानंतर मनसेच्या दिग्गज पदाधिकाऱ्यांना पराभवाची चव चाखावी लागली. पक्षाचा केवळ १ नगरसेवक निवडून आला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर निवडणुकीत पराभवाची कारणे, प्रचारातील उणिवा, मतदान तसच प्रमुख पदाधिकाऱ्यांची कामगिरी असा सर्वच बाबींचा अहवाल राज ठाकरेंना पाठवण्यात येणार आहे.
काठावरच्या गणितांमध्ये आम्ही राज्य देखील चालवतो.. त्यामुळे सांगली महापालिकेत काठावरच्या बहुमतात शिंदे सेनेला घेऊन सत्ता स्थापन करू,असा विश्वास सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे.. त्याचबरोबर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे देखील सत्ते मध्ये स्वागतच असेल,त्याबाबतचा निर्णय स्थानिक राष्ट्रवादीने घेऊन तसा प्रस्ताव दिला पाहिजे, असे
स्पष्ट करत महापालिकेत राष्ट्रवादी अजित पवार गट देखील सोबत येईल,असे संकेत मंत्री चंद्रकांत पाटलांनी दिले आहेत..ते सांगलीमध्ये बोलत होते.
हातकणंगले तालुक्यातील येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी महाविकास आघाडी मोठ्या ताकदीने मैदानात उतरणार आहे. तालुक्यातील ११ जिल्हा परिषद आणि २२ पंचायत समितीच्या जागा काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शिवसेना उद्धव ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यासह सर्व घटक पक्ष एकत्र येऊन लढवणार असल्याची स्पष्ट भूमिका माजी खासदार राजू शेट्टी यांनी मांडली आहे. हातकणंगले काँग्रेस कमिटीमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना राजू शेट्टी म्हणाले की, ही निवडणूक म्हणजे धनशक्ती विरोधात जनशक्तीचा लढा असेल. दरम्यान, महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेतील काही इच्छुक उमेदवारांनी आपापल्या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा आग्रह धरल्यामुळे जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. हा कळीचा मुद्दा माजी खासदार राजू शेट्टी आणि माजी आमदार राजू आवळे यांनी बैठकीतून तात्पुरता बाजूला ठेवत, येत्या दोन दिवसांत अंतिम निर्णय घेणार असल्याचे स्पष्ट केले. राजू शेट्टी यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका करताना सांगितले की, तालुक्यातील ग्रामीण पाणीपुरवठ्याचा बोजवारा उडालेला आहे, शिक्षण आणि आरोग्य व्यवस्था पूर्णपणे ढासळली आहे,जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करून खाजगी शाळांना पोसण्याचे काम सत्ताधाऱ्यांकडून सुरू आहे. चोकाक ते अंकली दरम्यानच्या महामार्गाचा प्रश्न जरी मार्गी लागलेला असला, तरी अन्यायकारक शक्तीपीठ मार्गाला आमचा विरोध कायम राहील, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.
- तसेच ‘नातेवाईक साक्षीदार’ आणि ‘हितसंबंधित साक्षीदार’ वेगळे असल्याचे सांगत आरोपी सावत्र पित्याची जन्मठेप कायम ठेवण्याचा महत्वपूर्ण निर्णय दिला...
- मुंबई उच्च न्यायालयाचा नागपुर खंडपीठाने साक्षीदार याची व्याख्या स्पष्ट करत
- निकालातून थेट लाभ होणारी व्यक्ती म्हणजे हितसंबंधित साक्षीदार, तर फक्त नात्याने संबंधित व्यक्ती म्हणजे नातेवाईक साक्षीदार असे निरीक्षण नोंदवले..
हातकणंगलेत महाविकास आघाडी सोबत स्वाभिमानी शेतकरी संघटना - राजू शेट्टी यांचा निर्णय
वंचित सोबतची चर्चा अंतिम टप्प्यात
११ जिल्हा परिषद, २२ पंचायत समिती जागांसाठी महाविकास आघाडीची ताकद दाखवणार
धनशक्ती विरोधात जनशक्तीचा लढा
जागावाटपाचा तिढा दोन दिवसांत सुटणार
:धाराशिव जिल्ह्यात नाफेडकडुन सुरू केलेली 30 हमीभाव केंद्र शेतकऱ्यांसाठी आधारवड ठरली आहेत.जिल्ह्यातील 10 हजार शेतकऱ्यांच्या 2 लाख 509 क्विंटल सोयाबीनची खरेदी झाली असुन त्यापैकी हमीभावाने विक्री केलेल्या 7515 शेतकऱ्यांचे 83 कोटी 77 लाख 50 हजार 744 रुपये थेट त्यांच्या बॅंक खात्यात जमा झाले आहेत.गतवर्षी नाफेड अंतर्गत 20 खरेदी केंद्र सुरू होती तर यंदा 30 सोयाबीन केंद्र सुरू असल्याने गतवर्षीच्या तुलनेत खरेदीचा वेग अधिक आहे.
बुलढाणा शहरातील रेसिडेन्शियल झोन व भर वस्तीत शेतीसाठी वापरण्यात येणारी विषारी औषधे व साहित्य भिषणसेठ दालमिया यांच्या मुलाने परवानगी न घेता जाळल्याने नागरीकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाल्याची तक्रार प्रभाग क्रमांक 8 चे नगरसेवक सचिन गायकवाड यांनी मुख्याधिकारी यांना निवेदनाद्वारे केली आहे. शिवाय ह्या कृषी केंद्र कंपनीधारकावर दंडात्मक व फौजदारी कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
प्रभाग क्रमांक ८ मध्ये भीषणसेठ दालमिया यांचे कृषी सेवा केंद्राचे गोडाऊन आहे. येथून शेतीसाठी औषधे विक्री केल्या जाते.
मतमोजणी दरम्यान उमेदवारांसोबत येवून बुलेटसारख्या वाहनांमध्ये अनाधिकृत बदल करून ध्वनिप्रदूषण करणाऱ्या कार्यकर्त्यांवर पोलिसांकडून दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
१९ वाहनचालक कार्यकर्त्यांवर ही कारवाई केली असून त्यांच्याकडून ९६ हजार ७०० रूपयांचा दंड वसूल केला आहे.
प्रोलॉग स्पर्धेसाठी ठरविण्यात आलेल्या मार्गांवरून वाहनांची वाहतूक तात्पुरत्या स्वरूपात बंद ठेवण्यात येणार आहे.
गोपाळकृष्ण गोखले रस्ता (फर्ग्युसन कॉलेज रस्ता), गणेशखिंड रस्ता (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ रस्ता), जंगली महाराज रस्ता तसेच या मार्गांना जोडणाऱ्या रस्त्यांवर वाहतुकीवर निर्बंध लागू राहतील. स्पर्धेच्या कालावधीत हा संपूर्ण मार्ग दोन्ही बाजूस नो-पार्किंग झोन करण्यात येणार आहे.वाहतूक सुरळीत व सुरक्षित राहावी, तसेच स्पर्धकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा आदेश काढण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवेतील वाहनांना (अग्निशामक दल, रुग्णवाहिका, पोलिस वाहने तसेच स्पर्धेशी संबंधित अधिकृत वाहने) या निर्बंधातून वगळण्यात आले आहे.
पुणे जिल्ह्यात होत असलेल्या ‘पुणे ग्रॅंड चॅलेंज टूर २०२६’ या आंतरराष्ट्रीय स्पर्धेनिमित्त जिल्हाधिकारी यांनी संबंधित परिसरातील शाळा,महाविद्यालये, शिक्षण संस्थांना आज सुट्टी जाहीर केली आहे.
या पार्श्वभूमीवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ कार्यालयास आज सुटी जाहीर करण्यात आली आहे,अशी माहिती विद्यापीठ प्रशासनाने परिपत्रकाद्वारे दिली आहे.
विद्यापीठ आस्थापनेतील स्थावर विभाग, सुरक्षा विभाग आणि आरोग्य केंद्र हे विभाग अत्यावश्यक सेवा अंतर्गत येत आहेत.
येरवडा येथील शादलबाबा दरग्याजवळ रविवारी पहाटे पावणेतीन वाजता भरधाव चारचाकीचा अपघात झाला.
वेगावर नियंत्रण सुटल्याने चारचाकी दुभाजकाला धडकून नंतर दरग्याजवळ खालच्या बाजूला असलेल्या दुकानांना जाऊन धडकली.यात चारचाकीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून पुढील भागाचे नुकसान झाले आहे.तसेच एका दुकानाचेही नुकसान झाले आहे. यावेळी सर्व दुकाने बंद असल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
हिंगोली जिल्ह्यात महसूल प्रशासन व पोलीस प्रशासनाने वाळू माफियांना चांगलाच दणका दिला आहे जिल्ह्यातील पाचही तालुक्यात महसूल प्रशासनाने जप्त केलेली वाळू शेकडो घरकुल लाभार्थ्यांना मोफत वाटप करण्यात आली आहे, ऑन द स्पॉट पंचनामा करून ही वाळू घरकुल लाभार्थ्यांच्या ताब्यात दिल्याने जिल्ह्यातील वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत.
उत्तर पुणे जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाची तयारी पूर्ण झाली असली, तरी ग्रामीण भागात बिबट्याच्या वास्तव्याने प्रचारात भीतीचं वातावरण निर्माण झालंय
गावखेड्यांत आणि शेतशिवारात उमेदवार प्रचार करत असताना बिबट्याची दहशत जाणवू लागली आहे. नागरिक भयभीत असताना निवडणूक प्रशासन अलर्ट मोडवर आलं असून, मुख्य निवडणूक अधिकारी अनिल दौंडे यांनी वनविभागाला सतर्क राहण्याच्या आणि जनतेत जनजागृती करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. निवडणूक काळात सुरक्षितता आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाकडून विशेष पथक तयार करण्यात आलं आहे.
हिंगोली मधील शेतकऱ्यांची शेकडो हेक्टर जमीन सुपीक होणार आहे हिंगोली पालिका क्षेत्रात असलेल्या चिराग शहा तलावातून गाळ उपसा करण्यास प्रशासनाने परवानगी दिली आहे गाळमुक्त तलाव गाळयुक्त शिवार या योजनेअंतर्गत शेतात गाळाची वाहतूक करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाकडून अर्थसाह्य देखील करण्यात येणार आहे त्यामुळे दररोज शेतकरी ट्रॅक्टर डंपरच्या सहाय्याने शेतात गाळ घेऊन जाण्यासाठी गर्दी होत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.