नांदेड महापालिकेत एकूण 81 नगरसेवक असून त्यापैकी भाजपचे 45 नगरसेवक निवडून आल्यानंतर 5 जणांना संधी मिळणार आहे. काँग्रेसचे 14, एमआयएमचे 5 आणि शिवसेनेचे 4 नगरसेवक आहेत. स्वीकृत सदस्यपदासाठी भाजपकडे तब्बल 80 अर्ज दाखल झाले असून या मध्ये डॉक्टर वकील इंजिनिअर चार्टड अकाउंट संस्थाचालक अशा विविध क्षेत्रांतील इच्छुक शर्यतीत उतरले आहेत. स्पष्ट बहुमत असलेल्या भाजपमध्ये या निवडीवरून चांगलीच चुरस निर्माण झाली आहे. मात्र अशोक चव्हाण यांनी काँग्रेस मधून भाजपा प्रवेश केल्यानंतर त्यांच्यासोबत अनेक माजी नगरसेवक आले आहेत तर काही भाजपचे निष्ठावंत पदाधिकारी आहेत आहेत आता या निवडीत कोणाला नगरसेवक पद द्यायचं हा प्रश्न भाजपाच्या पक्षश्रेष्ठी समोर आहे. तर दुसरीकडे निवडणुकीच्या काळात पक्षविरोधी काम करणाऱ्या पदाधिकाऱ्याला नगरसेवक पद देऊ नये अशी मागणी सुद्धा भाजपातील निष्ठावंत करत आहेत . स्वीकृत नगरसेवकपद मिळवण्यासाठी अनेकांनी मुंबई पर्यंत फिल्डिंग लावल्याची माहिती आहे
बुलढाणा जिल्ह्याच्या आंचरवाडी येथील खडकपूर्णा कालव्यात पोहण्यासाठी गेलेल्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांपैकी एका विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली.. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे .. कोलोरा येथील रहिवासी असलेला आणि आई वडिलांचे छत्र हरविलेला स्वराज गणेश खरात हा 11 वर्षीय विद्यार्थी अंचरवाडी येथील श्री शिवाजी हायस्कूलमध्ये ५ वीत शिक्षण घेत होता.. तो त्याच हायकुल शेजारी असलेल्या शासकीय वसतिगृहात राहत होता.. स्वराज आपल्या मित्रांसोबत दुपारी खडकपूर्णा कालव्यात पोहण्यासाठी गेला असता तीन विद्यार्थ्यांनी कालव्यात पोहण्यासाठी उड्या घेतल्या.. यातील दोघांना पोहणे येत असल्याने ते पोहत कालव्याच्या पायऱ्यांनी वर आले.. मात्र स्वराजला पोहणे नसल्यामुळे तो पाण्यात बुडाला.. यावेळी परिसरातील महिल्यांनी आरडा-ओरड केली असता काही लोक मदतीसाठी धावले, मात्र स्वराज पाणी खोल असल्याने सापडला नाही .. ग्रामस्थानी बराच वेळ शोधून ही स्वराज आढळून न आल्याने प्रशासनाने ndrf पथकाला पाचारण केले, शेवटी स्वराज चा मृत अवस्थेत आढळून आला .. दरम्यान मृतक स्वराज चे नातेवाईक यांनी वसतिगृह प्रशासनाच्या हलगर्जीपण मुळे मृत्य झाल्याचा आरोप करत प्रशासनावर कारवाई करण्याची मागणी केलीय ..
हिंगोली जिल्ह्यात गतवर्षी उशिरापर्यंत झालेल्या पावसाचा फायदा रब्बी हंगामातील गहू उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात झाला आहे, जिल्ह्यातील पाचही तालुक्यातील शेतकऱ्यांनी पाण्याची शाश्वती असल्याने मोठ्या प्रमाणात गहू पिकाची लागवड केली होती योग्य वेळी पाण्याचा गव्हाला पुरवठा झाल्याने शेतकऱ्यांचे उत्पादन वाढले असून मागील पाच वर्षात पहिल्यांदाच एकरी शेतकऱ्यांना आठ ते दहा क्विंटल गव्हाचा उतारा येण्याची शक्यता गहू उत्पादक शेतकरी व्यक्त करत आहेत दरम्यान बाजारपेठेत देखील सध्या गव्हाला चांगला भाव असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फायदा देखील होणार आहे.
जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथे नुपूर शास्त्रीय महोत्सवाच्या आयोजन करण्यात आले होते या महोत्सवात महाराष्ट्रासह आंध्र प्रदेशातील शास्त्रीय नृत्य कलाकारांनी सहभाग घेतला होता. कथ्थक कुचीपुडी, मोहिनीअट्टम , ओडिसी, मणिपुरी, कथकली,भरतनाट्यम या शास्त्रीय नृत्यांनी भुसावळकर रसिक मंत्रमुग्ध झाले. या महत्त्वाच्या पार्श्वभूमीवर आंध्र प्रदेशातील रामा कौंडूल्य यांना नृत्यश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
नगरसेवकांसाठी भाजप, शिवसेनेची नावे जवळजवळ निश्चित झाली आहेत; पण काँग्रेसमधील तीन सदस्यांच्या नावांसाठी आज सकाळपर्यंत निर्णय होण्याची शक्यता आहे. सर्व पक्षांमधील इच्छुकांनी नाव निश्चित करण्यासाठी मोठी फिल्डिंग लावली होती. आज सकाळी अकरा ते दोन वेळेत महापालिकेत अर्ज दाखल करायचे आहेत. सर्वसाधारण सभा शुक्रवारी होणार असली तरी त्यात स्वीकृत नगरसेवकांची नावे जाहीर करण्यासाठी प्रशासनाकडे अर्ज द्यावे लागणार आहेत. त्यांची सात शर्तीनुसार छाननी झाल्यानंतर उमेदवारांची नावे निश्चित केली जाणार आहेत. यासाठी भाजपकडून तसेच कॉंग्रेसकडून स्वीकृत नगरसेवक म्हणून अनेक इच्छुक आहेत. त्यासाठी भाजपने सव्वा वर्षाचा मार्ग काढला. त्यानुसार पाच वर्षांत बारा स्वीकृत नगरसेवक करणार आहेत. त्यामुळे अनेक इच्छुकांना पुढील टप्प्यात नगरसेवक करण्याचा शब्द देत नेत्यांनी आपली मान सोडवून घेतली आहे. त्यातून स्वीकृत करण्याचा दबाव थोडा कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. आज प्रशासनाकडे अर्ज दाखल केल्यानंतर बुधवारी त्यांची छाननी केली जाणार आहे.
जळगाव जिल्ह्यातील सावदा येथे नगरपरिषदेच्या वतीने पाणीपुरवठा करणाऱ्या यंत्रणेच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करण्यात आली असून पाण्याच्या टाकीचे वॉटरप्रूफिंग सह पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनची दुरुस्ती केली जाणार आहे, दुरुस्तीच्या कामामुळे सावदा शहरातील पाणीपुरवठा तीन ते चार दिवस बंद राहणार असून त्यामुळे नागरिकांनी काटकसरीने पाण्याचा वापर करण्याचे आवाहन नगरपरिषद प्रशासनाने केले आहे.
पुणे शहर पोलीस भरतीसाठी १.८५ लाख अर्ज
आरएफआयडी-सीसीटीव्हीच्या निगरानीत भरतीला सुरुवात
पोलीस मुख्यालय आणि राज्य राखीव पोलीस दलाच्या गट क्रमांक दोनच्या मैदानावर भरतीची मैदानी चाचणी
या भरतीत पोलीस अंमलदार, १०५ वाहनचालक आणि ३३ पोलिस बँड कर्मचारी अशा एकूण १६३३ पदांचा तसेच कारागृह पोलीसांच्या १३० पदांचा समावेश
मैदानी व शारीरिक चाचणीनंतर पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा घेतली जाणार
शारीरिक चाचणीत उमेदवारांची उंची मोजणी, १०० मीटर धावणे, १,६०० मीटर धावणे (महिला उमेदवारांसाठी ८०० मीटर) आणि गोळाफेक अशा घटकांचा समावेश
या चाचणीसाठी १०० गुण असून, त्यात किमान ५० गुण मिळवणे आवश्यक
भरती प्रक्रियेत कोणताही गैरप्रकार होऊ नये, यासाठी संपूर्ण शारीरिक चाचणी 'आरएफआयडी' तंत्रज्ञानाच्या मदतीने आणि सीसीटीव्हीच्या निगरानीखाली घेण्यात येणार
अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) मुंबई झोनल कार्यालयाने एनडीपीएस प्रकरणात मोठी कारवाई करत सुमारे ५.८८ कोटी रुपये किमतीच्या सात स्थावर मालमत्ता तात्पुरत्या जप्त केल्या आहेत. फैसल शेख, अल्फिया शेख आणि इतरांविरुद्ध पीएमएलए २००२ अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.
एनसीबी मुंबईने दाखल केलेल्या तक्रारीनंतर सुरू झालेल्या तपासात फैसल शेख हा बंदी असलेल्या मेफेड्रोन (एमडी) अमली पदार्थाची खरेदी करून त्याचे जाळे तयार केल्याचे उघड झाले. फैसल व त्याची पत्नी अल्फिया शेख यांनी एमडी विक्रीतून मिळालेला पैसा बँक खात्यांद्वारे फिरवून तो कायदेशीर दाखवण्याचा प्रयत्न केला. यासाठी बनावट कंपन्या व सहकाऱ्यांच्या खात्यांचा वापर करण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे.
सोलापूर महापालिकेत राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या एकमेव नगरसेवकासोबत भाजपची युती
स्वीकृत नगरसेवक निवडताना एक जागा कमी होऊ नये म्हणून भाजपची राजकीय चाल
सोलापूर महापालिका निवडणुकीत विजयी झालेले राष्ट्रवादी अजित पवार गटाचे एकमेव नगरसेवक वैभव हत्तुरे सत्तेत सहभागी
सोलापुरात भाजपाचे 102 पैकी 87 नगरसेवक निवडून आले आहेत तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचा एकच उमेदवार निवडून आला आहे
संख्या बळानुसार भाजपचे 9 स्वीकृत नगरसेवक होणार आहेत मात्र जर शिवसेना आणि काँग्रेसची युती झाल्यास भाजपचा एक स्वीकृत नगरसेवक कमी होऊ शकतो
हीच बाब लक्षात घेत भाजपचे राजकीय चाल खेळत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नगरसेवक वैभव हत्तुरे यांना सत्तेत सहभागी करून घेतलंय
माजी मंत्री, आमदार अब्दुल सत्तार यांच्या पत्नी आणि सिल्लोड नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा नफिसाबेगम यांचे आज दुःखद निधन झाले. आज सिल्लोड येथे अंत्यविधी होणार आहे. नफिसाबेगम सत्तार या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय होत्या. नगराध्यक्षा म्हणून त्यांनी उल्लेखनीय कार्य केले होते.
यवतमाळच्या पुसद ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका इसमाच्या घरातून नऊ किलो 260 गांजा सह एक लाख 85 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कारवाई पुसद ग्रामीण पोलिसांनी केलीये.अर्जुन बरगे याला पोलिसांनी ताब्यात घेतले.
पुणे महापालिकेला १५ व्या वित्त आयोगाकडे रखडलेले तब्बल ३०७ कोटींची अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा
महापालिका निवडणुकीत नवी पालिका अस्तित्वात आल्याने मार्ग मोकळा
केंद्राकडून २०२०-२१ ते २०२५-२६ काळासाठी महापालिकेला ८२४ कोटींचे अनुदान मंजूर झाले होते
मात्र, २०२२ पासून लोकनियुक्त सदस्य नसल्याचे कारण देत आतापर्यंत महापालिकेस केवळ ५१७ कोटींची अनुदान देण्यात आले
नवीन सभागृह अस्तित्वात आल्याने हे अनुदान महापालिकेला मिळण्यातील अडचण दूर झाली आहे
महापालिकेला मंजूर झालेला निधी मिळावा, यासाठी महापालिका प्रशासनाने नगरविकास विभागाच्या माध्यमातून प्रयत्न देखील सुरु होते
अमरावतीच्या पंचवटी ते कांता नगर रस्ता झाला होता रात्री जलमय, मोठी पाईपलाईन फुटली
पीडीएमसी मुलींच्या वस्तीगृह समोरील रस्त्यावर झाले होते पाणीच पाणी
सोमवारी रात्री उशिराची घटना, वस्तीगृहातील विध्यार्थीनीत भीतीचे वातावरण
दोन ठिकाणी पाईपलाईन फुटल्याने लांब अंतरा पर्यत पाणी
पीडीएमसी रुग्णालय परिसरात शिरले होते पाणी रस्त्यावर पाणी पाहून निर्माण झाली होती तलाव सदृश्य परिस्थिती
अजित पवार राष्ट्रवादीच्या रत्नागिरी जिल्हा परिषद गटनेतेपदी अजय बिरवटकर यांची एकमतानं निवड
अजय बिरवटकर हे अजित पवार राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे मेव्हणे
अजय बिरवटकर हे खेड तालुक्यातील भडगाव जिल्हा परिषद गटातून शिंदे सेनेच्या उमेदवाराचा पराभव करून आले जिंकून
रत्नागिरी जिल्हा परिषद गटातून अजित पवार राष्ट्रवादीचे 5 सदस्यांचा विजय
खेड दापोली आणि चिपळूण मध्ये रत्नागिरी जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार लढली होती स्वतंत्र निवडणूक
राज्यात तीन पक्ष एकत्र असल्याने रत्नागिरी जिल्हा परिषद मध्ये सत्तेत सहभागी व्हायचं का याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल
गटनेता म्हणून निवड झाली पण आमचा विजयाचं श्रेय अजित पवार यांना समर्पित
नाशिकच्या तपोवन परिसरातील वृक्षतोड प्रकरणासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेवरील अंतरिम अर्जावर आज मनसेचे नाशिक शहर उपाध्यक्ष अॅड. नितीन पंडित यांनी तपोवनातील वृक्षतोडीविरोधात ही याचिका दाखल केलीय. या प्रकरणात नाशिक महापालिका तसच नाशिक महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाला अंतरिम अर्जावर प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले होते. त्यामुळे आज सुनावणीदरम्यान नाशिक महापालिका आणि संबंधित विभाग न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागलंय.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आज पुण्यात आंदोलन
महाराष्ट्र प्रदेश NSUI कडून पुण्यात मोदींच्या विरोधात आंदोलन
एपस्टीन फाईल्स मध्ये मोदींचे नाव आल्याचा आरोप करत महाराष्ट्र प्रदेश NSUI चे आंदोलन
संध्याकाळी ५ वाजता पुण्यातील कलाकार कट्टा येथे आंदोलन
पार्थ पवार यांना अभय, पुण्यातील मुंढवा जमीन घोटाळ्याचा अहवाल सादर
पार्थ पवार यांच्या विरोधात काहीही कारवाई होणार नसल्याने त्यांचा राज्यसभेवर निवडून येण्याचा मार्ग झाला मोकळा
पार्थ हे अमेडिया कंपनीचे भागीदार असले तरी त्यांचा मुंढव्याच्या जमीन खरेदीत थेट संबंध येत नाही, परिणामी चौकशी समितीने पार्थ पवार यांना अभय दिले आहे
मुंढवा जमीन व्यवहार प्रकरणात दोन अधिकाऱ्यांच्या विरोधात कारवाईची शिफारस
जमीन प्रकरणात चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या महसूल सचिव विकास खारगे समितीचा अहवाल
अहवाल महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना सादर
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीने मुंढवा येथील महार वतनाची जमीन खरेदी केली होती. बाजारभावाप्रमाणे १८०० रुपये किमतीची जमीन ३०० कोटी रुपयांमध्ये खरेदी केल्याचा आरोप झाला होता
तसेच या व्यवहारात २१ कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्कही माफ करण्यात आले होते. हा प्रकार उघडकीस येताच टीका झाली होती
यामुळे पार्थ यांच्या कंपनीचा हा व्यवहार रद्द करण्यात येत असल्याची घोषणा तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली
या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीसाठी अतिरिक्त मुख्य सचिव (महसूल) विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती
मुद्रांक शुल्क नियमानुसार व्यवहार करणारा जबाबदार असतो. अमेडिया कंपनीने हा व्यवहार केला असला तरी पार्थ पवार यांची त्यावर स्वाक्षरी नाही
तसेच या व्यवहारात अमेडिया कंपनीला मदत केलेले तहसीलदार सूर्यकांत येवले आणि दुय्यम निबंधक तारू यांच्या विरोधात कठोर कारवाईची शिफारस
पुण्याच्या महापौर मंजूषा नागपुरे यांनी घेतला प्रकल्पांचा आढावा
महानगरपालिकेतर्फे राबविण्यात येत असलेल्या मुळा-मुठा नदी पुनरुज्जीवन प्रकल्पा'च्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यात आला
शिवाजीनगर - घोलेरोड क्षेत्रीय कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली
यावेळी प्रकल्पाच्या प्रगतीचे आणि संकल्पनेचे सादरीकरण करण्यात आले
तसेच आगामी नियोजनावर सविस्तर चर्चा पार पडली.
महापौर मंजुषा नागपुरे, मनपा आयुक्त नवल किशोर राम आणि गणेश बिडकर आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते
ठाणे कल्याण दरम्यान लोकल ट्रेनमध्ये गरदुले खुलेआम नशा करत असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. आज दुपारच्या सुमारास ठाण्याहून कल्याणच्या दिशेने येणाऱ्या लोकल ट्रेन मधला हा व्हिडिओ असल्याची माहिती आहे. या व्हायरल व्हिडिओ मुळे रेल्वे प्रवाशांची सुरक्षितता रामभरोसे असल्याचेच पाहायला मिळत आहे. रेल्वे स्टेशन परिसरात धुमाकूळ घालणारे हे गर्दुल्ले आता थेट लोकलच्या डब्यातच नशा करत असल्याचे दिसून आल्याने रेल्वे पोलीस आणि रेल्वे सुरक्षा बलाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे
कार आणि दुचाकीच्या या भिषण अपघात दुचाकीवरील दोन महिला, दोन लहान मुले आणि एक पुरुष असे पाचही जण गंभीर जखमी झालेत.भरधाव कारने दिलेल्या जोरदार धडकेनंतर दुचाकी वरुन प्रवास करणारे पाचही जण रस्त्यावर फेकले गेले, अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली.स्थानिकांनी तत्काळ धाव घेत जखमींना रुग्णालयात हलवले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे
कैवल्य एकनाथ भोते असे मृत मुलाचे नाव असून तो आपल्या वडील आणि भावासोबत पोहण्यासाठी गेला होता. जलजीवन मिशन अंतर्गत खोदलेल्या सुमारे ४० ते ५० फूट खोल विहिरीत पोहत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला.स्थानिकांनी तातडीने शोधमोहीम सुरू केली, मात्र खोल पाण्यामुळे शोध घेणे कठीण झाले. त्यानंतर वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे आपत्ती व्यवस्थापन पथक आणि शिवदुर्ग मित्र लोणावळा यांच्या संयुक्त प्रयत्नातून अवघ्या दहा मिनिटांत कैवल्यचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.या घटनेमुळे घोटवडी परिसरात शोककळा पसरली असून भोते कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
बुलढाणा–देऊळघाट मार्गावर निवांत हॉटेलजवळ सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात विद्यार्थ्यांनी भरलेल्या इको पिकअप आणि बुलेट दुचाकीची जोरदार धडक झाली. या अपघातात बुलेटस्वार मोहम्मद तौसिफ यांचा मृत्यू झाला असून चार विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. टक्कर इतकी जबरदस्त होती की पिकअप वाहन दोनदा पलटी झाल्याची माहिती समोर आली आहे....
मुंबईतील विकासकामांची खरी परिस्थिती पुन्हा उघड मुलुंड-गोरेगाव लिंक रोड येथे सुरू असलेल्या ब्रिजकामादरम्यान कोणतीही सुरक्षा व्यवस्था नसताना लोखंडी तुकडा थेट फॉर्च्युनर कारवर कोसळला. सुदैवाने जीवितहानी टळली, मात्र वाहनाचे मोठे नुकसान झाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.