Manoj Jarange Patil Saam Tv
महाराष्ट्र

Chhatrapati Shivaji maharaj statue : छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं राजकारण बंद करा अन्यथा...; मनोज जरांगे पाटील यांचा इशारा

manoj jarange patil on chhatrapati shivaji maharaj statue : मनोज जरांगे पाटील यांनी मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा कोसळल्याप्रकरणावरून राजकीय नेत्यांना खडेबोल सुनावले आहे.

विश्वभूषण लिमये

सोलापूर : मालवणमधील छत्रपती शिवरायांचं पुतळा कोसळल्यानंतर राजकारण ढवळून निघालं आहे. छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर राजकीय नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. या घटनेनंतर आदित्य ठाकरे आणि नारायण राणे यांच्या समर्थकांमध्ये हाणामारी देखील झाली आहे. त्यानंतरही या प्रकरणावरून एकमेकांवर टीका केली जात आहे. आता या प्रकरणात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उडी घेतली आहे. 'नेत्यांनी राजकारण बंद करा अन्यथा जनतेला तुमच्या विरोधात उठाव करावा लागेल, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी इशारा दिला आहे.

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे सोलापूर दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी मालवणमधील प्रकरणावरून राजकीय नेत्यांना खडेबोल सुनावले. मालवण पुतळा प्रकरणावर मनोज जरांगे पाटील म्हणाले, 'या प्रकरणामुळे देशातील लोकांच्या भावना दुखावल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज हे देशाचे दैवत आहेत. एवढ्या मोठ्या स्मारकांबाबत दुर्दैवी घटना घडली आहे. यामुळे आमच्या भावना दुखावल्या आहेत. या प्रकरणी कोणीही राजकारण करू नका. छत्रपती शिवाजी महाराज यांचा वापर राजकारणासाठी करू नये. शेवटी हे राज्यातील जनतेच्या अस्मितेचा प्रश्न आहे. राजकारण करायला नेत्यांना खूप जागा आहेत. याप्रकरणी राजकारण करू नका'.

'सत्ताधारी असो किंवा विरोधक असो या प्रकरणी राजकारण करू नये. याप्रकरणी कोणी दोषी असेल तर त्याला कायमचं आतमध्ये टाकलं पाहिजे. राजकारण बंद करा अन्यथा जनतेला तुमच्या विरोधात उठाव करावा लागेल, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.

पंतप्रधान मोदींच्या माफीनाम्यावर भाष्य करताना जरांगे पाटील म्हणाले, ' त्यांनी उद्घाटन केलं. त्यात त्यांचा काय दोष आहे. घटना तर घडली आहे. त्यामुळे माफी मागितली काय नाही, मागितली काय? आमची मानहानी व्हायची, ती झाली आहे. मात्र या प्रकरणात जो कोणी दोषी असेल तो आत गेला पाहिजे'.

'मालवण येथील पुतळा उभारण्यासाठी राज्य सरकारने गडबड केली हे खरं आहे. त्यात आता राजकारण करू नये. असे प्रकरण परत होऊ नये यासाठी कायद्यात दुरुस्ती करावी,असेही ते म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: वाल्मीक कराडची पोलखोल करणाऱ्या विजयसिंह बांगर यांनी घेतली अप्पर पोलीस अधीक्षकांची भेट

Auto Rickshaw Bag : बाजारात आलीये नवीन ऑटो रिक्षा बॅग, फॅशनचा नवा ट्रेंड

Somnath Suryawanshi: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणाला नवं वळण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश|VIDEO

Kondhwa Girl Abused : डिलिव्हरी बॉयकडून तरुणीवर अत्याचार; ५०० CCTV तपासले, पुण्यातील 'त्या' घटनेत मोठा ट्विस्ट, सेल्फी घेतलेला तरुणच...

Snake Smuggling: हिंगणघाटातील सापांची परदेशात तस्करी? अजगर, कोबरा, धामण, कवड्या; तब्बल विविध प्रजातीचे 13 साप जप्त

SCROLL FOR NEXT