Manoj Jarange Patil Saam TV
महाराष्ट्र

Manoj Jarange Patil : २३ तारखेला 'दूध का दूध, पानी का पानी' होईल; मराठा आरक्षणावरून मनोज जरांगेंचा सरकारला इशारा

Ruchika Jadhav

लक्ष्मण सोळुंके

Maratha Aaraskhan:

आज पासून मनोज जरांगे पाटील आपल्या पाचव्या टप्यातील दौऱ्याला सुरवात करत आहेत. या दौऱ्यानिमित्त त्यांनी बोलताना मराठा समाजाला जो संघर्ष करावा लागत आहे तो कुठं तरी थाबला पाहिजे आणि मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे अशी भावना व्यक्त केलीये. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशनाची घोषणा केलीये. यावर विरोधी पक्षाकडून आचारसंहिता लागणार असल्याने विशेष अधिवेशन कसं बोलवणार असा प्रश्न उपस्थित केलाय. त्यावर देखील मनोज जरांगे पाटील यांनी बोलताना मराठा आरक्षण प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत निवडणुका तर झाल्या पाहिजे ना? त्यामुळे आचासंहिता लागणार कशी? असा सवाल उपस्थित केलाय.

२४ डिसेंबरपर्यंत आरक्षण मिळणारच, असा विश्वास ही त्यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच पुढे ते म्हणाले, मुख्यमंत्री यांच्यावर समाजाने विश्वास टाकला त्यांच्या शब्दाचा सन्मान केला अत्ता त्यांनी समाजाचा सन्मान करावा. त्यांनी काल आरक्षणाचा विषय पटलावर मांडला त्यात एक दोन शब्द ते विसरले त्या बाबद ही ते स्पष्ट करतील, असं जरांगे पाटील म्हणाले.

सरकार सरकारचं काम करत आहे. आम्ही आमचं काम सुरूच ठेवलं आहे. मागचे अनुभव आणि घोषणा पाहता आम्ही उड्या मारणार नाही. जे चांगलं असेल त्याला चांगलं म्हणू जे न पटणारं असेल त्याला विरोध करू. त्यामुळे सरकार आणि मुख्यमंत्री काय मंडतात त्याचा निर्णय २४ तारखेनंतर होणार आहे. त्यामुळे २४ तारखेला दूध का दूध पानी का पानी होणारच असल्याचा उशारा, मनोज पाटील जरांने यांनी सरकारला दिला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maggi Dosa Recipe : मुलांना टिफीनमध्ये द्या झटपट बनवलेला मॅगी डोसा; वाचा 5 मिनिटांत तयार होणारी रेसिपी

Maharashtra News Live Updates: पंतप्रधान मोदींचा आज वर्धा दौरा; असा असेल कार्यक्रम...

Palghar Crime: निर्मात्याकडून अश्लील मेसेज अन् छेडछाड; २६ वर्षीय अभिनेत्रीची पोलिसात तक्रार, मुंबईमधील धक्कादायक प्रकार

Bigg Boss Marathi : संग्रामला टोला, अरबाजचं तोंडभरून कौतुक; उत्कर्ष शिंदे काय म्हणाला ?

Western Railway Jobs : पश्चिम रेल्वेत सर्वात मोठी भरती, तब्बल ५०६६ जागा भरणार, पगार किती ? तुम्ही पात्र आहात का? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT