BJP’s Operation Lotus jolts Mahayuti: Ajit Pawar and Shinde face political shockwaves in Solapur. saam tv
महाराष्ट्र

Mahayuti: भाजपचं ऑपरेशन लोटस! महायुतीतच मित्र पक्षांमध्ये फोडाफोडी; राष्ट्रवादीला खिंडार, शिंदेंना दे धक्का

BJP Operation Lotus: स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीचं स्वबळावर मैदान मारण्यासाठी महायुतीमध्येच जोरदार रस्सीखेच सुरू झालीय. यासाठी भाजपनं अजितदादांच्या राष्ट्रवादीला खिंडार पाडलंय आणि शिंदेसेनेलाही धक्का दिलाय. भाजपनं कोणत्या जिल्ह्यात आपल्या मित्र पक्षांविरोधात ऑपरेशन लोटस केलंय पाहूयात स्पेशल रिपोर्ट.

Suprim Maskar

  • महायुतीतील मित्रपक्षांमध्येच फोडाफोडी सुरू झालीय.

  • राष्ट्रवादीला आणि शिंदे सेनेलाही मोठा धक्का

  • स्थानिक स्वराज्य निवडणुकीपूर्वी महायुतीत तणाव वाढताना दिसत आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसलीय. विधानसभा निवडणुकीत विक्रमी जागा मिळवत सत्ता काबीज केल्यानंतर आता भाजपने आपला मोर्चा स्थानिक स्वराज्य संस्थांकडे वळलाय.महायुतीत स्वबळाच्या रस्सीखेचमुळे थेट मित्र पक्षांमध्येच फोडाफोडीचं राजकारण सुरू झालंय. सोलापूरात भाजपनं आपल्या मित्र पक्षांविरोधातच ऑपरेशन लोटस यशस्वी केलंय..अजितदादांच्या राष्ट्रवादीला खिंडार पाडलं असून शिंदेसेनेलाही धक्का दिलाय.

अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या सोलापुरातल्या 22 नेत्यांनी भाजपात पक्षप्रवेश केलाय. तर शिंदेंसेनेच्या 2 नेत्यांनी भाजपची वाट धरलीय. अजितदादांच्या राष्ट्रवादीचे मोहोळचे माजी आमदार यशवंत माने आणि माजी आमदार राजन पाटील यांनी भाजपात पक्षप्रवेश केलाय. सोलापुरातील राष्ट्रवादीचे माजी उपाध्यक्ष बाळराजे पाटील यांनीही भाजपात पक्षप्रवेश केलाय.

तर 2019 चे मोहोळ विधानसभेचे शिवसेनेचे उमेदवार आणि सध्या शिंदेसेनेत असलेले नागनाथ क्षीरसागर आणि त्यांचा मुलगा सोमेश क्षीरसागर यांनीही भाजपचं कमळ हाती घेतलयं. दरम्यान राष्ट्रवादी आणि शिंदेसेनेतील इनकमिंगमुळे भाजपला जिल्ह्यात कसा फायदा होणार? आणि जिल्ह्यात भाजपची पुढची रणनिती काय आहे? पाहूयात.

सोलापूर जिल्ह्यात ज्याच्या हाती सहकारी संस्था त्याच्याकडे सत्तेची चावी हे राजकीय गणित राहिलंय. त्यात सहकारी संस्थांच्या माध्यमातून राष्ट्रवादीनं आपलं वर्चस्व सोलापुरात प्रस्थापित केलं.. अशात राष्ट्रवादीच्या नेत्यांना भाजपात पक्षप्रवेश देऊन सहकाराच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जिंकण्याची रणनिती भाजपनं आखलीय.

दोन दिवसांपूर्वीच अमित शाहांनी भाजपला महाराष्ट्रात कुबड्यांची गरज नसल्याचं सूचक विधान केलं होतं. आता या कुबड्या दूर करण्याचंच धोरण भाजपनं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून राबवायला सुरूवात केलीय का याचीच चर्चा या निमित्तानं रंगलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jio: धमाकेदार ऑफर, युजर्सला थेट ३५ हजाराचा फायदा, जिओची अनोखी स्किम

पीक विमा योजनेत शेतकऱ्यांची क्रूर थट्टा, 3, 5 आणि 8 रूपयांची नुकसान भरपाई

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर बच्चू कडूंची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक संपली, काय निर्णय झाला? VIDEO

Friday Horoscope : दिवसभरात महत्त्वाची वार्ता कानावर पडणार; ५ राशींच्या लोकांचं आयुष्यात मोठं काहीतरी घडणार

Dombivli Crime : खराब नारळ का दिलं? ग्राहकाने जाब विचारल्याने विक्रेता भडकला; चाकू हल्ल्यात ग्राहकाची करंगळी तुटली

SCROLL FOR NEXT