Uddhav Thackeray, Eknath Shinde, Maharashtra Politics, Supreme Court  saam tv
महाराष्ट्र

बंडखाेरांना धडा शिकविण्यासाठी सर्वाेच्च न्यायालयात याचिका दाखल; पाच वर्षांची बंदी घालण्याची मागणी

सध्या महाराष्ट्रात सुरु असलेल्या राजकीय घडामाेडींवर केवळ राज्यातीलच नव्हे तर देशातील नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.

Siddharth Latkar

नवी दिल्ली : नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडामुळं महाविकास आघाडीचे सरकार अस्थिर झाले आहे. गेल्या दाेन दिवसांत राज्यातील (maharashtra) राजकीय (political) वातावरण ढवळून निघाले आहे. महाराष्ट्रात सुरु असलेल्या या राजकीय वादळ आता सर्वाेच्च न्यायालयात जाऊन पोहोचले आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील नव्हे तर मध्य प्रदेशमधील काँग्रेसच्या (Congress) महिला नेत्या जया ठाकूर यांनी यामध्ये उडी घेत पुन्हा एकदा सर्वाेच्च न्यायालयाचे (Supreme Court) दरवाजे ठाेठावत बंडखाेरांना धडा शिकविण्यासाठी याचिका दाखल केली आहे. (Maharashtra Political News)

ठाकूर यांनी दाखल केलेल्या याचिकेत जे आमदार राजीनामा देतील आणि निलंबित होतील, त्यांना पुढील पाच वर्षांसाठी निवडणूक लढवता येऊ नये अशी मागणी केली आहे. आमदारांचे निलंबन आणि राजीनामा दिल्याच्या तारखेपासून त्यास पुढील पाच वर्षांसाठी निवडणूक लढवण्यापासून राेखावे असे ही याचिकेत नमूद करण्यात आले आहे.

काँग्रेस नेत्या जया ठाकूर यांनी यापुर्वी याचिका दाखल केली आहे. त्यातच एक नवी अर्ज देत मागणी केली आहे. राज्य घटनेच्या दहाव्या अनुसूचीप्रमाणं आमदारांना शिस्तभंगाच्या कारवाई द्वारे पद गमवावं लागलं. ज्या कालावधीसाठी त्यांना निवडून देण्यात आले आहे. त्यापूर्वी त्यांनी राजीनामा दिल्यास त्यांना आगामी पाच वर्षे निवडणूक लढवण्यास राेखावे अशी मागणी त्यामध्ये करण्यात आली आहे.

ठाकूर यांच्या याचिकेवर सर्वाेच्च न्यायालयात सन २०२१ पासून सुनावणी सुरु आहे. राज्यातील सध्याच्या राजकीय स्थिती पाहता ठाकूर यांनी पुन्हा एकदा सर्वाेच्च न्यायालयाचे दरवाजे ठाेठावले आहेत. ठाकूर यांनी केंद्र सरकार (Central Government) , भारत निवडणूक आयोगाने (Election Commission Of India) याचिकेवर त्यांची भूमिका मांडणारी प्रतिज्ञापत्र सादर केले नसल्याचे म्हटले आहे. त्याबाबतची नोटीस सा जानेवारी २०२१ कालावधीत काढण्यात आल्याचे ही ठाकूर यांनी सांगितले.

पक्ष बदलणे, राजीनामा देणे यासंदर्भातील कठोर नियम नसल्याने राजकीय पक्ष जनतेने निवडून दिलेले सरकार पाडण्यासाठी त्याचा गैरवापर करत असल्याचे ठाकूर यांनी नमूद केले. त्या म्हणाल्या देशात आणि विविध राज्यात सध्या असे घडताना दिसत आहे. महाराष्ट्रात सध्या असाच प्रकार सुरु असून हे म्हणजे राजकीय पक्ष लोकशाही नष्ट करण्याचा प्रकार करीत आहेत असेही याचिकेत नमूद केले आहे.

न्यायालयाने या प्रकरणी महत्त्वाची भूमिका बजवावी अशी भावना ठाकूर यांनी व्यक्त केली आहे. कर्नाटक (Karnataka), मणिपूर (Manipur), मध्य प्रदेश (Madhya Pradesh) या राज्यांचा संदर्भ देत लोकशाही आणि घटनाविरोधी कृत्य थांबली पाहिजे अशी मागणी केल्याचे ठाकूर यांनी स्पष्ट केले. राजीनामास्त्र, बंडखोरी यामुळे राज्याला स्थिरता मिळत नाही. त्यामुळे राजीनामा देणाऱ्या किंवा शिस्तभंगाची कारवाई होऊन सदस्यत्व रद्द हाेणा-यास पुन्हा त्यास विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीस उभे राहण्यास राेखावे अशी मागणी याचिकेत केल्याचे ठाकूर यांनी म्हटलं.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT