Devendra Fadnavis on Uddhav Thackeray saam tv
महाराष्ट्र

Devendra Fadnavis Statement: उद्धवजी माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचा इशारा; म्हणाले, 'ज्यांच्या अलमारीत सांगाडे...'

साम टिव्ही ब्युरो

Maharashtra Politics: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यातील वार प्रतिवार चांगलेच धारदार झाले आहेत. ठाकरेंच्या व्हॉट्सअॅप चॅटच्या टिकेला उत्तर देताना फडणवीसांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. उद्धवजी माझ्या नादी लागू नका, मी कधी कुणाच्या भानगडीत पडत नाही आणि पडलो तर सोडत नाही, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना दिला आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, काल मी पाटण्यातील विरोधकांच्या बैठकीला परिवारवादी म्हटले, तर उद्धव ठाकरे यांना मिरची झोंबली. पण उद्धवजी 'तुमको मिर्ची लगी तो क्या करू?' मी काचेच्या घरात राहत नाही, तुम्ही राहता. त्यामुळे माझ्या नादी लागू नका. ज्यांच्या आलमरीत सांगाडे पडले आहेत, त्यांनी सावकारीचा आव आणायचा नसतो. ते सांगाडे बाहेर निघाल्याशिवाय राहणार नाही.

मी कधी कुणाच्या भानगडीत पडत नाही आणि पडलो तर सोडत नाही, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर प्रतिवार केला आहे. अडीच वर्ष तुम्ही 100 कोटींची वसुली करणारे, फेसबुकवर असलेले, घरी बसलेले सरकार पाहिले, आता खऱ्या अर्थाने जनतेचे सरकार आले आहे, असेही फडणवीस म्हणाले.

"पवारांची मुत्सद्देगिरी, शिंदेंची गद्दारी कशी?"

देवेंद्र फडणवीस म्हणाले, 1978 मध्ये वसंतदादा पाटील यांच्या मंत्रिमंडळातून शरद पवार आमदार घेऊन बाहेर पडले आणि भाजपसोबत मुख्यमंत्री झाले. त्यांनी केली तर ती मुत्सद्देगिरी आणि तेच शिंदे यांनी केले तर गद्दारी? हा कुठला न्याय असा सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विचारला. (Marathi Tajya Batmya)

"सर्व परिवारवादी पक्षांना कुटुंबाची चिंता"

देवेंद्र फडणवीस म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अनेक उपलब्धी आहेत. पण सर्व परिवारवादी पक्ष एकत्र आणले, ही सुद्धा एक उपलब्धीच म्हणावी लागेल. या सर्व परिवारवादी पक्षांना चिंता कुटुंबाची आणि ज्यांचा परिवार संपूर्ण देश आहे, ते नरेंद्र मोदी आहेत. या बैठकीत ठराव काय झाला तर राहुल गांधी यांची दाढी करा आणि त्यांचे लग्न करा अशी टीका फडणवीस यांनी केली. (Latest Political News)

"काँग्रेसला लोकशाहीवर बोलण्याचा अधिकार नाही"

फडणवीस म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौऱ्यावर गेले. अमेरिकेतील त्यांचं भव्य स्वागत संपूर्ण जगाने पाहिले. दुसरीकडे राहुल गांधी अमेरिकेत जाऊन भारत कसा वाईट यावर व्याख्यानं देतात. त्यांनी भारतात लोकशाही नाही असे सांगितले आणि त्यावर अमेरिकेनेच खुलासा करून सांगितले की भारतात लोकशाही देश आहे. ती समृद्ध सुद्धा होत आहे. खरं तर काँग्रेसला लोकशाहीवर बोलण्याचा अधिकार नाही, आजचाच दिवस आहे ज्यादिवशी इंदिरा गांधी यांनी लोकशाहीची हत्या केली होती असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; तीन वाहने एकमेकांना धडकली, पाहा VIDEO

Sukanya Samruddhi Yojana: १० हजार १५ वर्षे भरा, २१ व्या वर्षी मुलीच्या खात्यात तब्बल ३८ लाख; जाणून घ्या सरकारची भन्नाट योजना

Maharashtra Politics : महायुतीच्या जागावाटपाचं घोडं कुठं अडलं? कोणत्या पक्षाला काय हवं?

Mumbai Metro News: मुंबईकरांसाठी गुड न्यूज! 'मेट्रो ३' आरे ते बीकेसी टप्पा लवकरच सुरु होणार; ऑक्टोंबरमध्ये PM मोदी करणार लोकार्पण

Maharashtra Politics : अमित शहा पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार; महायुतीत काहीतरी मोठं घडणार, नेमकं काय?

SCROLL FOR NEXT