कल्याण डोंबिवली परिसरात सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. मुसळधार पाऊस सुरू असल्याने डोंबिवली बदलापूर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. साचलेल्या पाण्यात वाहन चालक आपल्या वाहना घेऊन जाताना दिसत आहेत. दोन दिवसापूर्वी या रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतूक बंद करण्यात वेळ वाहनातून पोलिसांवर आली होती. पाऊस असाच सुरू राहिला तर पुन्हा या रस्त्यावर वाहतूक बंद करण्याची वेळ येऊ शकते. प्रशासनाकडून योग्य रित्या नाले सफाई झाली नसल्याने पाण्याचा निचरा होत नसल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे.
मतदारयादीच्या विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) मोहिमेसाठी बीएलओ म्हणून कार्यरत शिक्षकांना दुपारी २ नंतर कार्यमुक्त करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ४ ते १९ जुलैदरम्यान जिल्ह्यातील शाळा सकाळच्या सत्रात भरविण्याचे निर्देश शिक्षण विभागाने सर्व शाळांना दिले आहेत. या कालावधीत बीएलओंनी दुपारनंतर घराघरांत जाऊन मतदार पडताळणी व माहिती संकलनाचे काम पूर्ण करावे, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात अमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे.. सुरेगाव गावठाण येथे घराशेजारीच गांजाची लागवड केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, कोपरगाव तालुका पोलिसांनी छापा टाकत तब्बल 22 किलो वजनाची गांजाची जीवंत झाडे जप्त केली आहेत
वर्षा पर्यटनाला जाणाऱ्या पर्यटकांसाठी आनंदाची बातमी आहे कोल्हापूरचा प्रसिद्ध राऊतवाडी चा धबधबा सुरू झाला आहे राधानगरी तालुक्यातील हा धबधबा पर्यटकांचे नियमित आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो पावसाचे आगार समजले जाणाऱ्या राधानगरी मधला हा धबधबा 50 ते 60 फुटावरून कोसळतो. त्याचे विहंगम दृश्य पाहण्यासारखे असते. सध्या पावसाचा जोर वाढला असून हा धबधबा आता प्रवाहित झाला आहे. या धबधब्याचे तुषार अंगावर झेलत वर्षा पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी हजारो पर्यटक येथे दाखल होतात .आता पर्यटकांची पावलं या धबधब्याकडे वळू लागले आहेत.
धडगाव तालुक्यातील तोरणमाळ परिसरातील सिंदीदिगर ,पाटीलपाडा गावात ग्रामीण संस्कृतीतील सहकार्याचे एक अनोखे दर्शन घडले. येथील वयोवृद्ध शेतकरी सयदाम पावरा हे त्यांच्या तीन एकर कोरडवाहू शेतात बैलजोडीच्या साहाय्याने पेरणीपूर्व नांगरटी करत होते. यंदा पावसाने पाठ फिरवल्यामुळे चिंतेत असलेले सयदाम हे पाऊस येण्याच्या आशेने एकटेच शेत तयार करण्यासाठी मेहनत घेत होते.
याच पार्श्वभूमीवर शहरात पावसाने दमदार हजेरी लावायला सुरुवात केली असून काळेकुट्ट ढगाळ निर्माण झाले आहेत
धो धो पडणाऱ्या पावसामुळे शहरातील साखळभाग जलमय झाले आहेत
पावसाचा जोर असाच कायम राहिला तर वसई विरार शहराचा संपर्क तुटण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे
दरडी दुर्घटनेत जिवीत हानी टळावी यासाठी रायगडच्या आपत्ती व्यवस्थापनाने संभाव्य दरडग्रस्त गावांमधील ग्रामस्थांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतराच्या सुचना दिल्या आहेत. यामध्ये महाड तालुक्यातील 72 गावे दरडप्रवन क्षेत्रात असून यांपैकी 20 गावे ही अतिधोकादायक परिस्थिती असल्याने येथील 1 हजार 146 नागरिकांना प्रशासनाकडून सुरक्षित स्थळी जाण्याच्या सूचना केल्या आहेत. जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे खबरदारी म्हणून नागरिकांना जिल्हा प्रशासनाकडून कोणतीही दुर्घटना होऊ नये याकरिता अतिधोकादायक असलेल्या 20 गावांना नोटीस बजावण्यात सुरक्षित स्थळी जाण्याच्या नोटीस बजावण्यात आल्या आहेत.
पालघर _ पालघर जिल्ह्यात आज रेड अलर्ट. जिल्ह्यात आज आणि उद्या असे दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता . खबरदारी म्हणून आज जिल्हा प्रशासनाकडून शाळा , महाविद्यालय आणि अंगणवाड्यांना सुट्टी जाहीर . जिल्हाधिकाऱ्यांनी अध्यादेश काढत केली सुट्टी जाहीर.जिल्ह्यात आज पावसाचा जोर वाढणार . अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडा जिल्हा प्रशासनाच नागरिकांना आवाहन . तर सूर्या प्रकल्पाच्या धामणी धरणामध्ये पाण्याच्या पातळीत वाढ. जिल्ह्यातील नदी नाले तुडुंब भरले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सकाळपासून जोरदार पाऊस सुरू असून किनारपट्टी भागासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत आहेत. कणकवली, कुडाळ, सावंतवाडीसह किनारपट्टीचा भाग असलेल्या वेंगुर्ला व मालवण तालुक्यातही आज पावसाचा जोर दिसून येत आहे. हवामान विभागाकडून आज आॅरेज अलर्ट देण्यात आला असून मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्या अनुषंगाने नागरीकांनी काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.