सातबाऱ्यावर नाव चढविण्यासाठी 3000 ची लाच मागितली ती स्विकारताना रंगेहात पकडले
सुरज पुरोहीत, तलाठी आणि भगवान मोरे, मंडळ अधिकारी अशी अरोपींची नाव आहेत
महाड तालुक्यातील रायगड परिसरातील वरंडोली गावतील खरेदी खत झालेल्या जागेची 7 / 12 उताऱ्यावर नाव नोंद करण्यासाठी मागीतली लाच
वाशिमच्या भटउमरा शिवारात रामचंद्र काळे या शेतकऱ्याच्या गोठ्याला आग लागून जनावारांचा चारा जळून खाक झालाय. रामचंद्र काळे हे दुग्ध व्यवसाय करतात. त्यासाठी त्यांच्याकडे १५ म्हशी आणि ९ गाई आहेत. या जनावारांना लागणार सुका चारा त्यांनी जमा करून ठेवला होता. आज सायंकाळच्या सुमारास काळे घरी गेलेले असतांना चाऱ्याला अचानक आग लागली आणि ५० ट्रॉली कुटार, तीन हजार पेंढ्या कडबा पूर्णतः जळाला तर एक छोटा ट्रॅक्टरही अर्धवट जळालाय.
साताऱ्यातील वाई येथे वादळी वार आणि पावसामुळे फळ बागेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे शेतकऱ्यांनी त्यामुळे जवळपास शेतकऱ्याचे 50 लाख रुपयाचे नुकसान झाले आहे.. अवकाळी पावसाने आंबा, संत्रे या बागचे नुकसानझाले असून सदरील नुकसान भरपाईचे पंचनामे करूनतत्काळ मदत करावी अशी मागणी शेतकरी करत आहेत, या नुकसानीची पाहणी करण्यासाठी परभणीच्या पालक मंत्री मेघना बोर्डीकर या गावाला उद्या भेट देणार असल्याची माहिती आहे. यासोबत माहेर, धानोरा मोत्या, गोविंद पूर या गावात वीज पडून तीन जनावरे दगावली आहेत.
आयपीएलच्या क्रिकेट मॅचेसवर सट्टा लावून नागरिकांसोबत आर्थिक व्यवहार करणाऱ्या अड्ड्यावर भंडाऱ्याच्या एलसीबी पथकानं छापा घातला. या कारवाईत पोलिसांनी एक दुचाकी, तीन मोबाईल, एक कॅल्क्युलेटर यासह दोन हजार शंभर रुपये रोख असा ६७ हजार ७१५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आयपीएल क्रिकेटवर सट्टा खेळणाऱ्या अभिषेक गिऱ्हेपुंजे याला पोलिसांनी अटक केली असून त्याचे काही सहकारी फरार झाले आहेत.
आरोपीकडून १६ तोळे सोने जप्त
सैन्य दलातील फरार शिपाईच निघाला चोर
सैन्य दलातील जवानाच्या घरातून सोन्याचे दागिने चोरणाऱ्या आरोपीला वानवडी पोलिसांनी साताऱ्यातून अटक केली
पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून १३ लाख ७७ हजार रुपये किमतीचे १६ तोळे सोन्याचे दागिने जप्त केले
अमरजीत विनोदकुमार शर्मा (वय ३०) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे
जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणं आहेत
पोलीस यंत्रणा दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या व्यवस्थापना सोबत बोलून देत नाही
म्हणून हॉस्पिटल प्रशासनाचा निषेध करत रस्ता रोको करण्यात आलाय
मनोवादी हॉस्पिटलच्या निषेध घोषणा देत रस्ता रोको करण्यात आलेला आहे
हवामान खात्याने राज्यात अवकाळी पावसाचा इशारा दिलाय. कल्याण-डोंबिवलीमध्ये आज सकाळपासून ढगाळ वातावरण होतं. दुपारच्या सुमारास कल्याण डोंबिवलीत वादळी वारा वाहू लागला. काही क्षणातच रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे. अचानक कोसळलेल्या पावसामुळे खरेदीसाठी घराबाहेर पडलेल्या नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली.
मध्य रेल्वे, मुंबई विभाग रविवार दिनांक ०६.०४.२०२५ रोजी उपनगरीय विभागांवर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मेगा ब्लॉक परिचालीत करणार आहे.
ठाण्यात सोसाट्याचा वारा सुटलाय
ढगाळ वातावरण त्याचबरोबर पाऊस पडण्याचा अंदाज देखील येतोय
मोठ्या प्रमाणात वारा हा सुटला आहे
त्यामुळे संपूर्ण शहरात धूळ ही पसरली आहे
मेट्रो रस्त्यांची कामे सुरू असल्यामुळे धुळीचे साम्राज्य वाऱ्यामुळे संपूर्ण शहरभर पसरले आहे.
शहापूर तालुक्यात जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावली असून वादळी वाऱ्यासह गारपीट पडत आहेत. सध्या उकाड्याने हैराण झाले असून उन्हाचा तडाखा वाढला आहे. यातच दुपार नंतर अवकाळी पावसाने हजेरी लावली. वादळी वाऱ्यासह पाऊस पडत आहे. तालुक्यातील काही भागात गारपीट देखील झाली आहे.
नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी पोलिसांना जमावाची मारहाण.
पोलिस ठाण्याचे कृष्णा गोडसे आणि रामदास वाघ यांचे कपडे फाडले.
झाडावर लटकलेल्या मृतदेहाची चौकशी करण्यासाठी इगतपुरी पोलीस स्टेशनचे कर्मचारी त्याठिकाणी पोहोचले.
पोलिसांनी फाशी घेतल्याचा दावा केल्याने आदिवासी जमाव संतप्त.
चार दिवसांपूर्वी झाली होती घटना, किरकोळ गुन्हा दाखल करत पोलिसांचे या घटनेकडे दुर्लक्ष.
पुण्यातील बजाज इलेक्ट्रिक सर्व्हिस सेंटरला आग
सकाळी ८ वाजता पुण्यातील बोपोडी चौकालगत कुंदन रेसिडन्सी येथे पहिल्या मजल्यावर आगीची घटना.
या इमारतीत असणाऱ्या बजाज इलेक्ट्रिक सर्व्हिस सेंटरमध्ये आगीची घटना.
अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात आणण्यास यश.
या घटनेत जिवीतहानी नाही. मात्र साहित्य जळाले.
आगीचे कारण अस्पष्ट
- सोलापुरात ६०० घंटागाडी कर्मचाऱ्यांचं विविध मागण्यासाठी धरणे आंदोलन.
- किमान वेतन मिळावे, पीएफ ईएसआय मिळावा तसेच हक्काच्या ४ सुट्ट्या मिळाव्यात या मागणीसाठी आजपासून बेमुदत धरणे आंदोलन.
- घंटागाडी कर्मचाऱ्यांना प्रचंड आरोग्याच्या प्रश्नाला समोर जावेलागत आहे.
- आम्हाला किमान वेतन मिळावं, आरोग्याच्या सोयी सुविधा दिल्या गेल्या पाहिजे यासाठी आंदोलन सुरू.
- जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत सोलापूर शहरातील घंटागाडी कामगार काम बंद करणार.
- दरम्यान या आंदोलनामुळे आता सोलापुरातील स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आलाय.
चंद्रपूर शहरात धुळ, खड्डे अनावश्यक खोदकाम व महानगरपालिकेतील घोटाळ्याच्या विरोधात माजी नगरसेवक पप्पू देशमूख यांच्या नेतृत्वात चंद्रपूर महानगरपालिकेच्या समोर आंदोलन करण्यात आले. यावेळी पप्पू देशमुख यांनी आयुक्तांच्या गाडीवर पैसे उडवित निषेध केला. यावेळी महास्वाक्षरी अभियान घेत सह्यांचे पत्र मुख्यमंत्री यांना पाठविण्यात येणार आहे.
- मानकापूर परिसरात पहाटे चार वाजताचा सुमारास तीन चोरट्यांनी चक्क पंजाब नॅशनल बँकेचे एटीएम मशीन घेऊन पसार झाल्याची घटना घडलीय.
- मानकापूर चौकातील पंजाब नॅशनल बँकेचे एटीएम मशीन ही चोरट्यांनी छोटा मालवाहू वाहनात घेऊन पसार झाले.
- एटीएममध्ये ७ लाख ५८ हजाराची रक्कम असल्याची पोलिसांची माहिती..
- एटीएम मशीन नेताना तीन आरोपी सीसीटीव्ही मध्ये कैद. सीसीटीव्हीच्या माध्यमातून तपास करून मानकापूर पोलिस आरोपीचा शोध घेत आहे.
- पाण्यासाठी आदिवासी महिलांचा पंचायत समितीबाहेर ठिय्या
- विल्होळी ग्रामपंचायत हद्दीतील आदिवासी पाड्यावर भीषण पाणीटंचाई
- आदिवासी पाड्यावर पाणी येत नसल्यानं महिलांना करावी लागते हंडाभर पाण्यासाठी पायपीट
- नाशिक मुंबई महामार्ग ओलांडून जीव धोक्यात घालत दररोज पाण्यासाठी जीवघेणा प्रवास
- शासनाने पाड्यापर्यंत नळजोडणी देण्याची आदिवासी महिलांची मागणी
- जोपर्यंत पाड्यापर्यंत नळजोडणी देणार नाही, तोपर्यंत ठिय्या आंदोलन मागे घेणार नाही, आदिवासी महिलांची भूमिका
विहिरीत पडलेला ट्रॅक्टर बाहेर काढण्यात आले.
सकाळी आठ वाजता नांदेडच्या आलेगाव शिवारात मजुराला घेऊन जाणार ट्रॅक्टर विहिरीत कोसळलं होतं
विहिरीत पाणी जास्त असल्याने सकाळपासून बचाव कार्य या ठिकाणी सुरू होते
एका महिलेचा मृतदेह थोड्याच वेळात बाहेर काढण्यात आला
आणि आता ट्रॅक्टर बाहेर काढण्यात आले.
अजून सात मृतदेह विहिरीत असल्याची प्राथमिक माहिती
उर्वरित मृतदेह बाहेर काढण्यासाठी प्रशासनाचे अथक प्रयत्न सुरू
राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत हे आज सातारा जिल्हा दौऱ्यावर आहेत, त्यांनी आज मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या घरी सदिच्छा भेट घेतली,
आयटी पार्क साताऱ्यात व्हावे अशी मंत्री शिवेंद्रराजे यांची इच्छा होती, त्यांनी वारंवार पाठपुरावा देखील शासनाकडे करण्यात आला होता,
तरुणांना पुण्या मुंबईकडे जाण्यापेक्षा साताऱ्यातच आयटी पार्क व्हावी अशी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र राजे यांची इच्छा होती, आणि आज उद्योग मंत्री उदय सामंत आणि मंत्री शिवेंद्रराजे यांच्यामध्ये याच संदर्भात महत्त्वाची बैठक पार पडली
उद्योग मंत्री उदय सामंत बोलताना देखील म्हणाले आज मी साताऱ्यात असतानाच आयटी पार्कचा विषय मार्गी लावून मुंबईला जाणार असल्याचे सांगितले आहे,
त्यामुळे आज आयटी पार्कच्या संदर्भात कोणता महत्त्वाचा निर्णय उद्योग मंत्री उदय सामंत हे घेतात हे पाहणे देखील महत्त्वाचा आहे
नंदुरबार जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकांसोबतच घराचे देखील पडझड आणि नुकसान झालं असून या नुकसानीचे पंचनामे प्रशासनाच्या वतीने सुरू करण्यात आले आहेत.
लवकरच पंचनामे पूर्ण होऊन शासनाकडे अहवाल पाठवला जाणार आहे यासाठी जिल्हा प्रशासन तातडीने शेतकऱ्यांच्या बांधावर आणि घराचं झालेल्या नुकसानीची पाहणी करत असून पंचनामे करून लवकर शासनाकडे पाठवला जाणार आहे
त्यामुळे शासनाने तातडीने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी नंदुरबार तालुक्यातील ठाणेपाडा आणि गंगापूर परिसरातील नागरिकांच्या वतीने करण्यात आली आहे.
महाराष्ट्राची आराध्य दैवत असलेल्या आई एकवीरा देवी यांच्या चैत्रोत्सवाला सुरुवात झालेली आहे.
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भाविकांची मोठी गर्दी एकविरा गडावर झाली आह.
ठाकरे कुटुंब आणि आगरी कोळी समाज यांचे आराध्य दैवत असलेल्या एकविरा देवी चा उत्सवाला आगरी कोळी भाविकांनी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गडावर उपस्थिती होती.
- नाशिकमध्ये मनसेचे गाजर आंदोलन
- शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला पाहिजे, यासह अन्य मागण्यांसाठी नाशिकमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आज एक दिवसीय लाक्षणिक आंदोलन करण्यात आलं.
नाशिकच्या त्र्यंबकरोड परिसरामध्ये मनसेचे कार्यकर्ते, पदाधिकारी हातात गाजर घेत आंदोलनाला बसलेत.
शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे, संतोष देशमुख हत्याकांडातील आरोपींना शिक्षा झाली पाहिजे, यासह अन्य मागण्यासाठी मनसेचे आज एक दिवशी लक्षणीय आंदोलन करण्यात आलं.
कॅनॉट परिसरातील महाराणा प्रताप उद्यानात राजपूत समाजाचा मोर्चा
राम सुमनलाल यांनी महाराणा सांगा यांच्या बद्दल राणा सांगा गद्दार है तुम हिन्दु राना सांगा की गद्दार औलाद है असे वक्तव्य केले होते
या वक्तव्याच्या विरोधात राजपूत समाज आणि करणे सेना आक्रमक
राम सुमनलाल यांच्या प्रतिमात्मक पुतळ्याला जोड्यांचा हार
राम सुमनलाल यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी
मराठी भाषेसाठी मनसे आक्रमक झालेय.
मनसेच्या शिक्षमंडळाने जुईनगर मधील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेला भेट दिलेय.
यावेळी बँकेमधील ट्रांजेक्शनच्या पावत्या इंग्रजी आणि हिंदीमध्ये उपलब्ध असून यासंदर्भात बँकेच्या अधिकाऱ्यांना मनसेच्या वतीने जाब विचारण्यात आला.
यावेळी बँकेच्या अधिकाऱ्यांना उजळणीचे पुस्तक भेट देत एका आठवड्यात ट्रांजेक्शनच्या पावत्या मराठीमध्ये न झाल्यास मनसे स्टाईलने उत्तर देऊ असा इशारा शहराध्यक्ष गजानन काळे यांनी दिलाय.
गेल्या काही दिवसांपासून उन्हाच्या तीव्र लाटेनंतर अचानक आलेल्या वादळी पावसाने शेतकऱ्यांना संकटात टाकले आहे.
कांदा काढणीच्या अंतिम टप्प्यात असलेल्या कांद्यावर आवकाळी पावसाने थेट घाला घातला शेतकऱ्यांनी लाखो रुपये खर्च करून कांद्याची लागवड केली होती.
उत्पादनासाठी वापरलेली खते, औषधे, मजुरी आणि वाहतूक या सर्वांचा मोठा भांडवली खर्च त्यांनी उचलला होता. मात्र, या पावसाने कष्टाने उभे केलेले पीक अक्षरशः मातीमोल झाले.
सावकारी जाचाला कंटाळून एका तरुण व्यापाऱ्याने विष प्राशन करून जीवन संपविले आहे.
घटना बीड शहरातील पेठ बीड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. मंगेश बोबडे असं मयत व्यापाऱ्याचे नाव आहे.
घटना घडून दोन आठवडे उलटत असले तरी पोलिसांनी अद्याप कसलीच कारवाई केली नाही. न्याय मिळावा यासाठी पीडित कुटुंब पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या उंबऱ्या झिजवित आहे.
सावकारी जाचातील आरोपी सर्वच राजकीय आहेत त्यामुळे पोलीस कारवाई करण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप पीडित कुटुंबाने केला आहे.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आज या कुटुंबाची भेट घेणार आहेत
महानगरपालिका आरोग्य प्रमुख नीना बोराडे पाठवणार नोटीस
आरोग्य उपसंचालकाने स्थापन केलेल्या चार सदस्य समितीत निना बोराडे यांचा समावेश
झालेला प्रकाराचा खुलासा दीनानाथ हॉस्पिटलकडून महानगरपालिका मागवणार
चार सदस्य समिती करणार दीनानाथ हॉस्पिटलची चौकशी
यामध्ये एक स्त्री रोग तज्ञ यांचा समावेश
आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिल्या आरोग्य उपसंचालकांना फोनवरून सूचना
समिती स्थापन करून करणार दिनानाथ हॉस्पिटलची आज पाहणी
राधाकिसन पवार यांच्या अहवालावरून दीनानाथ वरती केली जाणार कारवाई
सातपुडा परिसरात सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाची हजेरी....
अवकाळी पावसामुळे सातपुड्यातील कैरी उत्पादक शेतकरी अडचणीत....
मुसळधार पावसामुळे हरभरा, गहू आणि मका दादर या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच, दादर पिकाचेही नुकसान....
वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांचे उडाले पत्रे.....
हिंगोली जिल्ह्यातील महिला मजुरांना घेऊन जाणारे ट्रॅक्टर विहिरीत कोसळल्याने भीषण अपघात घडला आहे.
हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील गुंज गावातील ह्या शेतकरी महिला मजूर होत्या, ट्रॅक्टर मध् बसून या महिला जात असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर विहिरीत कोसळले.
दरम्यान या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी मदतकार्य सुरू करत दोन महिला सह एका पुरुषाला वाचवले आहे.
मात्र अद्याप ही आठ जण विहिरीत बुडाले असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.असून हिंगोली सह नांदेड पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले आहेत, धक्कादायक म्हणजे या विहिरीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी जमा झालेले असल्याने विहिरीमध्ये ट्रॅक्टर पूर्णपणे बुडाला.
बचाव कार्य सुरु असून पाणी जास्त असल्याने बचाव कार्यात अडथळा निर्माण होत आहे.
राज्यात महायुतीचं सरकार सत्तेत येण्यापूर्वी, तेव्हा शेतकऱ्यांना मोठं आश्वासन दिलं गेलं
संपूर्ण पिक कर्जमाफी आणि सातबारा कोरा मात्र प्रत्यक्षात काहीच झालं नाही.
त्यामुळे आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी थेट सरकारला लक्ष्य करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारण्याचं आवाहन केलं आहे.
आणि लाव रे तो व्हिडिओ म्हणत देवेंद्र फडणवीस यांची क्लिप सभेत वाजवून दाखवली.
मुख्यमंत्री आता सहा तारखेला वाशिम जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांनी कारंजा इथं कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं.
आता शेतकऱ्यांनी त्यांच्या पायातील पायथान काढून त्यांना विचारलं पाहिजे – आमचं कर्ज कधी माफ होणार?"
अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी येथील आराध्य दैवत असलेले राष्ट्रसंत रुपालाल महाराज यांच्या पुण्यतिथी सोहळ्याची सांगता करण्यात आली..
या पुण्यतिथी सोहळ्याला 22 हजार भाविकांनि उपस्थिती लावली होती..
रूपालाल महाराजांचा पालखी सोहळा अंजनगाव शहरातून रथाची ढोल,ताशे,दिंड्या, टाळ मृदुंगाच्या गजरात विविध धार्मिक वेशभूषांसह संपूर्ण शहरातून शोभायात्रा काढण्यात आली..
निरोप मार्ग सर्व भाविकांनी सुशोभित केला होता..
शोभा यात्रेनंतर काल्याचे किर्तन आणि महाप्रसादाचा कार्यक्रम घेण्यात आला.. यावेळी पोलिसांचा चौक बंदोबस्त पाहायला मिळाला..
वंशज आहात म्हणून तुम्हाला मुळशीतून जाऊ देतो अन्यथा मुळशीतून जाऊ दिलं नसतं
आमदार शंकर मांडेकर यांनी फाडलं निवेदन घेऊन गेलेले पत्र
निवडणूक काळात तुम्ही माझं काम केलं नाही असं सांगत आमदार शंकर मांडेकरांनी जेधेला सुनावलं
जेधे वाढण्यासाठी निधी मिळावा यासाठी शिफारस पत्र मागण्यासाठी गेले होते जेधे
आमदार शंकर मांडेकर यांची केली अजित पवारांकडे जेधेनी तक्रार
सूस येथील घनकचरा प्रकल्पामुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासाबाबतच्या तक्रारींवरून उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी महापालिका प्रशासनाला सज्जड दम भरला.
"सूस येथील घनकचरा प्रकल्प आजच बंद करा, अन्यथा या प्रकल्पाविरुद्ध खुर्ची टाकून बसावं लागेल,' असा इशारा पाटील यांनी दिल्यानंतर महापालिका प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली.
प्रकल्प बंद केल्यास तेथे येणारा कचरा जिरवायचा कुठे ? असा प्रश्न महापालिकेकडून उपस्थित करण्यात आला आहे.
सूस येथील घनकचरा प्रकल्पामध्ये दररोज १५० मेट्रीक टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते. संबंधित प्रकल्पामुळे स्थानिक नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होतो.
मागील दोन वर्षांपासून नागरिकांकडून हा प्रकल्प अन्यत्र हटविण्याची आग्रही मागणी केली जात होती. दरम्यान, हा प्रकल्प टप्प्याटप्प्याने बंद करून तो नांदे-चांदे येथे स्थलांतरित करण्याचा निर्णय जानेवारी २०२४ मध्ये झाला होता.
या बैठकीत पाटील यांनी संबंधित कचरा प्रकल्प तातडीने बंद करण्याच्या सूचना महापालिकेला दिल्या. त्यावेळी, प्रकल्पाच्या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सुधारणा करण्यात आले आहे.
प्रकल्प स्थलांतरित करण्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जागा ताब्यात आली नाही, त्यामुळे स्थलांतर रखडले असून त्यावर लवकरच कार्यवाही केली जाईल, असे प्रशासनाकडून पाटील यांना सांगण्यात आले.
हा प्रकल्प नियमांची पूर्तता करूनच सुरू केला असल्याने तो बंद करणे शक्य होणार नाही.प्रकल्प बंद केल्यास त्याचे मोठा भार महापालिकेवर पडणार आहे. प्रकल्पाबाबतच्या तक्रारी असतील, तर प्रत्यक्षात जागेवर जाऊन पाहणी करण्याची विनंती पाटील यांना केली जाईल.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या राज्य सरकारच्या शंभर दिवसाच्या कृती कार्यक्रमाचा आढावा घेण्यासाठी आज आणि उद्या पुण्यात दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार मार्गदर्शन करणार आहेत.
कार्यशाळेला राज्यातील सर्व विभागीय आयुक्त,जिल्हाधिकारी उपस्थित राहणार आहेत महत्त्वाचे महसूल अधिकारी ही हजेरी लावणार..
बालेवाडी येथील हॉटेलमध्ये ही कार्यशाळा आयोजित
सकाळी १० वाजता कार्यशाळा उद्घाटन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते उद्घाटन होणार..
येत्या दि. ६ ते ८ एप्रिल रोजी दुपारी दीड ते तीन तासांपर्यंत हा ब्लाॅक घेण्यात येणार आहे.
त्यामुळे पुढील तीन दिवस पुढीलप्रमाणे रेल्वे गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे.
त्यामध्ये एक्सप्रेस गाड्या नियमित करण्यात आल्या असून, लोकल ट्रेन शाॅर्ट टर्मिनेट करण्यात आल्या आहेत
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री संजय राठोड यांच्या नेतृत्वात आभार सभेत दरम्यान ठाकरेगट, प्रहार आणि मनसेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेना शिंदे गटात जाहीर पक्षप्रवेश केलाय.
ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख गजानन डोमाळे आणि तालुका प्रमुख संजय रंगे यांनी पक्ष प्रवेश केल्याने शिंदेगटाची ताकत वाढणार असल्याचे बोलल्या जात आहेत.
वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनच्या दरात वाढ झाल्याचं पहायला मिळालं असून तब्बल सहा महिन्यानंतर सोयाबीनने ४ हजार ६०० रुपयांचा टप्पा गाठलाय.
वाशिमच्या बाजारात सोयाबीनला ४३०० ते ४६०० रुपये येव्हढा दर मिळाला तर ३३०० क्विंटल आवक झाली होती.
सोयाबीनचा नवीन हंगाम सुरू झाल्यावर ऑक्टोबर महिन्यापासून दरात मोठी घसरण पाहायला मिळाली होती. अगदी तीन हजार आठशे रुपयापर्यंत दर खाली आले होते.
मात्र आता पुन्हा दरात वाढ होत असल्यानं शेतकऱ्यांना किमान हमीभाव मिळण्याची आशा निर्माण झालीये.
लातूर शहरासह ग्रामीण भागात काल सायंकाळी झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने शेती पिकांसह ,आंबा फळबागेच मोठ नुकसान झाल आहे...
जिल्ह्यातल्या रेनापुर तालुक्यातील पळशी शिवारात मागच्या तीन दिवसापासून होणाऱ्या वादळी वारा आणि अवकाळी पावसाने 3 एकर वरील केशर आंबा फळबागेच मोठे नुकसान झाला आहे त्यामुळे शेतकरी मदतीच्या अपेक्षा करत आहे..
पालघर शहरात सध्या चार चाकी वाहनांमधील बॅटरी चोरणाऱ्या चोरट्यांचा सुळसुळाट पाहायला मिळतोय .
महिनाभरात 50 पेक्षा अधिक कार , जेसीबी , डंपर , बस यांच्या बॅटरी चोरीला गेल्याच्या घटना समोर आल्या आहेत .
पालघर शहरासह परिसरातील भागांमध्ये या चोरट्यांनी सध्या धुमाकूळ घातला असून यामुळे चार चाकी वाहन मालक , जेसीपी आणि ट्रकचे मालक यांच्यामध्ये भीतीच वातावरण पाहायला मिळते .
मागील अनेक दिवसांपासून या चार चाकी वाहन मालकांकडून पालघर पोलिसांकडे तक्रार दिली असून सुद्धा पोलिसांच्या हाती याबाबत काहीच धागेदोरे लागत नसल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे .
तर रात्रीच्या सुमारास पोलीसगस्त वाढवून या चोरट्यांच्या मुस्क्या आवळाव्या अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.
अमरावती जिल्ह्यातील असदपूर अंतर्गत येणाऱ्या मौजे रायपूरच्या शेत शिवारात असलेल्या संजय तापडिया यांच्या पाच एकर शेतात असलेल्या बांबू, स्प्रिंकर पाईप, इतर शेती साहित्य शॉक सर्किट मुळे जळून खाक झाले आहे.
शेतकरी संजय तापडिया यांनी २०२१ मध्ये बांबू शेतीची लागवड केली होती,
शेतात असलेल्या महावितरणच्या डीपी मध्ये अनेक दिवसापासून शॉर्टसर्किट होत होता त्याची तक्रार देखील तापडिया यांनी केली,
महावितरण कडे अनेक वेळा तक्रारी देऊन दुरुस्ती केली नाही असा आरोप तापडिया यानी केला,
महावितरणच्या मनमानी कारभारामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पाच एकर शेतामध्ये लागवड केलेला बांबू जळून खाक झाल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवल्या जात आहे
सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून आम्हाला न्याय आणि नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी संजय तापडिया या शेतकऱ्यांनी केली आहे,
धाराशिव जिल्ह्यातील पहिले डिजिटल QR Code लायब्ररी असलेले तहसील कार्यालय म्हणून तहसील कार्यालय उमरगाची नोंद करण्यात आली आहे.
सात कलमी कृती कार्यक्रमाच्या अंतर्गत कार्यालयीन सोयी सुविधा/नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत या डिजिटल लायब्ररीची स्थापना करण्यात आली आहे.
या लायब्ररीचे उद्घाटन तहसीलदार गोविंद येरमे यांच्या हस्ते करण्यात आले.
तर या उपक्रमाचे जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी देखील कौतुक केले.
उल्हासनगरच्या शांतीनगर रस्त्यावर असलेल्या सोलापूर गादी कारखान्याला गुरुवारी सायंकाळी भीषण आग लागली.
या आगीत संपूर्ण दुकान जळून खाक झालं असून मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालंय.
या दुकानात मोठ्या प्रमाणात कापड आणि कापूस असल्याने आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण केलं.
उल्हासनगर महापालिका अग्निशमन दलाच्या जवानांकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं. ही आग कशामुळे लागली याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.
वक्फ बोर्ड बिला आडून देशातील मुस्लिम समाजाला दुय्यम स्थान देण्याचा प्रयत्न केंद्रातील भाजपा सरकार करीत असल्याचा आरोप सांगली जिल्ह्यातील मुस्लिम समाजाकडून करण्यात आला आहे.
वक्फ बोर्डाच्या जमिनीवर सरकारचा डोळा असून या जमिनी काढून घेऊन मुसलमानांना आर्थिक दृष्ट्या पुन्हा मागे नेण्याचे कारस्थान भाजपा सरकार करत असल्याचा आरोप करत वक्फ सुधारणा बिलाला विरोध दर्शवला आहे.
तसेच दिल्लीमधून याबाबत जे आंदोलन पुकारण्यात येईल त्यानुसार आंदोलन किंवा पुढील भूमिका घेतली जाईल, असे मुस्लिम समाजाच्यावतीने पत्रकार परिषदेत स्पष्ट करण्यात आले आहे.
सांगली जिल्ह्यातील जत आणि वाळवा तालुक्यात वारणा पट्ट्यात सायंकाळी सुसाट्याच्या वाऱ्यासह विजेच्या गडगडासह अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे..
यामुळे उन्हाळी भुईमूग गहू हरभरा शाळू मळणी काढणीचे काम रखडले आहे..
वादळी वाऱ्यामुळे आणि पावसामुळे काहीकाळ जण जीवन विष्कळीत झाले होते. जत तालुक्यात ही बऱ्यापैकी पावसाने हजेरी लावली होती.
महावितरणने जालना जिल्ह्यात वीजचोरांविरोधात धडक मोहीम उघडली आहे.
मराठवाड्यातील सहा जिल्ह्यांतील भरारी पथकांसह स्थानिक कार्यालयांनी 1 आणि 2 एप्रिल रोजी परतूर आणि मंठा तालुक्यात केलेल्या कारवाईत तब्बल 154 वीजचोऱ्या पकडल्या आहेत.
एकाच वेळी वेगवेगळ्या पथकांनी केलेल्या कारवाईमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून, वीजचोरांचे धाबे दणाणले आहे.
दरम्यान महावितरने जालना जिल्ह्यातील मंठा आणि परतुर तालुक्यात केलेल्या कारवाईत 154 जणांनी 1 लाख 34 हजार युनिट जवळपास 32 लाखांची वीज चोरी केल्याचं समोर आलं आहे...
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.