- सीना नदीमध्ये 2 लाख क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू
- सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गांवरील लांबोटी जवळील पूल पाण्याखाली जाण्याची परिस्थिती निर्माण झालीय
- सीना -कोळेगाव, खासापुरी आणि चांदनी प्रकल्पातून सीना नदीमध्ये सुमारे 2 लाख क्यूसेक पाणी सोडले
- सीना नदी पात्रातील माढा, मोहोळ आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील गावात पाणी शिरले.
- सीना नदीच्या प्रवण क्षेत्रामध्ये रात्रभर मुसळधार पाऊस झाल्याने सीना नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ
- धाराशिव, बार्शी भागात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने पाण्याच्या पातळीत वाढ
- सीना नदीवरील बापले, अनगर, मालिकपेठ, आष्टे हे सर्व बंधारे पाण्याखाली
- मोहोळ तालुक्यातील भोयरे गावात कोल्हापूर पद्धतीचा बंधारा पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद
बीड जिल्ह्यामध्ये ढगफुटी झाल्यामुळे सिंदफणा नदीला पूर आला आहे याचे पाणी बऱ्याच भागांमध्ये घुसले असून बीडच्या नांदूर हवेली गावाला याचा फटका बसला आहे गावामध्ये पाणी घुसल्याने अनेक नागरिक पाण्यामध्ये अडकले होते मात्र स्वतः मंत्री गिरीश महाजन यांनी बीडमध्ये येऊन नांदूर हवेली येथे पूरग्रस्त भागाची पाहणी केली आहे त्याचबरोबर तात्काळ मदत मिळण्यासाठी आश्वासित देखील केलेली आहे त्याचबरोबर पूर्वग्रस्त भागात गुतलेल्या नागरिकांसाठी त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत की तात्काळ मदत पोहोचवा.
छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील शिऊर, बोरसर, भायगाव, जानेफळ, नांदगाव अनेक गावात पहाटे एक तास मुसळधार पाऊस झाल्याने अनेक नदी नाल्याला पूर आला आहे. वैजापूर शहरात अनेक घरात पाणी शिरले. गेली दोन आठवड्यापासून छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात पाऊस सुरूच आहे. या पावसामुळे शेती पिकाचे नुकसान झाले तर वस्त्यांमध्ये पाणी शिरत असल्यामुळे जगायचं कसं असा प्रश्न निर्माण झालाय.
नरिमन पॉईंट येथील भाजप कार्यालयात रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार पक्षप्रवेश
वैभव खेडकर जोरदार शक्तीप्रदर्शन करत खेडमधून मुंबईकडे रवाना
रत्नागिरी शहरातून देखील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने रवाना
नितेश राणे आणि नारायण राणे देखील हजर राहण्याची शक्यता
मनसेचे माजी जिल्हाध्यक्ष, रत्नागिरी शहरातील काही प्रमुख पदाधिकारी, वाहतूक सेनेचे पदाधिकारी यांचा आज भाजपमध्ये पक्षप्रवेश
पिंपरी चिंचवड शहरातील कुख्यात रावण टोळीतील आणखी तीन सदस्यांना गुंडां विरोधी पोलिस पथकाने बेड्या ठोकल्या आहेत तसेच रावण टोळीतील दोन अल्पवयीन बालकांना ताब्यात घेऊन त्याच्याकडून चार पिस्टल, तीन जिवंत काडतुसे असा जवळपास आठ लाख तीन हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. अनिकेत अशोक बाराथे वय 27 वर्ष, अश्विन सुधीर गायकवाड वय 21 वर्ष आणि यशपाल सिंग अरविंद सिंग देवडा वय 19 वर्ष असं पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या रावण टोळीतील सदस्यांची नाव आहेत. पोलिसांनी बेड्या ठोकलेले आरोपी आपला इतर काही सहकार्यांसोबत चिखली पोलीस स्टेशन हद्दीतील पाटील नगर येथील एका सराफा व्यापाराच्या दुकानात दरोडा टाकण्या साठी जाणार होते असे पोलीस तपासात उघडकीस आल आहे.
मुसळधार सुरू असल्या पावसामुळे अंत्यविधी कुठे करावं असा प्रश्न निर्माण झालाय. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोनोवाडीमध्ये चांगोबाई भागचंद राठोड या वयोवृद्ध महिलेचे निधन झाल्यानंतर अंत्यविधीसाठी त्यांचा मृतदेह घेऊन जाण्यासाठी गावकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागला. मुसळधार पावसामुळे परिसरात पूरस्थिती निर्माण झाल्याने रस्त्यांचा संपर्क तुटला होता. त्यामुळे मृतदेह ट्रॅक्टरवर ठेवून नेण्याची वेळ आली. इतकेच नव्हे तर स्मशानभूमीकडे जाण्यासाठी योग्य रस्ता नसल्याने गावकऱ्यांनी अक्षरशः पुराच्या पाण्यात मृतदेह ठेवावा लागला. मृत्यूनंतरही होणारी अशी हीलहवालद परिस्थिती पाहून ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होत आहे. प्रशासनाने याप्रकरणी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.
मुसळधार सुरू असल्या पावसामुळे अंत्यविधी कुठे करावं असा प्रश्न निर्माण झालाय. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोनोवाडीमध्ये चांगोबाई भागचंद राठोड या वयोवृद्ध महिलेचे निधन झाल्यानंतर अंत्यविधीसाठी त्यांचा मृतदेह घेऊन जाण्यासाठी गावकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागला. मुसळधार पावसामुळे परिसरात पूरस्थिती निर्माण झाल्याने रस्त्यांचा संपर्क तुटला होता. त्यामुळे मृतदेह ट्रॅक्टरवर ठेवून नेण्याची वेळ आली. इतकेच नव्हे तर स्मशानभूमीकडे जाण्यासाठी योग्य रस्ता नसल्याने गावकऱ्यांनी अक्षरशः पुराच्या पाण्यात मृतदेह ठेवावा लागला. मृत्यूनंतरही होणारी अशी हीलहवालद परिस्थिती पाहून ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होत आहे. प्रशासनाने याप्रकरणी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.
महाराष्ट्रातील अनेक भागांत सलग पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. जिल्हा प्रशासनाच्या विनंतीवरून राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद बल (NDRF) ची पथके बीड, धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये तैनात करण्यात आली. एनडीआरएफच्या जवानांनी रात्रभर अथक परिश्रम करून बचावकार्य हाती घेतले.
बीड जिल्ह्यातील मजलगाव तालुक्यातील संडास चिंचोले येथे एनडीआरएफच्या पथकाने रात्रभर चालवलेल्या मोहिमेत आज सकाळी एका नवजात बालकासह एका महिलेचा सुरक्षित बचाव करण्यात आला. आतापर्यंत बीड जिल्ह्यातील विविध भागांतून 26 नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे.
धाराशिव जिल्हा मध्ये सुद्धा कपिलापुरी गावात पाण्याने वेढलेल्या 9 नागरिकांना एनडीआरएफने रात्रभर सुरू असलेल्या प्रयत्नांतून सुरक्षित बाहेर काढले. सोलापूर जिल्ह्यात एनडीआरएफ पथकाने पूर्ण रात्र अविरत काम करत 59 नागरिकांचा जीव वाचवला.
सोलापूर जिल्ह्यातील माढा आणि करमाळा तालुक्यातील सीना नदीत सध्या 2 लाख 12 हजार 651 क्युसेक इतक्या विसर्गाने पाणी प्रवाहित होत आहे. इतिहासात प्रथमच सीना नदीला पूर आलेला दिसून येत आहे. माढा तालुक्यातील 16 गावात तर करमाळा तालुक्यातील 10 गावात सीना नदीचे पात्र सोडून पाणी शिरले गेले आहे. त्यामुळे साधारण 1800 नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे.
आंबी गावातून भूम कडे जाणारा संपर्क तुटला,
अंबी, जयवंत नगर येथील दुधना नदीच्या पुलावरून प्रचंड वेगाने पाणी
शंभर वर्षात असा पाऊस पाहिला नाही गावातील लोकांच्या भावना
रात्रभर मुसळधार पाऊस भीतीदायक स्थिती असल्याचही नागरिकांनी सांगितलं
शंभर वर्षांपूर्वीचा पूल वाहून गेल्याची नागरिकांची माहिती
कडबा गंजी, जनावरे, संसार वाहून गेल्याची गावकऱ्याची माहिती
रस्त्यावर माती दगडांचा खच, रस्ते वाहतूक बंद
रात्रीपासून लाईट नाही, इंटरनेट व्यवस्था ही विस्कळीत
बार्शी तालुक्यातील ढाळे पिंपळगाव आणि हिंगणी मध्यम प्रकल्प परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यामुळे भोगावती आणि नीलकंठा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.त्यामुळे ढाळे पिंपळगाव,पिंपरी साकत,हिंगणी,झाडी,बोरगाव परिसराचा संपर्क तुटला आहे.काढणीला आलेले सोयाबीन गुडगाभर पाण्यामध्ये गेल्याने मातीमोल झालं आहे.यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संपर्क संकटात संपला आहे.सततच्या पडणाऱ्या पावसाचा द्राक्ष उडीद,मूग,कांदा पिकाला देखील मोठा फटका बसल्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.
जालन्यातील परतुर तालुक्यातील गोळेगाव गावात गोदावरी नदीच्या पुराचे पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झालं. काल मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास अचानक गोदावरी नदीच्या पुराचे पाणी गावात शिरल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. मध्यरात्री गावामध्ये अचानक पाणी शिरल्याने मध्यरात्रीपासून ग्रामस्थांना गावाबाहेर मुक्काम करावा लागला. दरम्यान गोदावरी नदीपात्रामध्ये पाणी पातळीत वाढ होत असल्याने परतुर तहसीलदारांनी खबरदारी म्हणून ग्रामस्थांना दुसऱ्या गावात हलवल्याची माहिती आहे..
आगळगावात रात्री झालेल्या मुसळधार पावसाने चांदणी नदीला महापूर ९ तासापासून उत्तर बार्शी तालुक्याचा संपर्क तुटला असून आगळगावातील नदी काठच्या घरात पाणी शिरल्याने ग्रामस्थांना रात्र जागून काढावी लागली.गेल्या दिवसापासून सुरू असलेल्या पावसाने उडीद, कांदा, सोयाबिन पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. चांदणी नदीमुळे मांडेगाव, खडकलगाव, धसपिंपळगाव, देवगाव, कांदलगाव या मार्गावरील सर्व गावाचा बार्शी तालुक्याचा संपर्क तुटला आहे
धाराशिवच्या भूम, परांडा, कळंब परिसरात मुसळधार पाऊस
भूम मधील अंबी गावच्या चहू बाजूने पाणी, तालुक्याशी संपर्क तुटला
रात्रीपासून वीज नाही, इंटरनेट विस्कळीत
गिरीश महाजन आज जिल्हा दौऱ्यावर
पावसामुळे शाळेला सुट्टी
सोलापुरातील सीना नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ
- सीना नदीमध्ये 2 लाख क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू
- सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गांवरील लांबोटी जवळील पूल पाण्याखाली जाण्याची परिस्थिती निर्माण झालीय
- सीना -कोळेगाव, खासापुरी आणि चांदनी प्रकल्पातून सीना नदीमध्ये सुमारे 2 लाख क्यूसेक पाणी सोडले
- सीना नदी पात्रातील माढा, मोहोळ आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील गावात पाणी शिरले.
- सीना नदीच्या प्रवण क्षेत्रामध्ये रात्रभर मुसळधार पाऊस झाल्याने सीना नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ
- धाराशिव, बार्शी भागात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने पाण्याच्या पातळीत वाढ
सीना नदीवरील बापले, अनगर, मालिकपेठ, आष्टे हे सर्व बंधारे पाण्याखाली
- मोहोळ तालुक्यातील भोयरे गावात कोल्हापूर पद्धतीचा बंधारा पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद
सोलापूर जिल्ह्यातील आगळगाव परिसरात रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे चांदणी नदीकाठी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली.त्यामुळे काटेगाव ते चारे रस्त्यावरील पूल वाहून गेला आहे.या घटनेमुळे मसोबाचीवाडी,बांगरवाडी,चारे, पाथरी या सह पूर्व भागातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.
दररोज शेकडो शेतकरी या पुलावरून आपल्या शेतात ये-जा करीत होते. पूल वाहून गेल्याने शेतकऱ्यांना शेतातील कामकाजासाठी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. तसेच शाळकरी मुले, रुग्ण आणि नागरिकांच्या दैनंदिन हालचाली ठप्प झाल्या आहेत. स्थानिक ग्रामस्थांनी प्रशासनाला तातडीने पर्यायी व्यवस्था करून देण्याची मागणी केली आहे.
धाराशीवचे खासदार ओमराजे निंबाळकर स्वतः उतरले पुराच्या पाण्यात
पुराच्या पाण्यात अडकलेल्या आजी आणि नाताला वाचवण्यासाठी लावली बाजी
अन्न पाण्याविना मदतीच्या प्रतीक्षात असलेल्या लोकांना वाचवण्यासाठी खासदार पुराच्या पाण्यात शिरले
एनडीआरएफ टीमच्या मदतीने वाचवला जीव
ओमराजे निंबाळकर यांनी फेसबुक पोस्ट करत दिली याबाबतची माहिती
बीड जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून होत असलेल्या अतिवृष्टी मुळे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी जिल्ह्यातील जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी, सरकारी व खाजगी प्राथमिक व माध्यमिक शाळा, जिल्हा परिषद शाळा, नगरपालिका शाळा, अनुदानित व विना अनुदानिक शाळा, सर्व आश्रमशाळा, सर्व महाविद्यालय तसेच आयुक्त व्यवसाय व प्रशिक्षण केंद्र यांच्या आस्थापनेवरील शैक्षणिक संस्थांना दि. 23.09.2025 रोजी सुट्टी जाहीर केली आहे.
बीड तालुक्यातील नांदूर हवेली गावाला सिंदफणा नदीला आलेल्या पुराच्या पाण्याचा वेढा पडला आहे. यामध्ये गावातील तब्बल 23 लोक एका घरावर अडकून पडले आहेत. यासाठी सध्या मदत कार्य सुरू करण्यात आले आहे. गावाच्या परिसरामध्ये आमदार संदिप क्षीरसागरांसह प्रशासकीय यंत्रणा दाखल झाली आहे.
प्रोटेक्शन मनीच्या नावाखाली खंडणी! आंदेकर टोळीवर आणखी एक गुन्हा दाखल
पुणे पोलिसांनी आवळला आंदेकर टोळीचा फास
मासेविक्रेत्यांकडून २० कोटी रूपयांची खंडणी उकळल्याप्रकरणी आंदेकर टोळीविरुद्ध गुन्हा
पुण्यातील गणेश पेठ मच्छी मार्केटमधील मासे विक्रेत्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण करून तब्बल १२ वर्षे प्रोटेक्शन मनीच्या नावाखाली उकळली खंडणी
सूर्यकांत ऊर्फ बंडू आंदेकर टोळीवर फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
गुन्हा दाखल झालेल्यांपैकी आंदेकर कुटुंबातील एका महिलेचाही समावेश
फरासखाना पोलिस ठाण्यात दाखल तक्रारीनुसार, आंदेकर टोळीने मागील १२ वर्षांपासून मासे विक्रेत्यांना जीवे मारण्याची धमकी देत दरमहा मोठ्या प्रमाणात खंडणी उकळली. या काळात व्यापाऱ्यांकडून तब्बल २० कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम उकळण्यात आल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे
जालना जिल्ह्यात अनेक भागात मुसळधार पाऊस पडलाय.जालन्यातील नसडगाव परिसरात देखील मुसळधार पाऊस झाल्याने शेताला तलावाचं स्वरूप आलंय. जोरदार पाऊस झाल्याने नसडगाव येथील शेतकऱ्यांच्या खरिपातील सोयाबीन, कपाशी पिकाच अतोनात नुकसान झालंय. शासनाने तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत घ्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
यवतमाळच्या एका गावातील खाजगी शिकविणे शिकत असताना आरोपी खाजगी शिक्षकाने विद्यार्थिनीची मैत्री करीत तिचा विश्वास संपादन केला त्यानंतर वारंवार एकांतात तिला शिकविण्याच्या बहाण्याने बोलावून तिच्यावर शारीरिक अत्याचार केला पिढीचा गर्भवती राहिल्याने तिला नांदेड येथे उपचारासाठी नेण्यात आले विद्यार्थीनीही 16 वर्षाची होती. गर्भपाताच्या गोळ्या अति झाल्याने तिची प्रकृती खालावली पिडितेचा नांदेड येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला या घटनेनंतर पोलिसांनी नराधम शिक्षकाला अटक केली आहे.
जालना जिल्ह्यात पावसाचा हाहाकार पाहायला मिळतोय. काल दिवसभरात प्रशासनाने 35 नागरिकांची पुराच्या पाण्यातून सुटका केली.जालन्यातील विरेगाव येथील 14 तर हिवर्डी येथील 21 जणांना बचाव पथकाने सुखरूप बाहेर काढलं.जालना तालुक्यातील वाहणाऱ्या कल्याणी, गिरीजा नदीला पूर आल्यानं हे नागरिक पुराच्या पाण्यात अडकले होते.दरम्यान काल घटनास्थळी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, शिवसेना आमदार अर्जुन खोतकर, हे उपस्थित होते.
लातूर जिल्ह्यातल्या अनेक भागात रात्रीपासून संततधार पाऊस कोसळतो आहे. मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील नदी- नाले आणि ओढ्यांना पूर परिस्थिती निर्माण झाली . तर ग्रामीण भागातील अनेक रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद आहे, अनेक गावांचा संपर्क कालपासून तुटलाय, निलंगा ते कासार- शिरशी, भेटा, उस्तुरी, निलंगा देवणी यासह इतर मार्ग देखील पाण्याखाली आहेत. तर येत्या काळात हवामान विभागाने लातूर जिल्ह्याला मुसळधार पावसाचा इशारा दिलाय. मांजरा, तेरणा, तावरजा, रेणा आणि मन्याड या सर्व नदींना पूर परिस्थिती निर्माण झाली आहे.
नाशिकच्या नांदगाव तालूक्यात असलेल्या सर्वात मोठे गिरणा धरण काही दिवसांपुर्वी १०० टक्के भरले मात्र जिल्ह्यात होत असलेल्या पावसाने व धरणक्षेत्रात होत असलेल्या पावसाने धरणाचे दरवाजे पुन्हा एकदा उघण्यात आले असून धरणाच्या चार दरवाजातून हे प्रत्येकी ६०सेमी तर दोन दरवाजे ३० सेमी ने उघडण्यात येऊन त्यातून १२.३८० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग गिरणा नदी पात्रात सुरु झाल्याने नदीकाठच्या नागरीकांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे.
- विदर्भ राज्य आंदोलन समितीने २८ सप्टेंबर रोजी नागपूर कराराची प्रतीकात्मक होळी करण्याचा इशारा
- गेल्या १३ वर्षांपासून विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या नागपूर करार हा विदर्भाच्या विकासासाठी फसवणूक ठरला असल्याचा आरोप करत
- सिंचन निधी, नोकऱ्या, मंत्रिपदे आणि तांत्रिक शिक्षणातील हक्काचा वाटा मिळाला नसल्याने प्रदेश विकासापासून वंचित राहिला आहे.....
- हजारो शेतकऱ्यांच्या आत्महत्या, कुपोषण आणि बालमृत्यूचे प्रश्न आजही गंभीर आहेत....
- यावर्षी ५ ऑक्टोबर रोजी कारंजा लाड येथे विदर्भ राज्य निर्माण जनठराव सभा होणार असून, ग्रामीण स्तरावर आंदोलन नेण्याचा संकल्प करण्यात आला आ
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड उपविभागीय कार्यालयासमोर महादेव कोळी, मल्हार कोळी समाजाचे 7 दिवसापासून अमारण उपोषण सुरू आहे. संपूर्ण एक कुटुंबासोबत बसलेले आहे. प्रशासनाकडून अद्याप कोणीही भेटायला नसल्यानं संताप व्यक्त केला जातोय. एसटी प्रवर्गातून आरक्षण द्यावं अशी मागणी बंजारा समाजाच्या वतीने करण्यात येत आहे. बंजारा समाजाने मागणी केल्यानंतर एसटी प्रवर्गात असलेल्या महादेव कोळी यांचं आरक्षण धोक्यात येईल म्हणून हे उपोषण सुरू करण्यात आले आहे.
सोलापूर जिल्ह्यातील आगळगाव परिसरात रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे चांदणी नदीकाठी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली.त्यामुळे काटेगाव ते चारे रस्त्यावरील पूल वाहून गेला आहे.या घटनेमुळे मसोबाचीवाडी,बांगरवाडी,चारे, पाथरी या सह पूर्व भागातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. दररोज शेकडो शेतकरी या पुलावरून आपल्या शेतात ये-जा करीत होते. पूल वाहून गेल्याने शेतकऱ्यांना शेतातील कामकाजासाठी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. तसेच शाळकरी मुले, रुग्ण आणि नागरिकांच्या दैनंदिन हालचाली ठप्प झाल्या आहेत. स्थानिक ग्रामस्थांनी प्रशासनाला तातडीने पर्यायी व्यवस्था करून देण्याची मागणी केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.