परभणी शहरासह जिल्ह्यात दोन दिवसाच्या विश्रांतीनंतर विजाच्या कडकडासह पावसाने जोरदार हजेरी लावली आहे मागील 1 तासांपासून पाऊस पडत असून मुसळधार पाऊसमुळे शहरात मोठ्या प्रमाणावर पाणी चालायला लागले आहे शहरातील वसमत रोड, गांधी पार्क , बेलेश्वर नगर आदी भागात रस्त्यावर पाणीच पाणी साचले आहे.
लाखो भक्त 9 दिवसात या मंदिरात दर्शनासाठी येतात. मंदिर प्रशासन आणि पोलिसांकडून करण्यात आली जोरदार तयारी. कोराडी देवी मंदिर प्रसिद्ध असून या ठिकाणी विदर्भ मध्यप्रदेशसह छत्तीसगड राज्यातून भाविक येतात.
शिवसेनेचे सुनिल पाटील, रायगड भाजप महिला अध्यक्षा अश्विनी पाटील, भाजप शहर अध्यक्ष राहुल जाधव यांचा राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये जाहीर प्रवेश
राष्ट्रवादी काँग्रेस चे नेते प्रफुल पटेल खासदार सुनिल तटकरे माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रमुख उपस्थिती केला प्रवेश
जालन्यात वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या ताफ्यासमोर मराठा आंदोलकांच्या घोषणाबाजी, काळे झेंडे दाखवत ताफा अडवण्याचा प्रयत्न केला
जालन्यात वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर दुसऱ्यांदा हल्ल्याचा प्रयत्न, ताफ्याला काळे झेंडे दाखवले.
जालन्यातील मंठा शहरात सदावर्तेंच्या ताफ्या समोर मराठा आंदोलकांनी दिल्या एक मराठा लाख मराठा घोषणा
गुणरत्न सदावर्ते जालन्यावरून जिंतूरकडे जात असताना घडला प्रकार.
नवरात्र उत्सवाला अवघे काही तास उरले असताना मूर्तिकारांनी विविध प्रकारच्या देवीच्या मुर्त्या तयार करून बाजारामध्ये विक्रीसाठी आणल्या आहेत, त्याचबरोबर नागरिकांची देखील देवीच्या मूर्ती खरेदी करण्यासाठी लगबग बघावयास मिळत आहे, यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत जवळपास दहा ते पंधरा टक्क्यांनी भाव वाढ झाली आहे,
कल्याण वरून शिलफाटा दिशेने जाणाऱ्या व येणाऱ्या दोन्ही मार्गावर वाहनाच्या लांबच लांब रांगा,
गेल्या अर्थात तासापासून वाहतूक कोंडीत अडकलेल्या वाहनचालकाला बाहेर पडण्यासाठी करावी लागत आहे कसरत.
वाहतूक पोलिस-स्थानिक नागरिकांकडून बस बाजूला करण्याचे प्रयत्न सुरू.
अंतर्गत रस्त्यांवरही कोंडीचा फटका – अर्धा किमीपर्यंत रांगा
पंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्याच वेळात देशाला संबोधित करणार आहेत. सायंकाळी ५ वाजता पंतप्रधान देशवासियांना संबोधित करणारआहेत. देशात सुरू असलेल्या विविध विषयांवर मोदी चर्चा करणार असल्याची शक्यता आहे. संबोधित करताना मोदी कोणती मोठी घोषणार करणार? याकडे सर्वोंचेच लक्ष आहे.
कल्याण मध्ये पावसाला दमदार सुरवात झाली असून आज दुपारी पावसाने जोर धरला आहे. काही दिवस पावसाची संततधार सुरु होती. मात्र आज पावसाने चांगलेच झोडपले. रविवार असल्याने याचा फारसा परिणाम जनजीवनावर झाला नसला तरी उद्या असणाऱ्या घटस्थापनेची खरेदी करण्यासाठी बाहेर पडलेल्या नागरिकांची मात्र चांगलीच तारांबळ उडाली.
गेल्या सात दिवसांपासून पीएचडीचे विद्यार्थी गुडलक चौकात ठिय्या आंदोलन करत आहेत. सारथी, बार्टी आणि महाज्योती संस्थांच्या विद्यार्थ्यांना फेलोशिप संदर्भात सरकारकडून अद्याप जाहिरात काढण्यात आलेली नाही. त्यामुळे संतापलेल्या विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन सुरू केलं आहे.
या आंदोलनस्थळी आज आमदार रोहित पवार भेट देण्यासाठी आले. त्यांनी विद्यार्थ्यांची परिस्थिती जाणून घेतली आणि त्यांची मागणी योग्य असल्याचे सांगत सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी केली.
वाशिमच्या मानोरा तालुक्यातील गिरोली येथील 13 वर्षीय अश्विन आमटे हा मुलगा काल सकाळच्या सुमारास पोहण्यासाठी गेला असता गोखी नाल्यातील पुराच्या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला होता.पहिल्या दिवशी पाण्यात अश्विनची गावकऱ्यांकडून शोध मोहीम सुरू केली होती. अश्विनचा ठावठिकाणा लागत नव्हता. आपत्कालीन शोध बचाव पथकाला पाचारण केल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्या मुलाला मृतदेह शोधून काढण्यास बचाव पथकाला यश आले.
लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातल्या काटेजवळगा परिसरात तुफान पाऊस झालाय, वादळीवारा आणि मेघगर्जनेसह पाऊस झालाय, ओढ्याला आलेल्या पाण्यात 2 जण वाहून गेले, तर एकाचा मृत्यू झालाय ,
बीडच्या पाटोद्यामध्ये राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या जयंतीनिमित्त शिवपुराण कथेचा आयोजन केले होते आणि या कार्यक्रमाच्या समारोपानिमित्त पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे ह्या उपस्थित राहिल्या असून त्यांचं जंगी स्वागत करण्यात आला आहे त्यांच्यावरती जेसीबी मधून फुलांची उधळून करत फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली आहे. मोठा स्वागत पंकजा मुंडे यांचे करण्यात आला असून त्यांच्यावरती जेसीबी मधून फुलांची उधळण करण्यात आली आहे.
पुण्याच्या म्हाडा वसाहतीत गुंडांचा राडा.. हातामध्ये पिस्तूल घेऊन केला नाच..
इरफान शेख असे हातात पिस्टल घेऊन नाचणाऱ्या गुंडाचे नाव..
मी इथला भाई आहे सगळ्यांनी चड्डीत राहायचं कुणी गोंधळ करायचा नाही अशा आरोळी ठोकत इरफान शेख नाचला..
पिस्टल घेऊन नाचणाऱ्या इरफान शेख ला पोलिसांनी पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे सह घेतल ताब्यात..
दहशत माजवल्या प्रकरणी आरोपी इरफान शेख याच्या विरोधात वारजे माळवाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे..
काँग्रेसजवळ बहुमत नसल्यामुळे किंवा आता लोकमत नसल्यामुळे त्यांना टोला लावल्याशिवाय आता दुसरा काहीही पर्याय उरलेला नाही. त्याच्यामुळे ते टोले लावून स्वतःचा टाईमपास करीत असतात.... असा टोला गृहराज्यमंत्री तथा भंडाऱ्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना लगावला. हर्षवर्धन सपकाळ यांनी फडणवीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पंतप्रधानपदाचे डोहाळे लागल्याची टीका केली होती. यावर पंकज भोयर यांनी प्रत्युत्तर दिले.
पुण्यातील वानवडी परिसरात गांजाची विक्री
गांजा विक्री करणाऱ्या रेकॉर्ड वरील दोन अट्टल गुन्हेगारांना अटक
राम टेकडी इंडस्ट्रियल एरिया मध्ये आरोपी करत होते गांजाची तस्करी
अविनाश श्रीरंग भोंडवे आणि संजय काथे असे अटक केलेल्या आरोपींची नावे
अटक केलेल्या आरोपींकडून ५० हजार किमतीचा गांजा करण्यात आला जप्त
वानवडी पोलिसांची धडक करवाई
नवरात्रौत्सव काळात कल्याणकारांना वाहतूक कोंडीपासून मिळणार दिलासा
कल्याण शहरामध्ये जड -अवजड वाहनांच्या वाहतुकीला बंदी
वाहतूक कोंडी टाळण्यासाठी 22 सप्टेंबरपासून पुढील दहा दिवस निर्णय लागू
वकील गुणरत्न सदावर्ते धनगर आंदोलक दिपक बोऱ्हाडे यांच्या भेटीसाठी जालन्यात दाखल...
धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळवण्याच्या मागणीसाठी जालन्यात दिपक बोऱ्हाडे यांच सुरू आहे आमरण उपोषण...
धनगर आंदोलक दिपक बोऱ्हाडे यांच्या आमरण उपोषणाचा आजचा पाचवा दिवस....
वकील गुणरत्न सदावर्ते धनगर आंदोलक दिपक बोऱ्हाडे यांच्या भेटीसाठी दाखल झाले असून दोघांमध्ये चर्चा सुरू आहे...
भुजबळ यांच्या बीड मेळावा बॅनर वर लक्ष्मण हाकेना वगळले?
लक्ष्मण हाकेंची नेत्यांनी धास्ती घेतलीय का?
बीड जिल्ह्यात उलट सुलट चर्चाना उधाण
लक्ष्मण हाके उपस्थित राहणार का?
ओबीसी आंदोलनात फूट पडलीय का?
ओबीसी समाजाच्या न्याय हक्कासाठी छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत महा एल्गार सभा 28 तारखेला होत आहे
पोस्टरवर सर्व नेत्यांचे फोटो, लक्ष्मण हाकेच फोटो पोस्टरवर नाही
सांगोला तालुक्यात दोन दिवसांपूर्वी अतिवृष्टी झाली होती. यामध्ये शेतकऱ्यांच्या घरांमध्ये पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे.
कडलास येथे भटक्या विमुक्त जमातीच्या लोकवस्तीमध्ये पाणी शिरल्याने गोरगरीब लोकांचे संसार उघड्यावर आले आहेत.
अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना व गरीब कुटुंबाना सांगोल्याचे शिवसेनेचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांच्या वतीने पंधरा दिवस पुरेल इतके अन्नधान्य,भाजीपाल्यासह जीवनावश्यक वस्तूंचे मोफत वाटप करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
जालन्यात वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ल्याचा प्रयत्न...
वकील गुणरत्न सदावर्ते आज धनगर आंदोलक दिपक बोऱ्हाडे यांच्या भेटीसाठी जालना दौऱ्यावर आहेत...
पुण्याच्या ग्रामीण भागात बैलाबाबत कृतज्ञता व्यक्त करत शेतकरी बैलांना सकाळी अंगोळ घालुन गोडधोड नैवद्य देऊन वाजतगाजत मिरवणुक काढतो आता या बैलपोळा मिरवणुकीत भंडाराची उधळण करत डिजेच्या तालावर नृत्यांगना थिरकल्यात यावेळी गावक-यांनीही चांगलाच जल्लोष केल्याचे पहायला मिळाले
मनोज जरांगेंच्या बैठकीत अचानक मधमाश्यांचा हल्ला
बैठकीत आलेल्या अनेकांना मधमाश्यांचा चावा
मनोज जरांगेंना तात्काळ समन्वयकांनी बाहेर काढले
बैठकीच्या ठिकाणी गोधळाचे वातावरण
मराठवाड्यातील निवडक समन्वयकांची बैठक त्यांनी बोलावली होती, आज त्यांच्याशी चर्चा करणार होते
सोलापुरात अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यासमोर आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक
राज्यभरात गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात सुरु असलेल्या आंदोलनाला प्रतिउत्तर म्हणून पडळकर यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक
‘’शरद पवारांनी ज्यावेळी हातवारे करून देवेंद्र फडणवीस यांच्यावर खालच्या भाषेत टीका केली त्यावेळी संस्कृतपणा कुठे होता?‘’
‘’पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आईचा AI विडिओ बनवून टीका केली ते कुठल्या संस्कृतीला शोभाणारे होते‘’
भाजप आमदार गोपीचंद पडळकर समर्थक कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी शरद पवार गटाला सवाल
कोल्हापूरच्या नांदणीत लहान मुले पळवण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. गावातील स्वरा शितल देसाई वय आठ वर्षे आपल्या लहान भावासह संध्याकाळी दूध आणायला निघाली होती. त्याचवेळी मागून येणाऱ्या पाच अनोळखी व्यक्तींनी तिचे व भावाचे तोंड दाबून उचलून घेऊन जाण्याचा प्रयत्न करु लागले. यावेळी स्वराने धरलेल्या हाताचा जोरात चावा घेऊन आरडाओरडा सुरू केला. त्यावेळी संबंधित या दोघांनाही सोडून अंधारातून पळ काढला. आवाज ऐकून लोक जमा झाले. तिने घडलेली घटना सांगितली. नंतर लोक संबंधित व्यक्तींचा शोध घेऊ लागले पण अंधाराचा फायदा घेऊन पळाले होते. संबंधित गुन्ह्याची नोंद शिरोळ पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली असून पोलीस सीसीटीव्हीच्या आधारे संबंधित व्यक्तीचा शोध घेत आहेत.
राज्यात सध्या शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरू आहे अनेक गावात नेहमी अध्यापनाचे धडे देणाऱ्या शिक्षकांची बदली होत असल्याने विद्यार्थी रडताना दिसत आहेत हिंगोलीत एका शिक्षिकेची बदली झाल्याने संपूर्ण गाव रडल आहे, हिंगोलीच्या औंढा तालुक्यातील आसोंदा गावात प्राथमिक शाळेत शिक्षणाचे धडे देणाऱ्या कल्पना वानरे यांची हिंगोली तालुक्यातील पेडगाव जिल्हा परिषद शाळेत बदली झाली सात वर्षापासून मायेचा ओलावा देत शिक्षणाचे धडे देणाऱ्या विद्यार्थ्यांना व पालकांना कल्पना मॅडम यांची बदली झाल्याची बातमी समजताच त्यांनी अक्षरशा टाहो फोडला, चिमुकले महिला आणि गावातील वयोवृद्ध माणसेही धाय मोकळून रडू लागले आपल्या कुटुंबातील कुणीतरी परदेशी कायमचे निघून जावे एवढं दुःख या गावातील चिमुकल्या विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना झाले होते.
धाराशिवच्या उमरगा तालुक्यातील बेनितुरा नदीला आलेल्या पाण्यामुळे लातूर कलबुर्गी रस्त्यावर पाणी आल्याने महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवरील कसगी गावाजवळ पूल पाण्याखाली गेला.कलबुर्गी आणि धाराशिव जिल्ह्याला जोडणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे.दरम्यान या परिस्थितीची ठाकरे गटाचे आमदार प्रविण स्वामी यांनी अधिकाऱ्यांसह पाहणी केली.तसेच पोलिसांनी देखील पुल परीसरात बंदोबस्त ठेवला आहे तर नुकसानीचे तातडीने पंचनामे करावे व ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी प्रविण स्वामी यांनी केली आहे.
शिवसेनेचे पदाधिकारी वसीम देशमुख यांच्यासह चार ते पाच जणांवर बासंबा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल
वाशिम वरून नांदेडला पूर पाहणी करण्यासाठी कृषी मंत्री दत्ता भरणे जात असताना हिंगोलीतील पूर परिस्थितीची पाहणी का केली नाही म्हणून संतप्त झाले होते शिवसैनिक
अकोला हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर दाखवले होते काळे झेंडे
कर्जत तालुक्यातील कर्जत शहरासह रस्त्यांची दयनीय अवस्था झाल्याने व रस्त्यात मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने प्रशासनाचा निषेध करत मनसे जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील यांचे नेतृत्वात भीक मागून आंदोलन करण्यात आले आहे. मनसेने भिक मागून आंदोलन करीत प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. तात्काळ संबंधित प्रशासनाने दखल न घेतल्यास तीव्र आंदोलनाचे इशारा मनसेच्या वतीने देण्यात आला आहे.
जालन्यात पावसाचा कहर पाहायला मिळतोय. जालन्यातील भाटेपूरी शिवारात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने कपाशी, सोयाबीनसह फळबागा धोक्यात आल्या आहेत. भाटेपूरी येथील शेतकरी राम आटोळे या शेतकऱ्याचं सहा एकर कपाशी पीक पावसामुळे जमीनदोस्त झालंय. यामुळे या शेतकऱ्याला लाखो रुपयांचा आर्थिक फटका बसला. शासनाने दिवाळीपूर्वी आर्थिक मदत करावी अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे.
घरात घुसून एका अल्पवयीन मुलीची हत्या करण्यात आली आहे. ही हत्या नात्यातल्याच एका व्यक्तीने केल्याची माहिती आहे. तळोजा फेस-2 मध्ये ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. 44 वर्षीय मोहम्मद आयुब साहिल याने आपल्याच नात्यातील एका 17 वर्षीय मुलीला भर दुपारी घरात घुसून तिच्यावर चाकूने सपासप वार करून तिचा खून केल्याचं समोर आलं आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.
बीड जिल्ह्यातील बहुतांश नगरपालिकांच्या हद्दीमध्ये कचऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.. मी आज सकाळी येत असताना विविध ठिकाणी ही समस्या निदर्शनास आली गेल्या अनेक दिवसात निवडणुका झालेल्या नाहीत.. त्यामुळे या प्रश्नाकडे दुर्लक्ष होत असून आता प्रशासकांची एक आढावा बैठक घेणार असल्याचे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.. याबरोबरच बीड जिल्ह्यातील नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी प्रयत्न करणार असल्याचे देखील पंकजा मुंडे यांनी म्हटले.
नाशिकच्या मालेगाव तालूक्यातील चाळीसगाव रोडवरील गिगाव फाटा परिसरात मालेगाव तालूका पोलिसांनी छापा टाकत अवैध गांजाची तस्करी करणा-या व्यक्तीला ताब्यात घेत त्याच्या कडून तीन लाख नऊ हजार रुपये किमतीचा १५ किलो ३६१ ग्रॅम गांजा जप्त केलाय.पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचत पोलिसांनी शिंदखेडा येथिल शरद हिरालाल शिंदे याला ताब्यात घेत त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
खामगाव शहरात अनेक ठिकाणी ड्रेनेज लाईनचे काम सुरू आहे व त्यासाठी रस्त्याच्या बाजूने सात ते आठ फूट खोल नाली खोदली आहे. मात्र संबंधित कंत्राटदाराने काम करत असताना कुठल्याही सुरक्षा नियमांचे पालन न केल्यामुळे दररोज अपघात घडत असून यात वृद्ध व लहान मुलं जखमी होताना दिसत आहे. रात्री खामगाव शहरातील बोबडे कॉलनी परिसरात शहरातील डॉ. ब्रह्मानंद टाले हे त्यांच्या कार ने जात असताना ड्रेनेजसाठी खोदून ठेवलेल्या नालीत त्यांची कार पलटी होऊन अपघात झाला. यात डॉ.ब्रह्मानंद टाले हे गंभीर जखमी झालेत. वारंवार शहरात ड्रेनेज लाईन साठी खोदून ठेवलेल्या नालीत वृद्ध लहान मुलं पडून अपघात होण्याचे प्रमाण वाढलं आहे. मात्र संबंधित कंत्राटदार कुठल्याही सुरक्षा नियमांचे पालन करत नाहीत त्यामुळे या कंत्राटदारावर कारवाईची मागणी खामगाव शहरातील नागरिक करत आहेत.
अजित पवार सलग दुसऱ्या दिवशी ही पिंपरी चिंचवड शहर दौऱ्यावर आहेत. आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने अजित पवार यांनी आज देखील भल्या पहाटे आपला पिंपरी चिंचवड शहर दौरा सुरू केला आहे. यावेळी अजित पवार यांनी महा मेट्रच्या कार्यालयात महा मेट्रोच्या पुढील कामकाजा विषयी आढावा बैठक देखिल घेतली आहे. त्यानंतर अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवार मिलन या उपक्रमा अंतर्गत शहरातील माजी पदाधिकाऱ्यांचा घरी जाऊन सदिच्छा भेट घेणार आहेत.
नाशिकच्या मालेगाव तालूक्यातील चाळीसगाव रोडवरील गिगाव फाटा परिसरात मालेगाव तालूका पोलिसांनी छापा टाकत अवैध गांजाची तस्करी करणा-या व्यक्तीला ताब्यात घेत त्याच्या कडून तीन लाख नऊ हजार रुपये किमतीचा १५ किलो ३६१ ग्रॅम गांजा जप्त केलाय.पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचत पोलिसांनी शिंदखेडा येथिल शरद हिरालाल शिंदे याला ताब्यात घेत त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
आंदेकर टोळीची २७ खाती गोठवली; ५० लाख रुपये पोलिसांच्या हाती
पुण्यातील आयुष कोमकर खून प्रकरणातील तपासात आंदेकर टोळीच्या आर्थिक साम्राज्याचे नवे धागेदोरे समोर आले आहेत.
पोलिसांनी बंडू आंदेकर व सहकाऱ्यांची तब्बल २७ बँक खाती गोठवली असून त्यांत ५० लाख ६६ हजार ९९९ रुपये असल्याचे उघड झाले आहे.
यापूर्वी घरझडतीत कोट्यवधींचा ऐवज जप्त करण्यात आला होता.
आरोपींच्या स्थावर मालमत्तेचीही चौकशी सुरू आहे. दरम्यान, वनराज आंदेकर खुनाच्या बदल्यासाठी टोळीने आंबेगाव पठार परिसरात रेकी केल्याचे उघड झाले असून संबंधित तपास भारती विद्यापीठ पोलिसांकडे आहे
मेघगर्जनेसह पाऊस
रायगड, रत्नागिरी, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, बीड, हिंगोली, परभणी, लातूर, धाराशिव.
हलक्या ते मध्यम सरी
मुंबई,पालघर, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, कोल्हापूर, सातारा, सांगली
मेट्रोसेवा पूर्ण क्षमतेने सुरू झालेली असली तरी प्रवाशांना पार्किंगसाठी स्वतंत्र सुविधा नसल्याने त्यांना रस्त्यावरच वाहने उभी करावी लागत आहेत. परिणामी भर रस्त्यातच वाहने पार्क केल्याने वाहतूक कोंडी होते आणि पोलिसांकडून अशा वाहनांवर दंडात्मक कारवाई केली जाते. त्यामुळे प्रवाशांनाही दंडाचा भुर्दंड सहन करावा लागतो. मात्र, या त्रासातून प्रवाशांची मुक्तता होणार आहे. मेट्रो स्थानकांच्या परिसरात महापालिकेकडून महामेट्रोला २० जागा पार्किंगसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. महापालिकेच्या मालमत्ता व्यवस्थापन विभागाकडून या जागांची अंतिम नोंदणी करण्यात आली असून, लवकरच त्या जागा महामेट्रोला हस्तांतरित करण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेच्या प्रकल्प व्यवस्थापन विभाग प्रमुख दिनकर गोजारे यांनी दिली.
नवरात्रोत्सवात पुणे, पिंपरी-चिंचवड शहरासह जिल्ह्यातील देवींची शक्तिस्थळे दर्शनासाठी पीएमपीएमएलकडून दोन विशेष पर्यटन बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुटीबरोबरच ग्रुप बुकिंगसाठी बससेवा उपलब्ध होणार आहे, या सेवेचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे..
शारदीय नवरात्रोत्सवास उद्या पासून सुरूवात होत आहे. यामुळे मार्केट यार्डातील भुसार बाजारात साबुदाणा, भगर आणि शेंगदाण्याची मागणी वाढली आहे. परिणामी, साबुदाणाच्या भावात किलोमागे ४ ते ५ रुपयांनी वाढ झाली आहे. शेंगदाणा आणि भगरीचे भाव स्थिर आहेत.
देशात तामिळनाडू राज्यातील सेलम या एकमेव जिल्ह्यात साबुदाण्याचे उत्पादन होते. तेथून मालाची निर्यात होते. येथील घाऊक बाजारात एक्स्ट्रा सुपर फाइन, मिल्क व्हाइट आणि साधा प्रकारातील साबुदाणा दाखल होत असून दररोज ९० ते ११० टन आवक होत आहे.
ढगफुटी सदृश पावसाने शेतकऱ्यांचे कष्टाचे पीक क्षणात वाहून गेले.यवतमाळच्या घाटंजी तालुक्यातील कामठवडा कुऱ्हाड शेतशिवारात नाल्यालगत शेत आहे.नाल्याला पूर आल्याने पुराचे पाणी प्रचंड वेगाने शेतात शिरले, काही तासांतच शेतात उभे पीक पाण्याने गिळंकृत केले.शेतात केवळ आता दगड धोंडे उरले असून शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकरी राठोड यांचेच नव्हे तर नाल्याच्या दोन्ही बाजूंच्या शेतकऱ्यांचेही शंभर टक्के पीक उद्ध्वस्त झाले आहे. शेतकरी हवालदिल झालाय.एकीकडे कर्जाचा डोंगर, दुसरीकडे पिकांचे नुकसान, अशा दुहेरी संकटात शेतकरी कुटुंबे सापडली आहेत.महसूल व कृषी विभागाने तातडीने पंचनामा करून शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यावा. आम्हाला जगण्यासाठी आधार हवा आहे, अशी आर्त हाक पीडित शेतकरी देत आहेत.
नमो युवा रन मॅरेथॉन स्पर्धेला झाली सुरुवात
सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे, भाजप जिल्हाध्यक्ष आमदार अतुल भोसले यांच्या उपस्थित फ्लॅग ऑफ करून मॅरेथॉन स्पर्धेला झाली सुरुवात
पोलीस कवायत मैदान पासून राजवाडा आणि पुन्हा पोलीस कवायत मैदानाचा पाच किलोमीटरचा मॅरेथॉनचा मार्ग
सातारा जिल्ह्यातून 2 हजाराहून अधिक स्पर्धकांचा या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये सहभागी
धाराशिव च्या भुम तालुक्यात गेली तीन दिवसापासून सातत्याने मुसळधार पाऊस सुरू असुन या पावसामुळे भोनगिरी,साबळेवाडी शिवारातील शेतरस्ते देखील पाण्यात गेले आहेत तर शेतातील काढणीला आलेले सोयाबीन व जमीन देखील खरवडुन गेली आहे.त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावुन गेल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.शासनाने तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी या भागातील शेतकरी करत आहे
उल्हासनगर मध्ये एका प्ले ग्रुप मध्ये शिकणाऱ्या चिमुकल्याने कविता म्हणताना टाळ्या वाजवल्या नाही म्हणून शिक्षिकेने चिमुकल्याला मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलिसांनी प्ले ग्रुप ची शिक्षिका गायत्री पात्रा हिच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.