42 कोटी मुद्रांक शुल्क आणि त्यावरील दंडाची रक्कम भरल्यानंतरच व्यवहार रद्द होणार
व्यवहार रद्द करण्यासंदर्भात अमेडिया कंपनीने महसूल विभागाला दिले पत्र
मात्र अमेडिया कंपनीला मुद्रांक शुल्क भरण्यासंदर्भात महसूल विभागाकडून नव्याने पाठवण्यात आले पत्र
भोंदू बाबा ला १४ नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी. भोंदू बाबा दीपक खडकेसह वेदिका पंढरपूरकर आणि कुणाल पंढरपूरकर यांना १४ नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी
शंकर महाराज अंगात येतात असे भासवत वेदिका पंढरपूरकर ने केली दांपत्याची करोडो रुपयांची फसवणूक
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळ्यात काँग्रेसच्या हालचालींना वेग आला आहे, काँग्रेसच्या खासदार शोभा बच्छाव त्याचबरोबर निवडणूक प्रभारी राजाराम पानगव्हाणे त्याचबरोबर इतर पक्षश्रेष्ठींच्या उपस्थितीमध्ये इच्छुक उमेदवारांची बैठक घेण्यात आली.
महार वतनाची जमीन बेकायदेशीरपणे हडप केल्याप्रकरणी अमेडिया एंटरप्रायजेसचे संचालक पार्थ अजित पवार, दिग्विजय अमरसिंह पाटील यांच्यासह सह दुय्यम निबंधक हवेली-४ यांच्याविरुद्ध अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी
अंबरनाथ रेल्वे स्थानकात नव्या पादचारी पुलाचा गर्डर टाकण्यासाठी मध्य रेल्वेकडून शुक्रवार आणि शनिवारी रात्री ब्लॉक घेतला जाणार आहे. यामुळे काही लोकल रद्द करण्यात आल्या असून लांब पल्ल्याच्या गाड्या पनवेलमार्गे वळवण्यात येणार आहेत.
मध्यरात्री १ वाजून ५० मिनिटांपासून ते ३ वाजून २० मिनिटांपर्यंत हा दीड तासांचा ब्लॉक दोन दिवस घेतला जाणार आहे. यात जुना गर्डर काढणे आणि नवीन गर्डर टाकणे ही कामं केली जाणारेत.
अंधेरी पश्चिमेकडील वर्सोवा येथील बुधा गलेतील एका दुकानाला मोठी आग लागली
आगीची माहिती मिळतात वर्सोवा पोलीस, मुंबई अग्निशमन दल आणि आदानी इलेक्ट्रिसिटी चे कर्मचारी घटनास्थळावर दाखल
अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू
खेळण्याचे सामान विकणारे दुकान असल्यामुळे आगीत दुकानातील अनेक वस्तू जळून खाक
आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप अस्पष्ट
आमदार धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषद घेत मनोज जरांगे यांच्या आरोपांना उत्तर दिले आहे मात्र यावेळी मनोज मनोज जरांगे यांचे सहकारी गंगाधर काळकुटे यांनी मला अनेक फोन कॉल केले त्याचबरोबर लोकसभेला उमेदवारी दाखल केली त्यावेळेस गंगाधर काळकुटे अनेक वेळा कॉल केला असा आरोप आमदार धनंजय मुंडे यांनी केला आहे मात्र या आरोपाला आता गंगाधर काळकुटे पत्रकार परिषद घेऊन उत्तर देणारा असून त्यांची उद्या 11 वाजता पत्रकार परिषद आहे.
ठाण्यातील सिटी शोर मॉल या ठिकाणी वदे मातरम् या गीताच्या 150 वर्षपूर्ती निमित्त आयोजित कार्यक्रमात भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी उपस्थित नागरिक आणि विद्यार्थी यांना भाषणातून वंदे मातरम् या गीताच्या बाबतीत माहिती दिली. हे गीत अजरामर झालं आहे. या गीतापासून पासून प्रेरणा घेऊन प्राणाची आहुती दिली. आपल्या अंगावर काटे उभे राहतात. यां गीताच्या आठवणींना 150 वर्ष पूर्ण झाले आहेत. आपल्या पिढीला मिळालेले स्वतंत्र टिकवून ठेवले पाहिजे.
धनंजय मुंडे यांच्या पत्रकार परिषदेनंतर मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांनी आरोपाला दिलेल्या प्रत्युत्तराचा चांगलाच समाचार घेतलाय. चक्क पत्रकार परिषदेमध्ये पोलिसांच्या ताब्यात असलेल्या एका आरोपीची आणि धनंजय मुंडे यांची कॉल रेकॉर्डिंग माध्यमांना ऐकू घातली. यामुळे सबंध राज्यात एकच खळबळ उडाली आहे. तर याला धनंजय मुंडे यांनी उत्तर दिल आहे.. आर्टिफिशल इंटेलिजन्स आज काहीही तयार करता येतं. म्हणे माझं फोनवर बोलणं झालं. माझा फोन 24 तास सुरू असतो या गोरगरीब लोक मला फोन करतात माझं फोनवर बोलणं झाला असेल पण तुम्हाला संपवण्याच्या उद्देशाने बोललो नसेल. असं उत्तर धनंजय मुंडे यांनी जरांगे पाटलांना दिला आहे...
अजितदादा तुम्हाला बसम्यारोग झाला आहे का 70 हजार पचवले, अजून तुमचं चालूच आहे,हे आता थांबवा,लोकांना राग येण्याचा अतिरेक करू नका,अन्यथा नेपाळ सारखी महाराष्ट्रात परिस्थिती होईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी पार्थ पवारांच्या जमीन घोटाळ्यावरून केली आहे,
जमीन घोटाळा प्रकरणी जे निलंबित झाले आहेत,ते पुणे जिल्ह्यात येण्यासाठी बदलीला किती पैसे देतात,हे आपल्याला माहित आहे,असं देखील स्पष्ट करत,या प्रकरणी पार्थ पवार यांच्यावर अधिक गुन्हा दाखल झालाच पाहिजे अशी मागणी देखील राजू शेट्टी यांनी केली आहे,ते सांगलीमध्ये बोलत होते.
पनवेल ते सीएसएमटी ला जाणाऱ्या लोकल मधून वाशी रेल्वे स्थानकाजवळ एक तरुण ट्रेन मधून पडला
कामावरून घरी जाताना वाशी रेल्वे स्थानकाच्या जवळ घडली घटना
तरुण गंभीर जखमी
मनोज जरांगे यांचा घातपाताचा कट रचल्याप्रकरणी अटक असलेल्या आरोपींना 5 दिवसाची पोलिस कोठडी....
जालन्यातील गोंदी पोलीस ठाण्यात दाखल आहे गुन्हा.
संशयित आरोपी अमोल खुणे ,दादा गरुड यांना 5 दिवसाची पोलिस कोठडी....
आज सकाळी आरोपींना अटक केल्यानंतर जालन्याच्या अंबड येथील कोर्टात हजर करण्यात आलं कोर्टाने या आरोपींना पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे...
दादर पश्चिमेला असलेल्या स्टार मॉल मध्ये आग
अग्निशामक दलाच्या ६ गाड्या घटनास्थळी
आग विझवण्याचे काम सुरु
ऐन नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर अकोला जिल्ह्यातील अकोटमध्ये शिंदेंच्या शिवसेनेत मोठं इनकमिंग झालंय. भाजपच्या युवती आघाडीच्या माजी जिल्हाध्यक्ष चंचल पितांबरवाले यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह शिंदेंच्या शिवसेनेत प्रवास केलाय. पक्षाचे उपनेते आणि माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडलाय . विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पितांबरवाले यांच्यासह पक्षाच्या अनेकांनी आमदार प्रकाश भारसाकळे यांच्या मनमानीला कंटाळत भाजपचा राजीनामा दिला होताय. पितांबरवाले यांचं अकोटच्या राजकारण आणि समाजकारणात मोठं प्रस्थ आहेय. त्यामूळे चंचल पितांबरवाले यांच्या प्रवेशाने शिंदेंच्या शिवसेनेला अकोटात मोठं बळ मिळण्याची शक्यता आहेय.
अजित पवार वर्षा निवासस्थानी दाखल
सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेलही वर्षा बंगाल्यावर
पुणे जमिन घोटाळ्यावर चर्चा होण्याची शख्यता
सोलापुरात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.
काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील व त्यांच्या पत्नी पंचायत समितीच्या माजी सदस्या श्रीलेखा पाटील यांनी आज भाजपमध्य प्रवेश केला.
माळशिरस तालुक्यातील पानीव येथे शेकडो कार्यकर्त्यांनी त्यांच्या समवेत भाजपमध्ये प्रवेश केला.
यावेळी राधाकृष्ण विखे पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, ग्रामविकास मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश सोहळा पार पडला.
तब्बल 101 वर्षाची ग्रामपंचायतीची परंपरा मोडून धुळे जिल्ह्यात असलेल्या साक्री तालुक्यातील पिंपळनेरला आता नगर परिषदेचा बहुमान मिळाला आहे, स्थानिक ग्रामस्थ आणि लोकप्रतिनिधींच्या अनेक वर्षांच्या अथक मागणीला तसेच पिंपळनेरच्या वाढत्या विकासाला निर्णायक महत्त्व देत हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे, आणि यंदा या नगरपरिषदेच्या पहिल्यावहिल्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्याने संपूर्ण पिंपळनेरचे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे,
पहिला नगरसेवक आणि नगराध्यक्ष होण्यासाठी अनेकांची धडपड सुरू आहे, परंतु यामुळे निष्ठावंत कार्यकर्ते यावेळीही वंचित राहतील असे चित्र सध्या दिसत आहे, मुरब्बी राजकारण्यांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे, नगराध्यक्ष पद अनुसूचित जमाती महिलेसाठी आरक्षित झाले आहे, तिकीट वाटप झाल्यावर निवडणुकीचे चित्र अधिक स्पष्ट होईल.
नगर परिषद निवडणुकीआधी रत्नागिरीत राजकिय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या मतदारसंघातील रत्नागिरी शहरात रस्त्यांची कामे करताना डांबर घोटाळा झाला असल्याचा आरोप शिवसेना उबाठाचे उपनेते, माजी आमदार सुरेंद्र उर्फ बाळ माने यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.. यावेळी त्यांनी माहिती अधिकारात मागविलेली कागदपत्रे देखील सादर केली.. रस्त्यांच्या कामात 10 वर्षात एकाच ठेकेदार कंपनीला 114 कोटींची कामं मिळाली आणि यामध्ये 44 कोटींचा डांबर घोटाळा झाला असल्याचा आरोप माने यांनी केला आहे. डांबराची चलन पडताळणी न होता बिलं देण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच ज्या ठेकेदार कंपनीमार्फत ही कामं करण्यात आली, त्या कंपनीचे उद्योग मंत्री उदय सामंत आणि त्यांची पत्नी भागीदार असल्याचं माने यांनी म्हटलं आहे.. या प्रकरणाची सखोल चौकशीची मागणी माने यांनी केली आहे.. तसेच हे प्रकरण समोर आणल्याने आपल्या आणि कुटुंबियांच्या जीविताला धोका असून संपूर्ण कुटुंबाला संरक्षण देण्याची मागणी माने यांनी केली आहे..
भोंदू बाबा दिपक खडके, वेदिका पंढरपूरकर, कुणाल पंढरपूरकर यांना अटक
तिघांना नाशिक मधून पुणे पोलिसांनी घेतलं ताब्यात
शंकर महाराज अंगात येतात असे भासवत केली दांपत्याची १४ कोटी रुपयांची फसवणूक
पुणे पोलिस आयुक्तालयात गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांकडून चौकशी
अटक केल्यामुळे न्यायालयात हजर करण्यात येणार
दिवाळीत महाराष्ट्रात पुण्यानंतर एस टी महामंडळाच्या धुळे विभागाने सर्वाधिक उत्पन्नात दुसरा क्रमांक पटकाविला आहे, दिवाळीत धुळे विभागातून मुंबई व पुण्यासाठी ज्यादा बसेस सोडण्यात आल्या होत्या, दिवाळी साजरी करण्यासाठी गावाकडे जाणाऱ्यांची लक्षणीय गर्दी वाढल्यामुळे प्रवाशांनी यंदा लालपरीने गावाकडे जाण्याला प्राधान्य दिले आहे, त्यामुळे दिवाळीत मुंबई-पुण्याकडून धुळ्याकडे येणाऱ्या एसटी बसने लाखो प्रवाशांनी प्रवास केला आहे, यातून एसटी महामंडळाच्या धुळे विभागाला तब्बल 23 कोटी 68 लाख रुपयांचे विक्रमी उत्पन्न मिळाले आहे,
जरांगे यांच्या आंदोलनामुळे 500 मराठा बांधवांचे जीव गेले
मला संपून टाकण्याची ओन इयर धमकी दिली
त्यांनी त्यांची माणसं पाठवायची. ओळख पटवून फोटो काढायचे
ब्रेन मॅपिंग, नारको, सीबीआय चौकशी झाली पाहिजे.
या प्रकरणाची चौकशी CBI कडेच गेली पाहिजे
दादागिरी कोणाची आहे. समाजा समाजात अंतर कोण पडलं
अशा खोट्या केसेस करून ओबीसी समाजाचा आणि माझ्यासारखा एक कार्यकर्ता गप राहील का
गेस्ट हाऊसला मी प्रत्येक सोमवारी बसतो. अनेकजण सहकारी भेटतात. कुणाला बाजूला येऊन बोलावले लागते. आता अटक केलेला कुणी मला भेटला असेल बोलला असेल.. भेटल्याने आणि बाजूला जाऊन बोलल्याले कुणी कसला कट रचला.. अटक झालेले कार्यकर्ते त्यांचेच.. बोलणारे कार्यकर्ते त्यांचेचे कबुली देणारे कार्यकर्ते त्यांचेचे आणि आरोप माझ्यावर करतात..
माझी इमेज खराब करण्यात येत आहे. मी एका सभेत दिलेल्या प्रश्नांवर त्यांची बोलायची त्यांची तयारी नाही.
महाराष्ट्र पोलिसांनी जरांगेंना धमकी आहे.. मी त्यांना काय करायचं प्रयत्न करतोय.. तर या सर्व प्रकरणाची चौकशी सीबीआयनेच केली पाहिजे. माझ्या मनात जरी कुणाला मारायचे पाप आले असेल तर आरोपी, जरांगे आणि माझी नार्कोटेस्ट आणि ब्रेन मॅपिंग करावे. वकील लावून मी कोर्टाकडून परवानगी घेतो.
बीडमध्ये घरे जाळली, ही प्रवृत्ती कुणाची आहे. ही पिलावळं कुणाची आहेत. आम्ही तर असे केले नाही. आम्हाला कुणी शिव्या दिल्या तर गप्प बसतो. माझी उदाहरणे मित्र सांगतील. मला तलवारीने मारायला आलेल्यांची मी गळाभेट घेतली.
ओबीसी की EWS मध्ये आरक्षण जास्त कुठे मिळते? यावर चर्चा करायची जरांगेंची तयारी कधी आहे.. जनतेसमोर चर्चा करायला तयार आहे. तुम्ही हाके-वाघमारेंना मारले...
काही लोकं मला भेटले, मी कट केला. मी याच्या पाठीमागे आहे. माझ्या जिवाला धोका आहे.. असे आरोप केले जात आहेत.
माझा आणि त्यांचा बांधाला बांध आहे का? आमचं वैर काय आहे...
तुम्ही ओबीसी आरक्षणाला धक्का लावू नका. मराठा आरक्षण घ्या.. त्या लढ्यात आम्हीही खांद्याला खांदा लावू लढतो. निवडणुकीच्या तोंडावर नावे घ्यायची..
मराठा समाजाल ओबीसीत फायदा आहे की EWS मध्ये फायदा आहे? याचं उत्तर अजून दिले नाही. याचे खरे जनतेच्या समोर त्यांनी यावे, आम्ही यावे. जनतेसमोर त्यांनी उत्तर द्यावे.. फायदा कुठे आहे... याचे उत्तर अजून दिले नाही..
दुसरी विनंती केली होती, ओबीसीचा एल्गार मेळावा होता. ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, त्यासाठी होता. छत्रपती महाराज यांनी गावकूस घालून दिले, ते मागील २ वर्षांपासून बिघडलेय. एका जातीचा मित्र दुसऱ्या जातीचा ..आता मित्र राहिले नाहीत.
दोन सख्खे भाऊ.. जर एक जरांगेंच्या विचाराचा असला तरी तो सख्या भावाला माणणार नाही. पुरोगामी महाराष्ट्रात हे वातावरण कुणी केले.. आपल्याला एकत्र येऊन गावा गावात तयार झालेला तणाव निवळावा लागेल.
पंकजा मुंडे आणि माझ्यावर खालच्या पातळीवर टिका केली
जरांगे आणि माझी ब्रेन मॅपिंग टेस्ट करा
मुख्यमंत्री, भुजबळांची आयमाय काढली
या सर्व गोष्टी महागात पडतील
मनोज जारांगे पाटील यांनी केलेल्या आरोपांवर धनंजय मुंडे यांनी प्रत्युत्तर दिले आहे
परळीत आंदोलन झालं त्यासाठी मनोज जारांगेना जागा मी देण्यास मदत केली
माझं आणि जरांगेचं वैर नाही
मुंडे म्हणाले गेली ३० वर्ष मी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात आहे
जात पात पाहून मी कधी राजकारण केलं नाही
मनोज जरंगे पाटील यांनी केलेल्या आरोपांवर धनंजय मुंडे यांनी प्रत्युत्तर दिले आहे
माझं आणि जरांगेचं वैर नाही
मुंडे म्हणाले गेली ३० वर्ष मी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात आहे
जात पात पाहून मी कधी राजकारण केलं नाही
मनोज जरंगे पाटील यांनी केलेल्या आरोपांवर धनंजय मुंडे यांनी प्रत्युत्तर दिले आहे
मुंडे म्हणाले गेली ३० वर्ष मी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात आहे
जात पात पाहून मी कधी राजकारण केलं नाही
धनंजय मुंडे यांच्यावर जरांगे पाटलांनी केलेलं आरोपावर त्यांनी बोलायचं टाळल
झिरवाळ म्हणले मनोज जरांगे यांनी काय बोलाव काय बोलू नये त्याचा प्रश्न आहे, त्यातले मला माहिती नाही
नाशिकच्या वडाळा रोड येथील अशोक हॉस्पिटल परिसरात दोन गटात हाणामारी
हाणामारीत मध्ये दगड डोक्यात टाकून केले जखमी
मोईज शेख असं जखमी झालेल्या इसमाचे नाव
जखमीला उपचारासाठी खाजगी रुग्णालयात केले दाखल
कोल्हापूरच्या संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाचं काम महापालिका अधिकारी आणि ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे रखडल आहे.
हे काम दर्जेदार आणि लवकरात लवकर गतीने व्हावं यासाठी रंगभूमी दिनाच्या निमित्ताने कलाकारांनी केशवराव भोसले नाट्यगृहात कला सादर करत प्रशासनाचे लक्ष वेधलं होतं.
याची तात्काळ दखल खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज आणि राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी घेतली.
या दोघांनीही संपूर्ण नाट्यगृहाच्या सद्यस्थितीची पाहणी देखील केली. खासदार शाहू महाराज आणि आमदार राजेश क्षीरसागर यांच्या प्रमुख उपस्थितीत तसंच महापालिकेचे अधिकारी आणि रंगकर्मी यांची संयुक्त बैठक केशवराव भोसले नाट्यगृहात आज पार पडली.
राज्यात नगरपरिषद नगर, पंचायतीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.
यादरम्यान सर्वच राजकीय पक्षांचे बॅनर, पोस्टर, झेंडे त्याचबरोबर राष्ट्रीय पक्षांचे चिन्ह असलेले फलक हे हटवण्यासंदर्भात प्रशासनाकडून कारवाई सुरू करण्यात आली आहे.
मात्र अमरावती पदवीधर मतदारसंघाचे आमदार धीरज लिंगाडे यांच्या कार्यालयावरील त्यांच्या नेत्यांचे फोटो असलेले बॅनर अजूनही कायम असल्याचे पाहायला मिळत आहे..
आणि याकडे यंत्रणेचे ही दुर्लक्ष असल्याच पाहायला मिळतंय.. त्यामुळे उच्चशिक्षित आमदाराकडूनच आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा सूर उमटत आहे
मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी अभियंत्यांच्या अंतरिम जामीन अर्जावर आज सुनावणी पार पडली. न्यायालयाने अर्ज फेटाळला नसून मंगळवारी सर्व पुरावे तपासल्यानंतर निर्णय दिला जाण्याची शक्यता आहे.
न्यायाधीश जी. टी. पवार यांच्या न्यायालयात झालेल्या सुनावणीत तपास अधिकाऱ्यांना मंगळवारी सर्व पुरावे सादर करण्याचे आदेश देण्यात आले.
यावेळी रेल्वे अधिकाऱ्यांचा आणि रेल्वे पोलिसांचा अहवाल दोन्ही तपासले जाणार आहेत.
मनोज जरांगे यांचा घातपाताचा कट रचल्याप्रकरणी पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपी अमोल खुणे ,दादा गरुड यांच्यासह इतर सहकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल झाला.
जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या उपनिरीक्षकांच्या फिर्यादीवरून जालन्यातील गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. याप्रकरणी मनोज जरांगे यांनी जालना पोलीस अधीक्षकांना तक्रार अर्ज दिला होता. मनोज जरांगे पाटील यांच्या घातपाताचा कट प्रथमदर्शनी दिसून आल्याचं फिर्यादीत नमून.
उपमुख्यमंत्री अजित पवार वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी पोहचले आहे. मुलगा पार्थ याच्यावर जमीन हैरव्यावहार प्रकरणाचे आरोप झाले आहेत.
नंजय मुंडे यांच्यावर मनोज जरांगे यांनी आरोप केल्यानंतर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी जरांगे यांची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
जरांगे यांनी उपस्थित केलेल्या मुद्दे आणि आरोपांवर गृह विभाग तपास करेल. धनंजय मुंडे असे काही करतील असे वाटत नाही. जरांगे यांनी मिडिया ट्रायल बंद करावी असा टोला हाके यांनी लगावला
मनोज जरांगेंच्या आरोपानंतर धनंजय मुंडेंची तात्काळ पत्रकार परिषद
नाशिकच्या येवला शहरातील पारेगाव रोडवरील बाजीराव नगर भागात मध्यरात्रीच्या सुमारास 4 ते5 चोरट्यांनी ऐका किराणा दुकानासह अन्य ऐका ठिकाणी चोरी करत दोन दुचाकी लांबवल्याची घटना घडली असून,चोरी करणारे चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले आहे,याप्रकरणी येवला शहर पोलिसात तक्रार दाखल होताच पोलिसांनी सीसीटीव्ही च्या आधारे तपास सुरू केला आहे
सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील मतकुणकी येथील द्राक्ष उत्पादक शेतकरी रामचंद्र जाधव यांनी द्राक्ष बागेला माल नाही.. ती फेल गेल्यामुळे तसेच लहरी निसर्ग, रोगराई, कर्जबाजारीपणा आणि होणारे आर्थिक नुकसान याला कंटाळून दोन एकर द्राक्ष बाग काढून टाकली.. सरकारने द्राक्ष उत्पादकांना कर्जमाफी देऊन द्राक्ष बागा जगविण्यासाठी सहकार्य करण्याची मागणी होत आहे.
राज्याच्या कृषी विभागाच्या जमिनी बाबत अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल. सरकारी जमिनीवर बेकायदेशीर ताबा मिळवल्याप्रकरणी तहसीलदार सूर्यकांत येवले यांच्यासह शितल तेजवानी, दिग्विजय पाटील यांच्यावर आणखी गुन्हा दाखल.
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना संपवण्याचा कट एका बीडच्या बड्या नेत्यांनी रचला आहे असा गंभीर आरोप आणि त्याचबरोबर दोन संशय व्यक्तींना देखील जालनाच्या स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे मनोज जरांगे यांचे सहकारी गंगाधर काळकुटे यांनी जालना पोलीस अधीक्षकांना या संदर्भात निवेदन देऊन संपूर्ण माहिती सांगितली आहे.
सावंतवाडीत भाजपच्या झालेल्या मेळाव्यानंतर शिंदेंची शिवसेना आणि भाजपमध्ये शाब्दिक वॉर सुरू झाला आहे. मी नितेश राणे मुळे नव्हे तर रवींद्र चव्हाण आणि नारायण राणे यांच्यामुळे नगराध्यक्ष झालो होतो असं सांगत शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी नितेश राणे यांच्यावर पलटवार केला आहे. शिंदे सेनेचे जिल्हाप्रमुख तसेच माजी नगराध्यक्ष संजू परब यांना मीच नगराध्यक्ष केलं. मात्र, तेच मला रोज उठून आव्हान देतात, तेव्हा आश्चर्य वाटतं असं वक्तव्य सावंतवाडीतील मेळाव्यात नितेश राणे यांनी त्यांचं नाव न घेता केलं होतं. मात्र मी रविंद्र चव्हाण आणि नारायण राणे यांच्यामुळे नगराध्यक्ष झालो असं सांगत नितेश राणेंचं हे आवाहन संजू परब यांनी पलटवून लावलय. सध्या कोकणात शिंदेंची शिवसेना आणि भाजपमध्ये कलगीतुरा रंगला आहे पाहुयात नितेश राणे नेमकं काय म्हणाले होते आणि त्याला संजू परब यांनी काय उत्तर दिलंय.
भुसावळ रेल्वे विभागाने ऑक्टोबरमध्ये फुकट्या प्रवाशांसह विविध स्त्रोतांमधून उत्पन्नात लक्षणीय वाढ केली आहे. २०२४ च्या तुलनेत १५ टक्के अधिक महसूल मिळविला आहे. रेल्वेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे रेल्वेने एकूण १३८ कोटी ७२ लाखांचा महसूल मिळविला आहे. भुसावळ रेल्वे विभागाने यंदाच्या ऑक्टोबरपर्यंत तिकीट तपासणी मोहिमेंतर्गत विना व अनियमित तिकीट, विनापावती मालवाहून नेणाऱ्या एक लाख आठ हजार ९४० प्रवाशांकडून नऊ कोटी ९४ लाखांचा दंड वसूल केला. दिवाळी व छट पूजेनिमित्त प्रवासी संख्येत झालेली वाढ लक्षात घेता भुसावळ विभागात प्रवासी व्यवस्थापनासाठी सर्वांगीण गर्दी नियंत्रण व्यवस्था प्रभावी अमलात आणण्यात आली. तक्रार निराकरणासंदर्भात भुसावळ विभागाने भारतीय रेल्वेत तिसरा क्रमांक मिळविला आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी मोबाईल अनारक्षित तिकीट प्रणाली विभागातील भुसावळसह सात स्थानकांवर कार्यान्वित करण्यात आली आहे. यंदा ऑक्टोबरमध्ये तीन हजार २४५ अनारक्षित तिकिटांची नोंद झाली. प्रखर विपणन उपक्रम व ग्राहक संवादामुळे भुसावळ रेल्वे विभागाने कांदा वाहतुकीसाठी मोठ्या प्रमाणात सुविधा उपलब्ध करून दिल्याने त्यातून नऊ कोटी पाच लाखांचा महसूल मिळाला.
वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनची आवक सातत्याने वाढत आहे. काल तब्बल १४ हजार क्विंटल सोयाबीनची नोंद झाली. यात बिजवाई सोयाबीनला प्रतिक्विंटल तब्बल ७ हजार ३०० रुपये इतका उच्चांकी दर मिळालाय. मात्र इतर सामान्य सोयाबीनला केवळ ४ हजार ३८० रुपये प्रतिक्विंटलचाच दर मिळतोय. त्यामुळे दोन्ही दरांमध्ये तब्बल जवळपास तीन हजार रुपयांचा फरक दिसून येतोय. बिजवाई सोयाबीनचा दर हा सरकारच्या हमीभावापेक्षाही जास्त निघाल्याने बिजवाई करणारे शेतकरी खूश असले, तरी साधे सोयाबीन पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना मात्र अपेक्षित भाव अजूनही मिळत नाहीय.
पुण्यात जमिन विक्रीचा घोटाळा चर्चेत असतानाच रायगडच्या म्हसळ्यातील ठाकरोली ग्रामस्थांनी गाव परिसरात जमिन विक्री बंदीचे बॅनर लावले आहेत. मुंबई आणि पुणे शहरापासून तीन चार तासाच्या अंतरावर असणाऱ्या रायगड जिल्ह्याला मुंबई आणि पुणेकरांनी सेकंड होम म्हणून पसंती दिली आहे. विस्तीर्ण असा समुद्र किनारा रायगडला लाभल्याने येथे पर्यटन व्यवसाय देखील वाढत आहे. यामुळे अनेक गावांमध्ये फार्म हाऊस संस्कृती वाढीस लागली आहे. यामुळे येथील गावातील गावपण हरवल असून हे वाचवण्यासाठी ठाकरोली ग्रामस्थांनी जमिन बचाव, गाव बचाव अभियान सुरु करीत गाव परिसरात जमिन विक्री बंदीचे बॅनर लावले आहेत. कायदेशीर दृष्ट्या हे किती योग्य, अयोग्य हा विषय वादाचा असला तरी ठाकरोली ग्रामस्थांच्या या अनोख्या बॅनरची चर्चा सर्वत्र सुरु आहे.
मनपा निवडणुका जवळ आल्याने कार्यकर्त्यांनी तयारीला लागण्याच्या मुख्यमंत्री यांच्या सूचना
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल संध्याकाळी त्यांच्या दक्षिण पश्चिम मतदारसंघातील दिवाळी मिलन कार्यक्रमात सहभागी झाले होते...
- गेल्या वेळी मनपा मध्ये भाजप चे 108 नगरसेवक निवडून आले होते यंदा त्यापेक्षा अधिक जागा जिंकण्याच फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना दिले लक्ष्य.
- पुढील वर्षी होणारी नागपूर विभाग पदवीधरची जागा परत मिळविण्याचा निर्धार यावेळी मुख्यमंत्री यांनी केला. गेला वेळी ती जागा पराभूत झाल्याच शल्य असल्याचं फडनविस यांनी दिवाळी मिलन कार्यक्रमात पदाधिकाऱ्यासमोर सांगितलं.
पुण्यातील कोंढवा खुर्द व कोंढवा बुद्रुक परिसरामध्ये अनाधिकृत बांधकामावर बुलडोझर
अनधिकृत बांधकाम केलेल्या अनेक इमारती केल्या जमीनदोस्त
१८ हजार ५०० चौ.मी. भागावर अतिक्रम विरोधी पथकाची कारवाई
कारवाई दरम्यान पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात
अनधिकृत बांधकाम हे कारवाई झाल्यामुळे धोकादायक झालेले आहे.त्याचा वापर करण्यात येऊ नये व सदर इमारतीत सदनिका विकत घेऊ नये, पुणे महानगरपालिका चे आवाहन
खगोलशास्त्रज्ञ डॉ. नरेश दधिच यांचे चीनमध्ये निधन झालेय. ते ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ आणि अंतर विद्याशाखीय खगोलशास्त्र व खगोलभौतिकीशास्त्र केंद्राचे (आयुका) माजी संचालक होते.
८१ व्या वर्षी चीनमधील बीजिंग येथे हृदयविकाराने गुरवारी झाले निधन झाले. डॉ. दधिच हे बीजिंगमध्ये संयुक्त संशोधनासाठी महिनाभर गेले होते. गेल्या एक दोन दिवसांपासून त्यांना अस्वस्थ वाटत होते. गुरुवारी सकाळी त्यांची तब्येत ठीक होती. मात्र, स्थानिक वेळेनुसार दुपारी त्याचे निधन झाले. डॉ. दाधिच यांचे पार्थिव भारतात आणण्यासाठी प्रयत्न होत असून लवकरच ते भारतात आणण्यात येणार आहे
आगामी होऊ घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगरपरिषदेच्या निवडणुकांसाठी रणधुमाळी लागली आहे आता राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून पहिलाच उमेदवार जाहीर करण्यात आला आहे बीड जिल्ह्यामध्ये सहा नगर परिषदेमध्ये निवडणूक होत आहे त्यापैकी गेवराई नगर परिषदेमध्ये आमदार विजयसिंह पंडित यांच्या गटाकडून माजी नगराध्यक्ष महेश दाभाडे यांच्या पत्नी शितल महेश दाभाडे यांना उमेदवारी देत थेट विजयसिंह पंडित यांच्याकडून या उमेदवारीची घोषणा करण्यात आली आहे.
अंबरनाथ नगरपालिकेवर एक लाख टक्के कमळच फुलणार, असं म्हणत भाजपाने आज अंबरनाथ नगरपालिका निवडणुकीचं रणशिंग फुंकलं आहे. या निवडणुकीसाठी भाजपकडून तेजश्री विश्वजीत करंजुले यांना उमेदवारी जवळपास निश्चित झाली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.