Maharashtra Live News Update Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Live News Update : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील पुढील सुनावणी 18 ऑगस्ट रोजी

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates : आज सोमवार, दिनांक ४ ऑगस्ट २०२५, महाराष्ट्रात पावसाची विश्रांती, महाराष्ट्राचे राजकारण तापणार, राज-उद्धव एकत्र येण्यावर चर्चा, राज्यातील राजकीय घडामोडी, मुंबई-पुण्यासह राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

Namdeo Kumbhar

Beed: सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील पुढील सुनावणी 18 ऑगस्ट रोजी

विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांची अनुपस्थिती.

विशेष सहाय्यक सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे न्यायालयात हजर.

आरोपी वाल्मीकरांच्या प्रॉपर्टी संदर्भाच्या अर्जावरती न्यायालयात चर्चा.

आरोपीचे वकील विकास खाडे न्यायालयात हजर.

मन्याडेश्वर शांती धाम येथे कावड यात्रा, जलाभिषेक कार्यक्रम संपन्न..

श्रावण महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील नदी पात्रातील मनियाडेश्वर शांतिधाम येथे पारंपरिक पद्धतीने कावड यात्रा व जलाभिषेक सोहळा संपन्न झाला.या धार्मिक सोहळ्याचे आयोजन माँ शक्ती संगठन व भजनी मंडळ जळगाव खुर्द तसेच समस्त ग्रामस्थांच्या सहभागातून अत्यंत भक्तिपूर्वक वातावरणात करण्यात आले.. श्रावण महिन्यातील दुसऱ्या सोमवारी गावातील शिवभक्तांनी कावड यात्रा काढून, शुद्ध जल आणून महादेवाच्या पिंडीवर जलाभिषेक केला

Nanded: नांदेड पोलिसांची कॅनल रोडवरील स्पा सेंटरवर धाड.

नादेडमधील कॅनल रोडवरील रेड ओक स्पा टू सेंटरवर पोलिसांनी छापा टाकला आहे. स्पा सेंटरच्या नावाखाली येथे अश्लील प्रकार सुरू असल्याचा पोलिसांना संशय होता. त्यावर छापा टाकला असता स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे दिसून आले आहे. याप्रकरणी भाग्यनगर पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. भाग्यनगर पोलिसांनी स्पा सेंटर मध्ये काम करणाऱ्या नागसेन गायकवाड, संतोष इंगळे, रोहन गायकवाड यांना अटक केली असून स्पा सेंटरचा मालक अमोदसिंग साबळे, मॅनेजर मनोज जांगिड हे दोघे फरार आहेत. स्पा सेंटर मधून पोलिसांनी चार महिलांची सुटका केली आहे. पोलिसांनी 16 हजार 560 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत भाग्यनगर पोलीस दोन आरोपीचा शोध सुरु केला असून पुढील तपास सुरू आहे.

अंबरनाथमध्ये नालेसफाईची तक्रार केल्यानं भाजपा पदाधिकाऱ्याला मारहाण

अंबरनाथच्या स्वामीनगर परिसरातून वाहणाऱ्या मुख्य नाल्याची पावसाळ्यापूर्वी नालेसफाई करण्यात आली होती. मात्र ही नालेसफाई व्यवस्थित न झाल्यामुळे अजूनही या नाल्यात कचरा असल्याची तक्रार भाजपाचे अंबरनाथ पश्चिम सचिव श्रीनिवास आदीमूलम यांनी अंबरनाथ नगरपालिकेत केली होती. तसंच या नाल्याचं पाणी नागरिकांच्या घरात शिरत असल्यामुळे नाल्याची व्यवस्थित सफाई करण्याची मागणी त्यांनी केली होती. मात्र याचा राग धरून स्वामीनगर परिसरातील दोन ते तीन जणांनी मिळून त्यांना रात्रीच्या सुमारास मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.

भोरच्या बनेश्वर मंदिरातील शिवलिंगातून पाणी वाहू लागले; भाविकांची गर्दी

पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध शिवकालीन श्री क्षेत्र बनेश्वर मंदिरातील शिवलिंगातून गेल्या काही दिवसांपासून पाणी वाहू लागले आहे.

भोर तालुक्यात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे शिवलिंगाच्या रचनेनुसार नैसर्गिक स्वरूपात हे पाणी वाहू लागते. दरवर्षी जास्त पावसाळा झाल्यास शिवलिंगातून पाणी वाहते, असा अनुभव ग्रामस्थांनी सांगितला.

श्रावण महिन्यात ही घटना घडल्यामुळे भाविकांची मंदिरात मोठी गर्दी होत आहे. पांडवकालीन मानले जाणारे हे मंदिर पेशव्यांच्या काळात जीर्णोद्धारित झाले असून, गर्भगृहात ‘सद्योजात’, ‘वामदेव’, ‘अंघोर’, ‘ईशान’ व ‘तत्पुरुष’ अशी पाच शिवलिंगे दगडी स्तंभावर विराजमान आहेत.

उल्हासनगर मधील रस्ता बनला वाहनतळ

उल्हासनगर शहरातील कॅप नंबर पाच भागातील कैलास कॉलनी रस्ता,हा वाहनतळ आहे की रस्ता असा प्रश्न विचारायची वेळ आलीआहे. कारण या रस्त्याच्या कडेला अवजड वाहन खाजगी बसेस ,टेम्पो राजरोसपणे उभे केलेले असतात , त्यामुळे हा रस्ता वाहनांना जाण्या येण्यासाठी आहे की पार्किंग साठी असा सवाल नागरिक विचारत आहेत. या रस्त्याला स्मशानभूमी असून येथे अंतयात्रे साठी आलेल्या नागरिकांना वाहन उभी करण्यासाठी जागाही नसते, त्यामुळे पालिकेने हे अनधिकृत वाहन उभी करण्यास बंद करावीत अशी मागणी नागरिक करत आहेत .

चंद्रेश्वर गडावर चंद्रेश्वर महादेवाच्या दर्शनाला भाविकांची गर्दी.

नाशिकच्या चांदवड येथिल डोंगर रांगा मध्ये निर्सग रम्य वातावरणातील पुरातन चंद्रेश्वर महादेवाच्या दर्शनाला भाविकांची श्रावणातील दुस-या सोमवारी सकाळ पासूनच गर्दी झाली.शिस्तबध्द पध्दतीने भाविकांनी भगवान चंद्रेश्वर महदेवाचे दर्शन घेतले.तर स्वामी जयदेवपुरी महाराज यांच्या हस्ते अभिषेक करण्यात ला.चंद्रेश्वर गडावर निर्सगरम्य वातावरण असल्याने पर्यंटना बरोबरच भाविकांची गर्दी होत असते.श्रावण महिन्या बरोबरच शिवरात्राला चंद्रेश्वर गडावर भाविकांची गर्दी होत असते.

तुम्ही पैसे दिले म्हणजे स्वतःच्या घरातून दिले नाही मुख्यमंत्री शेतात व वखराला गेले होते का?? आमचे पैसे आहे आमचा अधिकार आहे हे टोमणे मारणे बंद करा आम्हाला देखील बोलता येतं तुमच्यापेक्षा वाईट बोलता येतं हे विसरू नका - बच्चू कडू

दुसऱ्या श्रावणी निमित्त शिवमंदिर भक्तांनी फुलले

दुसऱ्या श्रावणी सोमवार निमित्त आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा नागनाथ मध्ये शिवभक्तांचा उत्साह पाहायला मिळाला आहे सकाळपासून हजारोंच्या संख्येने औंढा नागनाथ मंदिर परिसरात शिवभक्तांनी दीड किलोमीटर रांगा लावल्याचे पाहायला मिळालं दरम्यान औंढा नागनाथ संस्थानकडून या सोमवारी पूजेचा मान औंढा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक

गणपत राहिरे यांना दिला होता, राहिरे कुटुंबाने सपत्निक प्रभू शिवशंकराची पूजा करत दुग्ध अभिषेक केला

श्रावण महिन्यात शिवभक्तांच्या संरक्षणाची जबाबदारी पोलीस घेतात त्या पोलिसांविषयी कृतज्ञता म्हणून प्रथम पूजेचा मान पोलीस अधिकाऱ्यांना मिळाला तर पोलीस कर्मचाऱ्यांना देखील दर्शनासाठी मुभा देण्यात आली होती.

कोथरूड प्रकरणासंदर्भात रूपाली चाकणकरांनीही घेतली दखल-

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी दखल घेतली

कोथरुड पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप करणाऱ्या तीन मुलींना रुपाली चाकणकर यांनी फोन केला.

पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याशी चर्चा करणार असल्याची माहिती रूपाली चाकणकरांनी दिली.

जाहिरातीतून 'पीएसआय' पद गायब विद्यार्थ्यांना धक्का; सरकारवर नियोजनशून्यतेचा आरोप

राज्य सरकारच्या यंत्रणेत पोलिस उपनिरीक्षक (पीएसआय) पदांची दोन हजारांहून अधिक पदे रिक्त असताना, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) नुकत्याच जाहीर झालेल्या गट-ब संयुक्त पूर्व परीक्षेच्या जाहिरातीत पीएसआय पदांचा उल्लेखही नाही, ही बाब राज्यभरातील हजारो विद्यार्थ्यांसाठी धक्कादायक ठरली आहे. परिणामी, सरकारच्या नियोजनशून्यतेवर आणि आयोगाच्या भूमिकेवर विद्यार्थ्यांतून संताप व्यक्त होत आहे.

सहारा एअर कार्गोतील कस्टम अधीक्षक 10.20 लाखांची लाच घेताना अटक

मुंबई – सीबीआयने सहार एअर कार्गो, मुंबई येथे नियुक्त कस्टमचे अधीक्षक यांना 10.20 लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक केली. कस्टम हाऊस एजंटकडून (CHA) माल साफसफाईसाठी प्रति किलो 10 रुपये दराने लाच मागण्यात येत होती.

अधिकाऱ्याने आधी क्लिअर केलेल्या मालावर 6 लाखांची मागणी केली होती. तर सध्या अडवलेला माल सोडण्यासाठी 10 लाख रुपये घेतले. 2 ऑगस्ट 2025 रोजी सापळा रचून अटक करण्यात आली असून न्यायालयाने 6 ऑगस्टपर्यंत पीसीआर मंजूर केला आहे. सीबीआय कडून चौकशी सुरू आहे.

शिरूर तालुक्यातील पिंपरी दुमालातील सोमेश्वर मंदिरात भाविकांची अलोट गर्दी

श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर शिरूर तालुक्यातील पिंपरी दुमाला येथील श्री सोमेश्वर मंदिरात सोमवारी हजारो भाविकांनी मनोभावे दर्शन घेतले. पहाटेपासूनच मंदिर परिसर भाविकांनी गजबजून गेला होता. अभिषेक, पूजन, आरती यामध्ये भाविकांनी सहभाग घेत भक्तीभाव व्यक्त केला.

दुसऱ्या श्रावण सोमवारी परळीत प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनासाठी हजारो भाविकांची गर्दी

देशात असलेल्या बारा ज्योतिर्लिंगापैकी पाचवे असलेल्या प्रभु वैद्यनाथाच्या दर्शनासाठी आज दुसर्‍या श्रावण सोमवार निमित्ताने भाविकांनी मोठी गर्दी केली.सकाळपासूनच भाविक भक्तांनी रांगा लावल्या होत्या. मंदिर परिसर भक्तीमय वातावरणाने फुलून गेला.दिवसभरात विविध राज्यातून हजारो भाविकांनी प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेतले.वैद्यनाथ मंदिर परिसरात श्रावण महिन्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

संतोष देशमुख खून प्रकरणाची आज बीडच्या विशेष न्यायालयात 11वी सुनावणी

- आरोपी वाल्मीक कराडच्या मालमत्ता जप्तीच्या अर्जावर निर्णय येणार.

- वाल्मीक कराडच्या जामीन अर्जावर युक्तिवाद होणार

वाल्मीक कराड सोडता इतर सर्व आरोपींच्या दोष मुक्तीच्या अर्जावर देखील सुनावणी होणार.

- विशेष सरकारी वकील उज्वल निकम येणार नसल्याची माहिती.

- विशेष सहाय्यक सरकारी वकील बाळासाहेब फुले आज विशेष न्यायालयात काम पाहणार

फिल्मी स्टाईलने पाठलाग करत लिफ्टमध्ये जाणाऱ्या महिलेला लुटले; शिरूरकर संतप्त

शहरातील गजबजलेल्या रामलिंग रोड परिसरात भरदिवसा आणि लोकवस्तीमध्ये चोरट्यांनी फिल्मी पद्धतीने पाठलाग करत लिफ्टमध्ये जात असलेल्या महिलेला लक्ष्य करत तिच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून धूम ठोकली. गर्दी असतानाही चोरटे कोणालाही भीक न घालता निर्भीडपणे चोरी करून पसार झाले.ही घटना फक्त एकटी नाही. कालच याच परिसरात 65 वर्षीय वृद्ध महिलेच्या गळ्यातील दागिने हिसकावण्याचा प्रकार घडला होता. दोन दिवसांत दोन महिला लुटल्या गेल्याने महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये पोलिस प्रशासनाविषयी रोष आहे.

राज्यात ऑगस्टमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता

सप्टेंबरमध्ये पुन्हा चांगला पाऊस होण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) वर्तविली

नैऋत्य मान्सून हंगामाच्या दुसऱ्या सहामाहीसाठी वेधशाळेने पावसाचा अंदाज जाहीर केला आहे.

आयएमडीच्या नैऋत्य मान्सून हंगामाच्या दुसऱ्या सहामाहीत आणि मासिक पाऊस आणि तापमानाचा अंदाज या दीर्घकालीन अंदाजानुसार ऑगस्ट – सप्टेंबर या कालावधीत संपूर्ण भारतात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता

आयएमडीने दिलेल्या संभाव्य अंदाज नकाशांनुसार सामान्यपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे.ऑगस्टमध्ये महाराष्ट्रात कमी पाऊस पडण्याची शक्यता

पुणे मेट्रोला मिळतोय प्रवाशांचा भरभरून प्रतिसाद; जुलै महिन्यात 60 लाखांचा टप्पा पार

शहरात वाहतूककोंडीचा त्रास वाढत असतानाच, पुणे मेट्रोने प्रवाशांच्या दृष्टीने नवा उच्चांक गाठला आहे.

-गेल्या दोन महिन्यांत मेट्रोने सातत्याने प्रवासीसंख्येत वाढ नोंदवली असून,जुलै महिन्यात तब्बल 59 लाख 58 हजारांहून अधिक प्रवाशांनी मेट्रोचा वापर केला

-ही आतापर्यंतची सर्वाधिक मासिक प्रवासी संख्या आहे.

-पीएमपी तिकीट दरवाढीचा परिणाम मेट्रोच्या फायद्यात?

-1 जूनपासून पीएमपीने बसचे तिकीट दर वाढवले असून, याचा काहीसा परिणाम मेट्रोच्या प्रवाशांवर होत असल्याचे दिसते.

-महामेट्रोकडून सध्या वनाझ ते रामवाडी आणि पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट हे दोन मार्ग कार्यरत आहेत. लांब पल्ल्याची सुलभ, वेळेत आणि वाहतूककोंडीविना सेवा यामुळे प्रवाशांचा कल मेट्रोकडे झुकतो आहे. दररोज सरासरी 1 लाख 93 हजार नागरिक मेट्रोने प्रवास करत आहेत.

शेतकऱ्याकडील साठवून ठेवलेले सोयाबीन संपले

लातूर जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना सोयाबीन भाव वाढीची अपेक्षा होती, भाववाढीच्या अपेक्षेने मागील हंगामातील सोयाबीन शेतकऱ्यांनी घरात साठवून ठेवले होते, मात्र मागच्या एक वर्षापासून सोयाबीनच्या दरात सातत्याने घसरण होताना दिसली, त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी मिळेल त्या दरात सोयाबीन विक्री केली, तर सध्या बाजारात सोयाबीनची आवक कमी झाल्याने सोयाबीनचा दर 300 रुपयांनी वाढला आहे,4 हजार 600 रुपये प्रतिक्विंटल असा सोयाबीनला भाव मिळतो आहे. तर आवक घटल्याने, भाव वाढला आहे. मात्र शेतकऱ्याकडे सध्या सोयाबीन शिल्लक नाही. त्यामुळे वाढलेल्या भावाचा शेतकऱ्यांना कसलाही फायदा होणार ,नसल्यास दिसत आहे.

जालना जिल्ह्यातील मोसंबी बागा संघटक, झाडाखाली पडतोय फळांचा सडा ,शेतकरी चिंतेत.

जालना जिल्ह्यातील मोसंबी उत्पादक शेतकरी चिंतेत सापडला आहे. सध्या मोसंबी उत्पादक शेतकरी फळगळतीमुळे हवालदिल झाला आहे. जालन्यातील घनसावंगी, जालना यासह जिल्हाभरातील शेतकऱ्यांनी मोठ्या मेहनतीने मोसंबी पिकाची जोपासना केली मात्र ऐन मोसंबीला फळ लागल्यानंतर मोठ्या प्रमाणात फळगळती होत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. जिल्ह्यातील मोसंबी उत्पादक शेतकरी मोसंबी फळगळतीमुळे चिंताग्रस्त झाला असून अनेक वर्षापासून जोपासलेल्या फळबागांवर फळगळतीचे मोठे संकट ओढावले आहे त्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. कृषी विभागाने शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करण्याची मागणी शेतकरी करत आहे.

सांगलीच्या कृष्णा नदीपात्रात रंगल्या होड्यांच्या शर्यती..

सांगलीच्या पोषण अधिपत्रामध्ये श्रावण मास निमित्ताने होड्यांचा शर्यती पार पडल्या.संकल्प फाउंडेशन कडून आयोजित करण्यात आलेल्या होड्यांच्या शर्यतीमध्ये कृष्णा व वारणा नदीकाठच्या 11 संघांनी सहभाग घेतला होता.अत्यंत चुरशीने आणि थरारक अशा पार पडलेल्या होड्यांच्या शर्यतीमध्ये सांगलीवाडीच्या बोट क्लबने प्रथम क्रमांक पटकावला तर कसबे डिग्रजच्या बोट क्लबने दुसरा क्रमांक पटकावला. दरवर्षी कृष्णा नदीच्या पात्रामध्ये श्रावण महिन्यानिमित्ताने घोड्यांच्या शर्यती घेण्याची परंपरा आहे.कृष्णा नदी पात्रामध्ये रंगलेल्या या होड्यांच्या शर्यतीचा थरार पाहण्यासाठी हजारो सांगलीकरांनी कृष्णा नदीकाठावर गर्दी केली होती.

कराड रोडवरील रेल्वे भुयारी मार्ग आज पासून 20 दिवस बंद राहणार

पंढरपूर शहरातील कराड रोडवरील रेल्वे पुलाखालील रस्त्याच्या कामासाठी हा भुयारी मार्ग आज पासून पुढे 25आॅगस्ट पर्यंत बंद राहणार आहे. या संदर्भात रेल्वे विभागाने लेखी पत्र दिले आहे. दरम्यानच्या काळात या मार्गावरून होणारी वाहतूक ही पुणे रोडवरील सरगम चौक आणि टाकळी रोड रेल्वे पुलाखालून वळवण्यात आली आहे. या ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे.

श्री क्षेत्र भिमाशंकराची महादेव नगरी सजली 

श्रावण महिन्याचा दुस-या सोमवारी बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भिमाशंकराची महादेव नगरी सजलीय

दुस-या सोमवारी पहाटे मुख्य शिवलिंगावर दुग्धाभिषेक करुन महाआरती शंखनाद करण्यात आला यावेळी भिमाशंकरच्या मंदिर आणि मुख्य गाभारा विविध फुलमाळांनी सजावट करण्यात आली दरम्यान हर हर महादेव, ओम नम शिवाय च्या जयघोषात महादेवाची नगरी दुमदुमुन गेली

श्रावण महिन्याच्या दुस-या सोमवारी भिमाशंकरला भाविकांनी गर्दी केली

पहाटेची महाआरती शंखनाद झाल्यानंतर मंदिर भाविकांसाठी खुल करण्यात आलं यावेळी रात्रीपासुन दर्शन मार्गावर असलेल्या भाविकांनी मोठ्या भक्तीभावाने भगवान शंकराची आराधना करत दर्शन घेतलं

यावेळी भिमाशंकर मंदिरातुन आढावा घेत भाविकांशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी रोहिदास गाडगे यांनी

विठ्ठल मंदिर समिती व्यवस्थापकाची चौकशी पूर्ण

विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या व्यवस्थापकावर करण्यात आलेल्या आरोपाची चौकशी पूर्ण झाली आहे. या चौकशी मध्ये ज्याने आरोप केले होते. त्या तक्रारदाराने आपली तक्रार नसल्याचे लेखी पत्र चौकशी समितीला दिले आहे. त्यामुळे मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांना क्लीन चिट मिळाली आहे.

आषाढी वारी काळात मंदिर समितीचा मंडप टाकण्याचा ठेका मिळवून देतो म्हणून व्यवस्थापकांनी टक्केवारी घेतल्याचा कथित आरोप करण्यात आला होता. त्यानंतर समितीने अॅड‌.माधवी निगडे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली होती. या समितीने या प्रकरणी चौकशी केली असता तक्रारदाराने आपली याबाबत तक्रार नसल्याचं पत्र दिले आहे. मंदिर समिती आता तक्रारदारावर काय कारवाई करणार हे पाहावे लागणार आहे.

लातूर पोलिसांची मोठी कारवाई, दरोडे च्या तयारीत असणाऱ्या 5 जणांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

लातूर जिल्ह्यातल्या औसा इथ लातूर तुळजापूर महामार्गावर मध्यरात्री दरोडेच्या तयारीत असणाऱ्या 5 जणांच्या टोळक्याला लातूर पोलिसांनी ताब्यात घेत ,कारवाई केली आहे. दरम्यान या कारवाईत पोलिसांनी धारदार शस्त्रासह 5 जणांना ताब्यात घेतल आहे. तर सात लाख रुपयांचा मुद्देमाल देखील पोलिसांनी जप्त केलाय, दरम्यान मागच्या काही दिवसापासून जिल्ह्यातल्या अनेक भागात चोरीचे प्रमाण वाढले आहे .,त्यामुळे नागरिकांनी रात्रीची गस्त वाढवावी आणि सावधगिरी बाळगण्याच आव्हान त्यावेळी पोलिसांनी केले आहे.

मराठा आरक्षणासाठी मुंबईत मोठ्या संख्येने जाण्याचा समाज बांधवांचा निर्धार

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे हे मुंबई येथे 29 ऑगस्टला उपोषण करणार आहेत, तर या उपोषणास सहभागी होण्यासाठी लातूर जिल्ह्यातील सकर मराठा समाजाने निर्धार केला आहे, सकल मराठा समाजाची लातूर येथे बैठक संपन्न झाली, या बैठकीत चलो मुंबई, या आंदोलनाच्या अनुषंगाने नियोजन करण्याच्या सूचना गावात दिल्या आहेत., यावेळी मोठ्या संख्येने सकल मराठा समाजातील कार्यकर्ते उपस्थित होते.

नियम मोडणाऱ्या वाहनांना दीड कोटींचा दंड

जानेवारी ते जुन या सहा महिन्याच्या कालावधीत यवतमाळ जिल्ह्यातील वाहनधारकांना एक कोटी 51 लाख 4 हजार 900 रुपयांचा दंड टोटवण्यात आला आहे चार चाकी दुचाकी आणि मालवाहू वाहन चालकांकडून सर्रास वाहतूक नियम मोडले जातात त्यामुळे कारवाई करण्यात येत आहे. जिल्हा वाहतूक शाखेच्या सहा उपविभागातील पथकाने अशा नियम मोडणाऱ्यांना हेरून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली आहे.

रत्नागिरी - निवळत गॅस वाहतूक करणारा टँकर पलटी

रत्नागिरी - निवळी येथे गणपतीपुळे रोडवर गॅस वाहतूक करणारा टँकर पलटी

निवळी - गणपतीपुळे रोडवरची घटना; वाहतुकीवर कोणताही परिणाम नाही

मागील दोन महिन्यातील तिसरी घटना

पलटी झाल्यानंतर गॅस लिकेजचा कोणताही धोका नाही

जखमी टँकर चालकाला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलवले

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Walmik Karad Beed : वाल्मिक कराडच्या दोन्ही मुलांची तब्बल १७ तास चौकशी, बीडमध्ये पोलिसांच्या तपासाला वेग

Navi Mumbai: पनवेलमधील लेडीज डान्स बार तोडफोड प्रकरणी मोठी कारवाई, ८ मनसे पदाधिकाऱ्यांना अटक

मोदींच्या मंत्रिमंडळात खांदेपालट होणार? महाराष्ट्रातील नेत्याचं नाव आघाडीवर, केंद्रात धक्कदायक घडमोडींची शक्यता

Spam Calls: वारंवार येणाऱ्या कर्ज आणि क्रेडिट कार्ड कॉल्समुळे वैतागलात ? मग 'हे' अॅप आताच डाउनलोड करा

Uncontrolled diabetes symptoms: शरीरात 'हे' बदल दिसले तर समजा डायबेटीज नियंत्रणाबाहेर गेलाय; लक्षणं ओळखून त्वरित तज्ज्ञांचा सल्ला घ्या

SCROLL FOR NEXT