नंदुरबार तालुक्यातील शनिमाडळ गावात जोरदार पाऊस झाल्याने शेतकरी चे कादा रोप कापुस मका कांदा या सारख्या अन्य पिकांचे खुप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे एकीकडे कांदा ला भाव नाही आणि दुसरी कडे निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे , तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकरी करत आहे.
अमरावती जिल्ह्यामध्ये गेल्या 24 तासांपासून अवकाळी पावसाने हजेरी लावलेली आहे. अचानक आलेल्या या अवकाळी पावसामुळे वेचणीला आलेला शेतकऱ्यांच्या कापूस भिजला आहे. जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यात आज पहाटेपासूनच पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांचा कापूस हा पूर्णतःपाण्यात भिजवून गेलेला आहे.शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास पुन्हा अवकाळी पावसाने हिसकून घेतला आहे.दिवाळीपूर्वी शासनाने मदत देण्याची घोषणा केली होती मात्र ती घोषणा फक्त कागदावरच राहिली तर दुसरीकडे राबराब कष्ट करून जे काही पीक हातात येणार होते ते सुद्धा आता पाण्याने भिजून गेले. आहे बळीराजा आता पूर्णतः हवालदिन झालेला आहे
येवल्यातील अपघातांचा सत्र काही केल्या थांबण्याचे नाव घेत नाहीये महिन्याभरात रस्त्या अपघातामध्ये चार ते पाच जणांचे बळी गेले असून आज सकाळी विंचूर चौफुली या ठिकाणी विस्कटलेल्या वाहतूक व्यवस्थेचा आणखी एक बळी गेला आहे.
आत्महत्यासाठी प्रवृत्त करणाऱ्या आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी विद्यार्थी युवक काँग्रेसच्या आंदोलन
पुण्यातील गुडलक चौकात विद्यार्थी युवक काँग्रेस कडून आंदोलन
खंडाळा घाटातील गारमाळ परिसरात गव्याचे दर्शन झाल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये गव्याचा वावर स्पष्टपणे दिसत असल्याने परिसरातील नागरिक आणि पर्यटकांमध्ये याची मोठी चर्चा रंगली आहे. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी याची दखल घेत तपास सुरू केल्याची माहिती मिळाली आहे. गेल्या काही दिवसांपासून लोणावळा खंडाळा परिसरात वन्यजीवांच्या हालचाली वाढल्याचे दिसून येत आहे. बोरघाट व लोणावळ्या जवळील कुरवंडे घाटमाथ्यावर व जंगल परिसरात रानटी गवा व बिबट्याचा वावर यापूर्वी आढळला आहे.
मुंबईकडून पुण्याकडे जाणऱ्या लेन वर वाहनांच्या मोठ्या रांगाच रांगा.
दिवाळी सुट्टी तसेच विंकेड मुळे महामार्गावर वाहतुक कोंडी...
पोलिस प्रशासना कडून वाहतुक कोंडी सोडविण्या साठी १५ मिनिटांचा ब्लॉक चा पर्याय...
सिंदखेडराजा तालुक्यातील किनगावराजा महसूल मंडळात पळसखेड चक्का येथे पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा तडाखा बसला आहे. मुसळधार पावसाने कपाशी आणि सोयाबीन या प्रमुख पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. आधीच दोन महिन्यांपासून चालू असलेल्या सततच्या पावसामुळे शेतकरी हैराण झाले असताना, आता दिवाळीच्या तोंडावर कपाशी पिक पूर्णपणे पाण्यात भिजले आहे...अगोदरची अतिवृष्टीची मदत मिळालेली नाही त्यात राहिलेले थोडेफार पिकांचंही या पावसाने नुकसान झाले असल्याने शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे..
कुटुंबीयांकडून खासदार सुप्रिया सुळे यांना सांगण्यात आले की तपास करत असताना स्थानिक पोलीस हस्तक्षेप करत आहेत तपास एस आय टी कडे देण्यात यावा अशी मागणी कुटुंबियांनी सुप्रिया सुळेंकडे केली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी कुटुंबियांसोबत फोन द्वारे संवाद साधत या प्रकरणांमध्ये जोपर्यंत हा तपास शेवटच्या आरोपी पर्यंत जात नाही तोपर्यंत आम्ही तुमच्या सोबत आहोत आणि सर्वांना शिक्षा झाली पाहिजे असा विश्वास यावेळी दिला यावेळी कुटुंबीयांनी खासदार सुप्रिया सुळे यांना संपूर्ण व्यथा सांगितल्या.
- जुन्या बोगद्याची लांबी वाढवण्यासोबतच ग्रेड सेपरेटर फ्लॉय ओव्हरच्या कामासाठी इंदिरानगर बोगदा राहणार बंद
- महामार्ग प्राधिकरणाकडून उद्यापासून सुरू करण्यात येणार काम
- इंदिरानगर बोगद्यातील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली
- वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं पोलीस प्रशासनाचं आवाहन
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज फलटण येथे कृतज्ञता मेळाव्यासाठी येत आहेत. या मेळाव्या मध्ये फलटण मधील विविध विकास कामांचं ऑनलाईन भूमिपूजन सुद्धा होणार आहे. या कार्यक्रमासाठी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले तसेच राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे तसेच पर्यटन मंत्री शंभूराज देसाई हे देखील उपस्थित राहणार आहेत. गेल्या दोन दिवसापासून फलटणमध्ये डॉक्टर महिला आत्महत्याचे प्रकरण गाजत असताना आज मुख्यमंत्री फलटणमध्ये येत असल्याने त्यांच्या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे फलटण येथील यशवंतराव चव्हाण हायस्कूलचा राहणार गणातून तिथल्या परिस्थितीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी ओंकार कदम यांनी
खराब हवामानाचा फटका जलवाहतूक सेवेला बसलाय. गेट वे ते मांडवा ही जलवाहतूक सेवा काल संध्याकाळ पासूनच बंद करण्यात आली आहे. हवामान खात्याच्या इशाऱ्यानंतर रायगडच्या किनाऱ्यांवर तीन नंबरचा बावटा लावण्यात आला आहे. समुद्रात धोकादायक परिस्थिती निर्माण होऊ शकते त्यामुळे ही सेवा बंद ठेवण्याचा निर्णय मेरी टाइम बोर्डाने घेतला आहे. या मार्गावरील नियमित प्रवाशांची यामुळे गैरसोय झाली आहे. अलिबाग मुरूड परिसरात सुटीसाठी फिरायला आलेल्या पर्यटकांना आता परतीचा प्रवास करताना रस्ते मार्गाचा अवलंब करावा लागणार आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागण्याआधी हिंगोलीत राजकीय वार सुरू झाले आहेत, महायुतीत मध्ये लोकसभा व विधानसभा निवडणुका एकत्र लढणाऱ्या शिवसेनेने हिंगोलीत मित्र पक्षातील नेत्यांशी चर्चा न करता स्वबळाचा नारा देत निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे, शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी शहरात व्यापाऱ्यांच्या भेटीगाठी देखील सुरू केल्या आहेत दरम्यान भाजपचे आमदार तानाजी मुटकुळे यांनी मात्र शिवसेना आमदारावर नाव न घेता गंभीर आरोप केले आहेत राज्याचे माजी मुख्यमंत्री व राज्यसभेचे खासदार अशोक चव्हाण राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या उपस्थितीत सुरू असलेल्या एका कार्यक्रमात आमदार मुटकुळे यांनी गंभीर आरोप केले आहेत,मित्र पक्षातील स्वबळाचा नारा देणारे काहीजण व्यापाऱ्यांना मतदानासाठी धमक्या देत असल्याचे सांगत इटका का जवाब पत्थर से मिलेगा असा इशारा दिला आहे तर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी देखील कोण अंगावर येत असेल तर शिंगावर घ्या असे म्हणत शिवसेनेला डिवचले आहे
त्यामुळे विरोधी पक्ष आधी हिंगोलीत महायुतीतील दोन महत्त्वाचे पक्ष व नेते एकमेकांना भिडल्याचं चित्र आहे
नगरपरिषद निवडणुकीपूर्वी धाराशिव साठी महायुती सरकारने मोठा निर्णय घेतलाय.धाराशिव शहरातील रस्त्यांसाठी 117 कोटींच्या कामाला मंजुरी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्या उपस्थितीत या कामाचं लवकरच भूमिपूजन होईल अशी माहिती भाजपा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली. धाराशिव शहरात 26 किलोमीटरचे 59 रस्ते या निधीतून होणार आहेत 18 महिन्यांमध्ये काम पूर्ण होईल असंही पाटील यांनी सांगितलं. अनेक दिवसांपासून शहरातील रस्त्यांचा प्रश्न प्रलंबित होता त्यामुळे आता खड्ड्यातून धाराशिवकरांची सुटका होणार आहे.
सलग दुसऱ्या दिवशी अमरावती जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे त्यामुळे शेतकऱ्यांची दानदान उडाली आहे. अचानक आलेल्या पावसामुळे अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी आणलेलं शेकडो क्विंटल सोयाबीन भिजलं आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला असून शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आल्याचे पाहायला मिळत आहे. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचा आणि व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान झाले असून आधीच सोयाबीनला भाव नाही त्यात पाऊसाने सोयाबीन भिजल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. त्यामुळे सरकारने नुकसान भरपाई द्यावी आणि नाफेडचे खरेदी केंद्र सुरू करण्याची शेतकऱ्यांनी मागणी केली आहे.
वडाळी वनपरिक्षेत्रा लगत असलेल्या महादेव खोरी परिसरातील मंगलधाम व गौतम नगर या मानवी वस्तीत एक बिबट दोन पिलासह फिरत असल्याचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे.मंगलधाम कॉलनी मध्ये एका इसमाने आपल्या घरात एक बिबट दोन पिल्लांसह शिरल्याची वनविभागाला माहिती दिली.वन विभागाचे पथक पोहोचण्यापूर्वीच बिबट पिलासह त्या ठिकाणाहून बाहेर जाताना सीसीटीव्ही कॅमेरा कैद झाला.मात्र नागरी वस्तीत बिबट्या शिरल्याने परिसरातील नागरिक चांगलेच धास्तावलेले आहेत.वनविभागाने या परिसरात सतर्कतेच्या इशाऱ्याचे फलक लावले असून रात्रीच्या वेळी नागरिकांनी तसेच लहान मुलांनी बाहेर पडू नये व स्वतःची काळजी घ्यावी असा इशारा वन विभागाने दिलेला आहे.
पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या इंदापूर शहरातील बस स्थानकावर प्रवासी घेऊन आल्यानंतर उभे असलेल्या बसने अचानक पेट घेतला. यावेळी प्रसंगावधान राखत प्रवासी बस मधून बाहेर आले. त्यामुळे सुदैवाने जीवितहानी झाली नाही मात्र आगीने रौद्ररूप धारण केल्याने संपूर्ण बस जळाली यामुळे बसचे पूर्णपणे नुकसान झाले. याबाबत अधिक माहिती अशी की,बस (क्रमांक एम एच 20 बी एल 4233) ही धाराशिव पुणे बस मध्यरात्री दोन वाजून दहा मिनिटांच्या सुमारास इंदापूर बस स्थानकाच्या फलाट क्रमांक 11 वर आली. याच वेळी बस ने अचानक पेट घेतला. इंधन गळतीमुळे बसला अचानक आग लागल्याचे बोलले जात आहे. ज्यावेळी आग लागली त्यावेळी बस मध्ये जवळपास 50 प्रवासी होते त्यामुळे अचानक एकच गोंधळ उडाला प्रवाशांनी कसाबसा आपला जीव वाचवला. मात्र या आगीत बस आणि प्रवाशांच्या साहित्याचे पूर्णपणे नुकसान झाले. अशी प्राथमिक माहिती असून याबाबत इंदापूर पोलीस स्थानकात गुन्हा नोंदवण्याबाबत पुढील प्रक्रिया सुरू आहे.
दिवाळीनंतर मुंबई - पुण्यात परतण्याची लगबग
महामार्गावर कोंडीची शक्यता पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याच्या सूचना
दिवाळीत मूळ गावी गेलेले शहरवासीय पुणे मुंबईकडे परतण्यास सुरुवात झालीय...
या प्रवाशांच्या मोटारी खाजगी बस मुळे महामार्गावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता
या पार्श्वभूमीवर महामार्ग पोलीस पुणे पोलीस तसेच पिंपरी चिंचवड पोलीस वाहतूक आणि वाहन चालकांना महामार्ग यांच्यापर्यंत मार्गाचा वापर करावा आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा अवलंब करावा अशा सूचना दिल्या आहेत...
फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या महिला डॉक्टरने आत्महत्या केली. तिच्या कुटुंबीयांची काही वेळापूर्वी मंत्री पंकजा मुंडे यांनी बीडमधील तिच्या गावी जात भेट घेतली आहे. माध्यमांशी बोलताना मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितलं मी आता संपुर्ण माहिती घेतली आहे. तिच्या जुन्या काही कंप्लेंट आहेत. तिच्यावर झालेल्या अन्यायमध्ये कोण आहे किंवा नेमकं काय घडलंय याबाबत चौकशी होणं गरजेचं आहे.
हा गंभीर विषय आहे मी देवेंद्रजी फडणवीस यांना भेटणार आहे आणि वरिष्ठ अधिकाऱ्याकडून नि:पक्षपाती याची चौकशी झाली पाहिजे कोणालाही पाठीशी घातलं जातंय असं वाटणार नाही हा आग्रह मी धरणार आहे. आणि न्याय मिळेपर्यंत शांत बसणार नाही. आरोपींना कठोर शिक्षा होईल असे सांगत कुटुंबीयांना मंत्री पंकजा मुंडे यांनी धीर दिला. तर या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ पातळीवर चौकशी केली जाईल असे आश्वासन देखील दिले.
ग्रामविकास मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी माळशिरसचे शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार उत्तम जानकर यांच्यावर पलटवार केला आहे.
आमदारकीसाठी पाय चाटणारी आमची औलाद नाही अशा शब्दात उत्तम जानकर यांच्यावर टीका केली. आमदार जानकर यांनी दोन दिवसांपूर्वी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर टिका केली होती. जानकर यांच्या टिकेला पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी त्यांच्या भाषेत उत्तर दिले.
माळशिरस येथे माजी आमदार राम सातपुते यांनी स्नेह मिलन मेळावा आयोजित केला होता. आम्ही कंबर मोडायच्या नादी लागत नाही, आम्ही कंबरेच्या खाली मारतो. जाता जाता मारतो ...मी काय अकलूजकर नाही अशी टीकाही जयकुमार गोरे यांनी केली.
माळशिरसचे भाजपचे माजी आमदार राम सातपुते पुन्हा मोहिते पाटील यांच्या विरोधात आक्रमक झाले आहेत. अकलूजच्या सुमित्रा पंतस्थेतील गैरव्यवहाराची चौकशी करावी अशी मागणी केली आहे. पंतस्थेने अनेक शेतकऱ्यांच्या नावावर बोगस कर्ज काढून शेतकर्यांची फसवणूक केली आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार झाले आहेत. याची चौकशी करावी या मागणीसाठी जन आंदोलन केले जाईल. प्रसंगी जिल्हाधिकारी कार्यालया समोरही न्यायासाठी आंदोलन केले जाईल असा इशाराही राम सातपुते यांनी दिला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावर मोहिते पाटील विरूद्ध राम सातपुते असा संघर्ष पेटण्याची शक्यता आहे.
सातारा जिल्ह्यातील फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर महिलेने सुसाईड नोट लिहीत आत्महत्या केली आणि या आत्महत्या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी कुटुंबीय ठाम असून आता लोकप्रतिनिधींकडून डॉक्टर यांच्या कुटुंबीयांची सांत्वन पर भेट घेऊन या प्रकरणात शेवटपर्यंत सोबत असण्याचा विश्वास दिला जात आहे आज स्वतः आष्टी विधानसभा मतदारसंघ भाजपाचे आमदार सुरेश धस हे त्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन करणार आहेत.
यवतमाळ जिल्ह्यात रात्री दरम्यान अनेक भागात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली अचानक आलेल्या पावसाने शेतकऱ्यांची चांगली तारांबळ उडाली असून सध्या कापूस वेतनीवर आलाय तर सोयाबीन काढणी अंतिम टप्प्यात आहे.त्यामुळे अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना जोरदार फटका बसलाय, कापूस संपूर्ण भिजलाय
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.