र्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या लोणावळ्यात अखेर वरुणराजाने दमदार हजेरी लावली असून गेल्या २४ तासांत तब्बल ९४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. यंदा मान्सून वेळेवर न दाखल झाल्याने पर्यटकांनी लोणावळ्याकडे काही प्रमाणात पाठ फिरवली होती, त्यामुळे पर्यटन व्यवसायावरही परिणाम झाला होता. मात्र, सध्या सुरू असलेल्या पावसाच्या जोरदार पुनरागमनामुळे हॉटेल व्यावसायिक, चिक्की व्यापारी आणि पर्यटनाशी संबंधित व्यवसायिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून येत्या आठवड्यांत पर्यटकांची गर्दी वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे..
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सकाळपासून पावसाच्या अधूनमधून दमदार सरी कोसळत असून आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
मान्सून कोकणात दाखल झाल्यानंतर गेले 15 दिवस पावसाने दडी मारली होती मात्र गेले दोन दिवस पावसाने दमदार हजेरी लावली आहे.
गेल्या 24 तासात जिल्ह्यात 61 मी.मी पाऊस झाला असून वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक 85 मी.मी नोंद झाली आहे.
साताऱ्यातील पाथरपुंजला सर्वात जास्त पावसाची नोंद
एका दिवसात 171 मिलिमीटर पाऊस
ओझर्डे धबधबा वाहू लागला
धाराशिव जिल्ह्यात कृषी विभागाची मोठी कारवाई
तुळजापूर तालुक्यातील १२ कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित
खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर कृषी विभागाला तपासणी वेळी आढळून आल्या त्रुटी
तीन केंद्रांचा बियाणे व खते विक्रीचा तर नऊ केंद्रांचा खते व कीटकनाशके विक्रीचे परवाने निलंबित
पहिल्याच पडलेल्या पावसामुळे मुंबईची लाईफ लाईन लोकल मंदावली
तब्बल दहा ते पंधरा मिनिटे उशिराने लोकल मुंबईच्या दिशेने धावत आहे
वसई विरार नालासोपारा रेल्वे स्थानकात मोठ्या प्रमाणात मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या चाकरमानांची गर्दी झाली आहे
विलास घुले हत्या प्रकरणात पुरवणी जबाब नोंदवला
जबाब नोंदवल्यानंतर आंदोलन घेतले मागे.
मृतदेह ताब्यात घेत अंत्यविधीसाठी नातेवाईक आणि गावकरी टाकळी गावाकडे रवाना.
पुणे शहरात रात्रभर रिमझिम पावसाची हजेरी
रात्रीपासून सुरू असलेल्या रिमझिम पावसामुळं शहराच्या तापमानात घट
घाटमाथा व जिल्ह्यात काही ठिकाणी मध्यम पाऊस पडण्याचा हवामान विभागाचा अंदाज
पुणे शहरासह मध्य महाराष्ट्रात पुढील चार दिवस वातावरण ढगाळ असणार
पुणे जिल्ह्याला ३ दिवस येलो अलर्ट
पावसामुळे लोकल सेवा ठप्प झाली होती
ठाणे ते पनवेल लोकल सेवा सुरू
तब्बल १ तासाने पहिलीच गाडी ठाण्याला रवाना झाली आहे
जळगाव जिल्ह्यात मुक्ताईनगर शेतकऱ्यांचे केळी पिकाचे मोठे नुकसान
प्रशासनाने पंचनामे करूनही विमा कंपनीच्या हवामान केंद्रात वादळी वाऱ्याची नोंद नसल्याचे कारण देत विमा कंपनीने शेतकऱ्यांचे नुकसान भरपाई चे क्लेम नाकारले
शेतकऱ्यांवर असमानी संकटाबरोबरच विमा कंपनीचे सुलतानी संकट आले आहे
शेतकरी अद्यापही मदतीच्या प्रतीक्षेत
गरीब-मजुरांच्या बँक खात्यांचा सायबर गुन्ह्यांसाठी वापर
अमरावती ग्रामीण पोलिसांकडून गोव्यात छापा
१२ आरोपींना अटक
मोबाईल, सिम कार्ड, लॅपटॉप टॅबसह सहा कोटींचा बुद्धिमान जप्त
पहिल्याच पावसाचा फटका हार्बर रेल्वेला बसला आहे. कोपरखैरणे या ठिकाणी रेल्वे स्थानक परिसरात पाणी साचले असल्याने ठाणे रेल्वे स्थानकात वाशी अणि पनवेल या ठिकाणी जाणार्या प्लॅटफॉर्म वर प्रवाश्यांना गर्दी केली आहे
महाराष्ट्रात पावसाची दमदार बॅटिंग
राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये कालपासून पावसाने जोर धरला आहे
पुढील काही तास महत्त्वाचे
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.