पाऊस आणि धुक्याचा आनंद सध्या लोणावळ्यात पर्यटकांना मिळत असल्याने धर्तीवरचा स्वर्ग म्हणून प्रसिद्ध असलेल्या लोणावळ्याच्या टायगर पॉइंटवर धुक्याची दाट चादर पसरु लागली आहे.
उंच घाट माथ्यावर निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या टायगर पॉइंट ला पर्यटक पावसाळ्यात मोठी पसंती देतात, सध्या टायगर पॉइंट, लायन्स पॉइंट धुक्यात हरवल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
रत्नागिरी जिल्ह्यासाठी आज पावसाचा यलो अलर्ट
मात्र गेले दोन दिवस हवामान विभागाच्या अंदाजाला पावसाचा चकवा
अजूनही पाऊस बरसतोय सरींवर, मुसळधार पावसाची प्रतिक्षा
जिल्ह्यात २२ जुलैपासून पाऊस जोरदार पडणार असा हवामान विभागाने वर्तविला होता अंदाज, गेले दोन दिवस होता ऑरेंज अलर्ट
नाशिक जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती गंभीर बनली असून, गोदावरी नदीची पाणीपातळी अजूनही धोका पातळीच्या वरच वाहात आहे.
नंदुरबार जिल्ह्यात पावसाने दीर्घ विश्रांती घेतल्यामुळे पाण्याअभावी उगवलेल कापूस पिके शेतातच जडू लागली आहेत. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने आणि अपेक्षेने कापसाची पेरणी केली होती. मात्र, पावसाच्या लपंडावामुळे आणि कोरड्या हवामानामुळे ही तरुण पिके ऐन वाढीच्या काळातच वाया गेली आहेत. निसर्गाच्या लहरीपणा मुळे हातातोंडाशी आलेला घास हिवाळा लागल्यासारखा हिरावला गेल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे. पिके पूर्णपणे खराब झाल्यामुळे आता बहुतांश शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची नामुष्की ओढवली आहे. पहिल्या पेरणीसाठी आणलेले बियाणे, खते आणि मजुरीचा खर्च वाया गेल्यामुळे आधीच आर्थिक संकटात असलेल्या शेतकऱ्यांना या दुबार पेरणीमुळे मोठा आर्थिक फटका बसला आहे.
जिल्ह्यात खरीप हंगामाच्या पेरणीला वेग आला असून आतापर्यंत एकूण पेरणी क्षेत्राच्या ९० टक्के क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. जिल्ह्यातील एकूण ६ लाख ८२ हजार ९९९ हेक्टर क्षेत्रापैकी ६ लाख ११ हजार ५३९ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे.यंदा सोयाबीनच्या क्षेत्रात लक्षणीय घट झाली असून कापसाच्या क्षेत्रात वाढ झाली आहे.
आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर विदर्भाचे प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेगाव येथील संत गजानन महाराज मंदिरात आजपासूनच भाविकांची मोठी गर्दी होत आहे. भाविकांची वाढती संख्या लक्षात घेता आज आणि उद्या मंदिर रात्रभर दर्शनासाठी खुले ठेवण्यात आले आहे. आषाढी एकादशीच्या निमित्ताने उद्या मंदिरात अभिषेक, भजन-कीर्तन, महापूजा आणि इतर विशेष धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, संपूर्ण मंदिर परिसर भक्तिमय वातावरणाने न्हाऊन निघाला आहे.
आषाढी एकादशी चे सोहळ्यासाठी खामगाव ते पंढरपूर या विठ्ठल दर्शन एक्सप्रेस ला भाविकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असून 1506 वारकरी घेऊन रेल्वेची पहिली फेरी पंढरपूरकडे प्रस्थान केलीय.. दरम्यान मोठ्या संख्येने खामगाव रेल्वे स्थानकावर परिसरातील वारकरी मंडळी जमली होती .. विठू माऊलीचा जयघोष करत हे सर्वजण आनंदी वातावरणात पंढरपूरकडे मार्गस्थ झाले.. दरवर्षी फक्त आषाढी करता खामगाव रेल्वे स्थानकावरून जाणाऱ्या या विठ्ठल दर्शन एक्सप्रेस ला परिसरातील वारकरी शेतकरी बांधवांचा मोठा प्रतिसाद मिळत असतो, दुसरी फेरी सुद्धा लवकरच प्रस्थान करणार आहे. . या रेल्वे फेरी मधून रेल्वे प्रशासनाला पाच लाख पंचेचाळीस हजार 152 रुपयाचे उत्पन्न झाले. तर भाविकान मध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले ..
जालन्याच्या महापौरांनी बजावलेली शिस्तभंगाची नोटीस अपक्ष नगरसेवक श्रीकांत पांगरकर यांनी डस्टबिनमध्ये टाकली आहे.जालना महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत बेशिस्त वर्तन केल्याप्रकरणी महापौर वंदना मगरे यांनी भाजपच्या दोन, शिंदे सेनेच्या एका आणि एका अपक्ष नगरसेवकाला शिस्तभंगाची नोटीस बजावली होती. मात्र पक्षश्रेष्ठींच्या सूचनेनंतर महापौर वंदना मगरे यांनी बजावलेल्या शिस्तभंगाच्या नोटीसा रद्द केल्या आहेत. दरम्यान मी सभेत कुठल्याही प्रकारचे अपशब्द वापरले नाही तरीही मला महापौरांनी नोटीस बजावली महापालिकेत विरोधकांचा आवाज दाबण्याच काम सुरू असल्याचा आरोप अपक्ष नगरसेवक श्रीकांत पांगरकर यांनी केला आहे.
नाशिक जिल्ह्याच्या कळवण तालूक्यातील पश्चिम पट्ट्यात तीन दिवसां पासून सतत पडत असलेल्या जोरदार पावसामुळे चणकापूर धरण क्षेत्रा लगत असलेल्या शेतां मध्ये पावसाचे तसेच नद्यांना आलेल्या पुराचे पाणी साचल्याने मका,सोयाबीन,भात रोपे ही पिक पाण्याखाली गेली असून त्याचा फटका पिकांना बसण्ची भिती व्यक्त केली जात आहे.तर चांगल्या पावसामुळे रखडलेली भाताची लागवण काही भागात होण्याची शक्यता शेतक-यांनी व्यक्त केली आहे.
- चांदोरी गावाला पुराच्या पाण्याने वेढा घातल्याने प्रशासनाकडून खबरदारी
- 40 कुटुंबातील सदस्यांना सायखेडा परिसरातील गोदावरी सोसायटीत हलवले
- गोदावरी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने प्रशासन अलर्ट मोडवर
- जिल्हा परिषदेच्या वतीने नागरिकांना जेवण आणि निवासाची करण्यात आली व्यवस्था
जालन्यातील पिंपळगाव सूळ येथे बेकायदेशीर वाळू उपशाला विरोध केल्याने एका शेतकऱ्याला शिवीगाळ करीत काठीने व लाथा बुक्क्यांनी जबर मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. कृष्णा जाधव असं मारहाण झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.जालन्यातील भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव सूळ शिवारात पूर्णा नदी पात्रात हि घटना घडली असून या घटनेचा व्हिडिओ देखील समोर आला आहे.याप्रकरणी भोकरदन पोलीस ठाण्यात तीन संशयित आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आषाढ सरींचे जोरदार तांडव सुरू आहे.. 11 टीएमसी क्षमतेच्या भंडारदरा धरणात पाण्याची जोरदार आवक सुरू असल्याने, 90 टक्के पाणीसाठा स्थिर ठेऊन प्रवरा नदीपात्रात विसर्ग सुरू करण्यात आलाय.. गेल्या 24 तासात घाटघर परिसरात 300 तर रतनवाडी परिसरात 248 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे.. जोरदार पाऊस सुरू असल्याने डोंगर दऱ्यांवरील धबधबे पूर्ण क्षमतेने प्रवाहित झाले आहेत.. पाणलोट क्षेत्रात धो धो पाऊस आणि वारे वाहत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून भंडारदरा परिसरातील पर्यटन स्थळे पर्यटकांसाठी पूर्णपणे बंद करण्यात आले आहेत
शनिवारवाडा ते जिल्हाधिकारी कार्यालय या मार्गावरून जाणार मोर्चा
केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या मागणीसाठी आणि विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीचा निषेधार्थ म्हणून मोर्चाचे आयोजन
पोलिसांनी नागरिकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे केले आवाहन
-नाशिकच्या सुरगाणा तालूक्यात गेल्या तीन दिवसां पासून पावसाने चांगलेच धुमशान घातले असून तालुक्यात अनेक ठिकाणी पावसामुळे नुकसान झाले आहे.तालूक्यातील नद्या,नाल्यांना मोठे पूर आल्याने काही ठिकाणी दरडी कोसळल्याने काही ठिकाणचे रस्ते बंज झाले आहे तर छोटे बंधारे फुटून पाणी वाहून शेतात गेल्याने विहिरी गाळ पाण्याने भरल्या व शेतजमिनी खरडून गेल्या आहेत.तर भोरमाळ येथिल पुंडलिक मोतीराम चव्हाण ही व्यक्ती पुराच्या पाण्यात वाहून गेली आहे.
पालघर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून मुसळधार पडणाऱ्या पावसाने रात्रीपासून विश्रांती घेतली असली तरी आज जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट असून आज देखील मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे.दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसाने जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झालं असून अनेक सखल भागात पाणी साचून रस्ते बंद झाले होते तर अनेक गावपाड्यांमधील वीजपुरवठा अजूनही खंडित आहे. मुसळधार पावसाने रस्ते वाहतूक तसेच रेलवे वाहतुकीवर ही परिणाम झाला होता. सूर्या प्रकल्पाचे धामणी धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली असून धामणी धरणाचे पाणी सूर्या नदीत सोडण्यात आल्याने सूर्या नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.