Maharashtra News Live Update: Saam TV Marathi news
महाराष्ट्र

Maharashtra News Live Update: सिंधुदुर्गात अखेर दमदार पावसाने पुनरागमन

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates : मुंबईत मान्सूनचे आगमन, पावसाळी अधिवेशन अपडेट, देशातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

Namdeo Kumbhar

आता जनताच सगळं हातामध्ये घेणार-काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर.. ठाकरे गटाच्या आमदार फुटीवर यशोमती ठाकूर यांचे वक्तव्य...

उद्धव ठाकरे यांचे सहा खासदार फोडून शिंदे सेनेत पक्षप्रवेश झाल्यानंतर काँग्रेसच्या नेत्या माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी प्रतिक्रिया देत संताप व्यक्त केला..पैसा आणि सत्ता.. सत्ता आणि पैसा हा गोंधळ यांचा सुरू आहे.. पण हे जास्त दिवस टिकणार नाही लोकांना अजिबात आवडत नाही आहे.ही जी प्रवृत्ती चालली आहे. मत चोरायचे आणि लोक चोरायचे ,14 -15 वर्षे झाली तरी पण तुम्हाला दुसऱ्यांचे लोक चोरावे लागते त्यामुळे नक्की चांगले दिवस येतील..जनताच सगळं हातामध्ये घेणार आहे अशी टीका यशोमती ठाकूर यांनी केली

पुण्याच्या भोर तालुक्यातील १७ हजार १७३ शेतकऱ्यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळणार

कर्जमुक्ती योजनेअंतर्गत तालुक्यातील शेतकऱ्यांची सुमारे १०१ कोटी रुपयांची कर्जमाफी होणारं

भोर तालुक्यात थकीत कर्जदारांपेक्षा नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे

सन २०२२ ते २०२५ या तीन वर्षांच्या कालावधीत किमान दोन वर्षे नियमित असणाऱ्या पात्र १० हजार ८४३ शेतकऱ्यांना प्रत्येकी ५० हजार प्रोत्साहनपर अनुदानाची ४५ कोटी ३३ लाख एवढी रक्कमही मिळाली आहे, अशी माहिती देखील जगताप यांनी दिली

तालुक्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांनी कागदपत्रे सादर करून या योजनेचा लाभ घ्यावा प्रशासनाकडून आवाहन

आष्टीकर बापलेक म्हणाले, ऑपरेशन तुडवाला जशास तसे उत्तर देऊ

ठाकरेंच्या शिवसेनेचे बंडखोर खासदार नागेश पाटील आष्टीकर काल मुंबईवरून नांदेड विमानतळावर दाखल झाले त्यानंतर हिंगोली लोकसभेतील हादगाव कडे गाड्यांचा ताफा घेऊन निघत असताना आष्टीकरांना ठाकरेंच्या शिवसैनिकांनी काळे झेंडे दाखवत गद्दार लिहिलेले फलक झळकावले त्यानंतर आता खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्यासह त्यांचे चिरंजीव कृष्णा पाटील आष्टीकर यांनी देखील ऑपरेशन तुडवा राबवत असाल तर जशास तसे उत्तर देऊ म्हणत ठाकरेंच्या शिवसैनिकांना प्रति आव्हान दिले आहे, कुणी आपल्या अंगावर येत असेल तर आम्ही सोडणार नाही असं खासदार अष्टीकर हिंगोलीत दाखल झाल्यानंतर म्हणाले आहेत पाहूयात खासदार नागेश पाटील आष्टीकर व त्यांचे चिरंजीव कृष्णा पाटील आष्टीकर यांनी संजय राऊत यांच्या ऑपरेशन तुडवाला कसे उत्तर दिले.

Maharashtra News Live Update: सिंधुदुर्गात अखेर दमदार पावसाने पुनरागमन

सिंधुदुर्ग जिल्ह्यात अखेर दमदार पावसाने पुनरागमन केले असून गेले पंधरा दिवस दडी मारून बसलेल्या पावसाने आज सकाळपासून जिल्ह्यातील बहुतांश भागात जोरदार हजेरी लावली आहे. सावंतवाडी, कुडाळ, माणगावसह अनेक भागांत पावसाच्या सरी कोसळल्याने शेतकरी वर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे. पावसाअभावी भात लागवड आणि शेतीच्या कामांवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात होती. मात्र, आजच्या दमदार पावसामुळे शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या असून शेतीच्या कामांना वेग येणार आहे. पावसाच्या पुनरागमनामुळे वातावरणातही गारवा निर्माण झाला असून सर्वसामान्य नागरिकांनीही समाधान व्यक्त केले आहे. जिल्ह्यात पुढील काही दिवस चांगल्या पावसाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

लातूर जिल्ह्यातल्या सर्व शाळा सकाळच्या सत्रात, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, जून संपत आला तरी उन्हाचा पारा कमी होईना

एल निनोच्या प्रभावाचा मोठा फटका, लातूरमध्ये बसताना पाहायला मिळतोय, जून महिना संपत आला तरीही जिल्ह्यात पावसाचा थेंब नाही. उन्हाचा पारा 36ते 37 अंश सेल्सिअस वर नोंदतो आहे. दरम्यान उन्हाचा पारा लक्षात घेता, जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सर्व शाळांच्या वेळेत बदल करण्याचे आदेश दिले आहेत , लातूर जिल्ह्यातील शाळेच्या वेळेत बदल करण्यात आलाय, सकाळी 8 ते दुपारी 12:30 वाजेपर्यंत शाळा सुरू ठेवाव्यात असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आहेत, दरम्यान 15 जून पासून सर्व शाळा नियमितपणे सुरू झाल्या आहेत, मात्र उन्हाचा पारा लक्षात घेता, जिल्हाधिकाऱ्यांनी हे आदेश काढले आहेत. त्यामुळे इंग्रजी माध्यमांसह खाजगी, अनुदानित संस्था, जिल्हा परिषद यासह इतर सर्व शाळेच्या वेळेत बदल करण्यात आला.

खारघरमध्ये पाणीटंचाईवरून रहिवाशांचा संताप; बिल्डरला महिलांचा घेराव

नवी मुंबईतील खारघर येथील अरिहंत ग्रुपच्या गृहनिर्माण प्रकल्पात भीषण पाणीटंचाईचा प्रश्न निर्माण झाला आहे. वारंवार पाणीपुरवठा खंडित होत असल्याने रहिवाशांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. समस्येच्या निषेधार्थ महिला रहिवाशांनी बिल्डर कार्यालयात जाऊन घेराव घातला. यावेळी रहिवासी आणि व्यवस्थापन यांच्यात जोरदार वाद झाल्याची माहिती समोर आली आहे.

Maharashtra News Live Update: सातारा- सांगलीत फुटलेल्या 100 मतांवरून महायुतीत राजकारण तापलं

सांगली विधान परिषद निवडणुकीत भाजपाचा उमेदवार विजयी झाला असला तरी फुटलेल्या 100 मतांवरून आता राजकारण तापू लागलेल आहे. या फुटलेल्या मतांवरून ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी नाव न घेता थेट निशाणा पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यावर धरला आहे. कराड येथे त्यांनी माध्यमांशी बोलताना आम्ही नक्की हिशोब करू, हिशोबात आम्ही पक्के आहोत. अनेक लोकांच्या अोठात एक, मनात एक आणि करणीत आणखी वेगळं होत. परंतु, ते कोणालाही शक्य झाल नाही. तर पालकमंत्री शंभूराज देसाई आणि मकरंद आबा महायुती सोबत राहिले का हे देवाला माहिती, असे म्हणत स्पष्ट नाराजी व्यक्त केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Tourism : शनिवार-रविवार काय करताय? पाहा तळेगावाजवळील 'हा' सीक्रेट पिकनिक स्पॉट

Bird Facts : प्रत्येक पक्षाची चोच वेगळी का असते? ९९% लोकांना माहिती नसेल कारण

Nagpur : नागपूरमध्ये खळबळ! मदरसा शिक्षकाकडून १० अल्पवयीन मुलांचे लैंगिक शोषण; रात्रीच्या काळोखात भयंकर कृत्य

नाशिकमध्ये भाजपला मोठा धक्का; महायुतीकडून विश्वासघात झाल्याचा दराडेंचा आरोप

Marathi Actor : प्रसिद्ध मराठी अभिनेत्यावर कोसळला दुःखाचा डोंगर, जवळच्या व्यक्तीचे निधन

SCROLL FOR NEXT